Breaking News

दोन वर्षात ७२ हजार जणांना सरकारी नोकऱ्या देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील विविध विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत. त्यातील ७२ हजार जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यातील ३६ हजार जागा यावर्षी तर राहीलेल्या ३६ हजार जागा पुढील वर्षी भरणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली.

राज्य सरकारकडून कृषी विभाग २ हजार ५७२, पशु व दुग्धसंवर्धन विभागातील १ हजार ४७, मत्सव्यवसाय विभाग ९०, ग्रामविकास विभाग ११ हजार ५, गृह विभाग ७ हजार १११,  सार्वजनिक बांधकांम विभाग ८ हजार ३३७, जलसंपदा विभाग ८ हजार २२७, जलसंधारण विभाग ४ हजार २२३, सार्वजनिक आरोग्य विभाग१ हजार आणि नगरविकास विभागाच्या १ हजार ५०० जागा अशा मिळून एकूण ३६ हजार रिक्त जागा यावर्षी तर दोन वर्षात मिळून ७२ हजार जागा भरणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

Check Also

आतंरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या ५० मध्ये या भारतीय शैक्षणिक संस्थाचा समावेश

एप्रिल महिन्याच्या पहिल्या १० दिवसात जगभरातील विद्यापाठांची QS ने जागतिक क्रमवारी जाहिर केली असून या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *