Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

आशिष शेलार यांची घोषणा, पुढील वर्षी ‘पुणे महोत्सव’ राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू

पुणे हे विद्येचे, संस्कृतीचे आणि ऐतिहासिक वारशाचे माहेरघर आहे. तीन दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाला पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुण्याची सांस्कृतिक समृद्धी अधोरेखित झाली आहे. पुढील वर्षी हा सांस्कृतिक महोत्सव ‘पुणे महोत्सव’ म्हणून राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त शनिवारवाड्याच्या …

Read More »

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत असताना, मुंबई युवक काँग्रेसने बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘मेरी डिग्री का क्या?’ या अभियानाची सुरुवात केली. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी गांधी भवन पत्रकार परिषद घेऊन या अभियानाची माहिती दिली. देशातील लाखो तरुण उच्च शिक्षण घेऊन पदव्या मिळवत आहेत; मात्र …

Read More »

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

राज्यातील काही भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतीपिकांवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महसूल विभागातील विविध भागांना भेटी देऊन ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करणार असून, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. तसेच, या …

Read More »

शरद पवार यांची मागणी, राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा

राज्यातील बहुतांश भागात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असून त्यांच्या  शेतातील उभी पिके पावसाअभावी करपली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे. पत्रात पुढे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांना आशा, मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात यूडब्ल्यूए महत्वपूर्ण भूमिका बजावेल

मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (यूडब्ल्यूए) इंडिया, मुंबई कॅम्पसच्या उद्घाटनामुळे नवे बळ मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या संस्था, पायाभूत सुविधा आणि प्रतिभावान मनुष्यबळ यांच्या माध्यमातून भविष्यातील उद्योग व संशोधन परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री …

Read More »

नंदीग्राममधील काँग्रेसच्या उमेदवाराला ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा देताच अटकेची कारवाई

२००७ मधील जमीन संपादनाविरोधातील आंदोलनाशी संबंधित एका प्रकरणात काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना शुक्रवारी पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली, अशी माहिती पक्षाच्या राज्य शाखेने दिली. विशेष म्हणजे नंदीग्राम पोटनिवडणुकीत आपला गट त्यांना पाठिंबा देईल, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केल्यानंतर काही तासांतच ही अटक करण्यात आली. नंदीग्राममधील प्रस्तावित …

Read More »

यंदाच्या अकादमी (ऑस्कर) पुरस्कारासाठी अधिकृत प्रवेश गोंधळ मराठी चित्रपटाला

मराठी चित्रपट गोंधळाची ९९ व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे, याची घोषणा शुक्रवारी, १८  सप्टेंबर रोजी मुंबईत करण्यात आली. भारतीय चित्रपट महासंघाने या वर्षी वादात असलेल्या ३० हून अधिक चित्रपटांमधून संतोष डावखर यांच्या चित्रपटाची निवड केली. ९९ व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताच्या अधिकृत प्रवेशासाठी वादात असलेल्या …

Read More »

आदित्य यांच्या पाठिशी अमित ठाकरे, दिशा सालियन यांना आदित्य ओळखत नव्हते की भेटलेही नव्हते

मनसे नेते अमित ठाकरे यांनी शुक्रवारी त्यांचे चुलत भाऊ आणि शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य यांचा सहभाग असणे कधीच शक्य नाही, असे ते म्हणाले. आदित्य यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की ते दिशा सालियन यांना ओळखत नव्हते किंवा कधी भेटलेही नव्हते; तसेच …

Read More »

निठारी हत्याकांडातील संशयीत सुरेंद्र कोली मृत अवस्थेत आढळूण आला

नोएडामधील निठारी येथील मालिका-हत्याकांडाचे प्रकरण (ज्यामध्ये भयानक गुन्हे आणि मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांचा समावेश होता आणि जे लोकांच्या स्मरणात कायमचे कोरले गेले आहे) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या वर्षी निर्दोष मुक्तता झालेला सुरेंद्र कोली शुक्रवारी मृत अवस्थेत आढळला. एकेकाळी ‘निठारीचा राक्षस’ (Monster of Nithari) म्हणून ओळखला जाणारा कोली हरिद्वारमधील …

Read More »

ममता बॅनर्जी यांच्या गटाच्या उमेदवाराची माघार, इंडिया आघाडीच्या पाठिशी असल्याचे केले जाहिर

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी नंदीग्राम पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना पाठिंबा जाहीर केला; त्यांच्या गटाच्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. नंदीग्राममधून दुसरा उमेदवार उभा केला जाणार नाही असे सांगत, ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय भाजपविरुद्धच्या लढ्यात ‘इंडिया’ (INDIA) आघाडीशी असलेली एकता दर्शवणारा …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा आरोप, शेतकरी पंचाग बघुन आत्महत्या करत नाही

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आणि शिंदे यांच्या शिवसेनेसह राज्य सरकारवर टीका करत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकरी पंचांग पाहुन नव्हे तर दुःख भोगून आत्महत्या करतोय खड्यात घाला तुमचे मुहूर्त अशा शब्दात 5 ऑक्टोंबरपासून पंचनामे सुरु करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका केली. तसेच कर्नाटकातील काँग्रेस सरकारने दुष्काळ सुरु करून …

Read More »

सुप्रिया सुळे याची मागणी, लाडक्या बहिणीच्या पाच हजार कोटींच्या वितरणाची चौकशी करा

राज्य सरकारने  ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबत कोणतीही लपवाछपवी न करता खरी आणि निर्दोष आकडेवारी जारी  करावी. या योजनेबाबतची श्वेतपत्रिका तातडीने प्रसिद्ध करावी आणि ५ हजार  कोटींच्या अपात्र वितरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी एक्स या …

Read More »

पॉक्सो कायद्यांतर्गत ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पॉक्सो) अधिनियमांतर्गत पीडित बालकांना न्यायप्रक्रियेदरम्यान आवश्यक सहाय्य व संरक्षण मिळावे, यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्त करण्यात येणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी १५ दिवसांच्या आत अर्ज सादर करावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे. सामाजिक कार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र किंवा बालविकास विषयातील …

Read More »

बीड-पुणे रेल्वेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी; यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरण व तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत बीडकरांसाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक व आनंददायी ठरला आहे. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या ‘बीड-पुणे’ थेट रेल्वेसेवेचा आज राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शानदार शुभारंभ करण्यात आला. याच भरगच्च कार्यक्रमात बीडच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या यशवंतराव …

Read More »

महिला शेतकऱ्यांना आता मिळणार अधिकृत ओळख; महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू

“शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र अनेक वेळा शेतीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळत नाही. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमामुळे ही परिस्थिती बदलणार असून, महिलांना अधिकृत ओळख, शासकीय योजनांचा लाभ, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा आणि विस्तार सेवांचा लाभ अधिक सुलभपणे मिळणार आहे. …

Read More »