Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

राजीव गांधी यांच्या जयंती दिनी राहुल गांधी यांची एक्सवर पोस्ट, आई सोनिया गांधी यांच्या अतुलनीय धैर्याचे कौतुक

देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी त्यांच्या आई सोनिया गांधी यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याबद्दल कौतुक केले. १९९१ मध्ये त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर, त्यांनी सोनिया गांधींना आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाचा “अखंड धैर्य आणि …

Read More »

दक्षिणेतील राज्यांचे मुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्यात कावेरी, जीएसटी, डिलीमिटेशन आणि नीट

गुरुवारी तामिळनाडूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘दक्षिण क्षेत्रीय परिषदे’च्या (Southern Zonal Council) बैठकीत दक्षिण भारतातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation), दक्षिणेकडील राज्यांचे राजकीय प्रतिनिधित्व सुरक्षित ठेवणे, ‘नीट’ (NEET) परीक्षा, कावेरी पाणीवाटप आणि अधिक आर्थिक स्वायत्तता यांसारखे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दक्षिणेकडील …

Read More »

मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या मात्र आधार प्रमाणीकरणापूर्वी मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांबाबत शासनाने मानक कार्यप्रणाली निश्चित केली आहे. संबंधित मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर वारसांची नोंद करून, त्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार असून, पात्र वारसांना योजनेच्या निकषांनुसार कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. राज्य शासनाने २ जून …

Read More »

प्रताप सरनाईक यांचा इशारा, रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलता न आल्यास बॅज निलंबित करणार

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य असून, या नियमाची अंमलबजावणी उद्या, २० ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम एक महिन्याची नोटीस देण्यात येईल. या कालावधीत मराठीचे ज्ञान प्राप्त न केल्यास त्यांचा बॅज तीन महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल. त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक …

Read More »

एकनाथ शिंदे यांचा विश्वास, ‘फार्म टू फॉरेन’ मोहिमेतून महाराष्ट्रातील कापड उद्योगाला मिळणार जागतिक झळाळी

महाराष्ट्राच्या मातीत पिकलेला कापूस आणि त्यापासून तयार उत्पादने आता थेट परदेशातील मॉलमध्ये झळकणार आहेत. कापूस उत्पादनापासून ते जागतिक फॅशन बाजारपेठेपर्यंतची साखळी अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, ‘फार्म टू फॉरेन’ संकल्पनेद्वारे महाराष्ट्र जागतिक एक्सपोर्ट हब होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. जिओ वर्ल्ड सेंटर येथे असोचेम …

Read More »

सुनेत्रा अजित पवार यांचे आश्वासन, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती

पिंपळवंडी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे साडेनऊ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे. यासंदर्भात पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक व सखोल चौकशी करून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, देशातील हवा बदलली, भाजपाकडे मुद्दाच नाही म्हणून वंदे मातरम वरून हिंदू-मुस्लीमचा अघोरी डाव

देशातील वातावण बदलले आहे, जनता आता भाजपा मोदी शाह सरकारला प्रश्न विचारत आहे आणि सरकार पूर्णपणे घाबरले आहे. भाजपा सरकारकडे सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम वाद उकरून काढण्याचे षडयंत्र रचले आहे. वंदे मातरम वरून भाजपाने सुरु केलेल्या षडयंत्राला बळी पडू नका. देशातील हवा बदलली असली तरी बदला घेण्याची …

Read More »

विधानसभा निवडणूकीत पराभव झाला तरी बार कौन्सिलच्या निवडणूकीत टीएमसी विजयी

टीएमसीच्या (TMC) वकिलांच्या आघाडीचे सदस्य संजय बर्धन यांनी सांगितले की, ही निवडणूक जिल्हा न्यायालयांमध्ये घेण्यात आली आणि त्यात कार्यरत वकिलांनी सहभाग घेतला. “सर्व जिल्हा न्यायालयांमधील कार्यरत वकिलांच्या मतदानातून गेल्या मार्चमध्ये ‘स्टेट बार कौन्सिल’ची स्थापना करण्यात आली होती. नवीन नियमांनुसार, २३ पैकी पाच जागा महिलांसाठी राखीव आहेत. या महिलांच्या जागांपैकी चार …

Read More »

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या विरोधात अटक वॉरंट

कथित द्वेषपूर्ण भाषणाच्या एका प्रकरणात अनेक समन्स बजावूनही वारंवार न्यायालयात हजर न राहिल्याने, कृष्णनगर न्यायालयाने बुधवारी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले. कृष्णनगर न्यायालयाच्या तिसऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी तात्काळ वॉरंट जारी करण्याचे निर्देश दिले आणि २८ ऑगस्ट रोजी अंमलबजावणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. कृष्णनगर न्यायालयाने मंगळवारी …

Read More »

अखेर सुनिता आहुजा यांनी घटस्फोटाची याचिका घेतली मागे, अभिनेता गोविंदास घटस्फोट दिलाच नाही

त्यांच्या लग्नाबद्दल अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अटकळांनंतर, गोविंदाचे व्यवस्थापक, शशी सिन्हा यांनी इंडिया टुडेला दुजोरा दिला आहे की सुनीता आहुजाने न्यायालयातून तिची घटस्फोटाची याचिका अधिकृतपणे मागे घेतली आहे. सुनीताने गोविंदावर एका तरुण अभिनेत्यासोबत फसवणूक केल्याचा आरोप केल्यानंतर काही दिवसांनी ही घडामोड समोर आली आहे. पापाराझींशी बोलताना तिने त्याला “शुगर डॅडी” …

Read More »

पहिल्या १०० दिवसात मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप

तामिळनाडूमध्ये ऐतिहासिक जनादेशासह सत्तेवर आल्यापासून, मुख्यमंत्री विजय यांनी नेहमीच ‘भ्रष्टाचारमुक्त सरकार’ देण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे. मात्र, विजय यांच्या नवीन कार्यालयात स्थलांतर करण्याच्या योजनेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. नुकतेच १०० दिवस पूर्ण करणाऱ्या या सरकारवर भाजपने भ्रष्टाचाराचा पहिलाच आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय (CMO) हलवण्यासाठी काढण्यात आलेल्या ५.५४ कोटी …

Read More »

अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर जम्मू काश्मीरला भेट देत म्हणाले, भारताचा अविभाज्य भाग

जम्मू-काश्मीरबाबतच्या भारताच्या दीर्घकालीन भूमिकेचे जोरदार समर्थन करत, अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी श्रीनगरला दिलेल्या आपल्या पहिल्या भेटीदरम्यान या केंद्रशासित प्रदेशाचे वर्णन “भारताचा एक महत्त्वाचा भाग” असे केले. कलम ३७० रद्द झाल्यानंतर आणि पहलगाम येथील हल्ल्यानंतर एखाद्या अमेरिकन दूताची या केंद्रशासित प्रदेशाला दिलेली ही पहिलीच स्वतंत्र भेट होती; या भेटीदरम्यान …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे ९ निर्णय

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. या बैठकीत पुण्यात होणार युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप-२०३२ स्पर्धा आयोजनाला शासनाचे पाठबळ, जायकवाडी प्रकल्प टप्पा – २ साठी ६ हजार ४७७ कोटी, गौण खनिजांचे स्वामीत्वधनाचे अनावश्यक खटले कमी होणार, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ट्रेडस प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर, गडचिरोली जिल्हा क्रीडा …

Read More »

विधानमंडळ सदस्यांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ

महाराष्ट्र विधानमंडळाच्या विद्यमान सदस्यांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार स्वीय सहाय्यकांचे मासिक मानधन ३० हजार रुपयांवरून ४० हजार रुपये, तर वाहनचालकांचे मासिक मानधन २० हजार रुपयांवरून ३० हजार रुपये करण्यात आले आहे. ही वाढ १ ऑगस्ट २०२६ पासून लागू करण्यात आली असल्याची माहिती …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित

राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय, खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि वैद्यकीय व्यवसायिकांना सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित घटनेची आणि सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूची नोंद संबंधित आरोग्य प्राधिकरणाकडे करणे बंधनकारक …

Read More »