Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

उद्धव ठाकरे यांचा आरोप, शेतकरी पंचाग बघुन आत्महत्या करत नाही

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आणि शिंदे यांच्या शिवसेनेसह राज्य सरकारवर टीका करत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकरी पंचांग पाहुन नव्हे तर दुःख भोगून आत्महत्या करतोय खड्यात घाला तुमचे मुहूर्त अशा शब्दात 5 ऑक्टोंबरपासून पंचनामे सुरु करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका केली. तसेच कर्नाटकातील काँग्रेस सरकारने दुष्काळ सुरु करून …

Read More »

सुप्रिया सुळे याची मागणी, लाडक्या बहिणीच्या पाच हजार कोटींच्या वितरणाची चौकशी करा

राज्य सरकारने  ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबत कोणतीही लपवाछपवी न करता खरी आणि निर्दोष आकडेवारी जारी  करावी. या योजनेबाबतची श्वेतपत्रिका तातडीने प्रसिद्ध करावी आणि ५ हजार  कोटींच्या अपात्र वितरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी एक्स या …

Read More »

पॉक्सो कायद्यांतर्गत ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पॉक्सो) अधिनियमांतर्गत पीडित बालकांना न्यायप्रक्रियेदरम्यान आवश्यक सहाय्य व संरक्षण मिळावे, यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्त करण्यात येणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी १५ दिवसांच्या आत अर्ज सादर करावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे. सामाजिक कार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र किंवा बालविकास विषयातील …

Read More »

बीड-पुणे रेल्वेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी; यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरण व तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत बीडकरांसाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक व आनंददायी ठरला आहे. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या ‘बीड-पुणे’ थेट रेल्वेसेवेचा आज राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शानदार शुभारंभ करण्यात आला. याच भरगच्च कार्यक्रमात बीडच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या यशवंतराव …

Read More »

महिला शेतकऱ्यांना आता मिळणार अधिकृत ओळख; महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू

“शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र अनेक वेळा शेतीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळत नाही. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमामुळे ही परिस्थिती बदलणार असून, महिलांना अधिकृत ओळख, शासकीय योजनांचा लाभ, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा आणि विस्तार सेवांचा लाभ अधिक सुलभपणे मिळणार आहे. …

Read More »

एनसीएमसी NCMC कार्डधारकांसाठी आता BHIM Appद्वारे सहज करता येणार Top-up

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. एनसीएमसी NCMC कार्डधारकांना आता भीम अॅप BHIM Appच्या माध्यमातून आपल्या कार्डचे Top-up करता येणार आहे. त्यामुळे कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर पुन्हा रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची आवश्यकता राहणार नसून, मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या कार्डमध्ये रक्कम जमा …

Read More »

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, कोकणातील पाणी आणणार

मराठवाड्याचा आधी स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला आता दुष्काळाशी संघर्ष सुरु आहे. आताही  पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही परिस्थिती बदलवण्यासाठी  कोकणातील आणि कृष्णाखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करु,असा शब्द आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले

मनोज जरांगे पाटील यांनी २० दिवसांचे उपोषण स्थगित करून महाराष्ट्र सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर सरकार झुकले यामुळे ओबीसींचे मोठे नुकसान होणार अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, मराठा समाजाला न्याय  मिळाला पाहिजे. आमचा त्याला कधीच विरोध नव्हता. मात्र …

Read More »

मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; “पॅरिस मधून हलली सूत्रे” !

मराठा आंदोलनाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण सोडण्याचा तसंच आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. जरांगे यांचे आंदोलन स्थगित व्हावे तसंच या विषयावरची चर्चा पुढे सरकावी यासाठी थेट “पॅरिसमधून सूत्रं हलली”! राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पॅरीसमधून जवळपास साडेतीन तासाच्या अथक शिष्टाई नंतर तोडगा काढण्यात यश मिळवलं. उद्योगमंत्री …

Read More »

टाटा सन्सच्या कार्यकारी अध्यक्षपदासाठी एन.चंद्रशेखर यांना पुन्हा एकदा संधी

टाटा सन्सच्या संचालक मंडळाने एन. चंद्रशेखरन यांच्या कार्यकारी अध्यक्षपदासाठी आणखी पाच वर्षांच्या कार्यकाळाला मंजुरी दिली आहे; या निर्णयामुळे त्यांनी गेल्या महिन्यात पुन्हा नियुक्ती न स्वीकारण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. नोएल टाटा यांचा अपवाद वगळता, संचालक मंडळाच्या सर्व सदस्यांनी एन. चंद्रशेखरन यांच्या पुढील पाच वर्षांच्या पुनर्नियुक्तीच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले; …

Read More »

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी घेतले सिद्धीविनायक, लालबागच्या राजाचे दर्शन

एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईत सिद्धिविनायक मंदिर तसेच लालबागच्या राजासह अनेक गणेशोत्सव मंडळे आणि मंदिरांना भेट देऊन विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाचे दर्शन घेत पूजा केली. यावेळी नितीन नबीन यांनी संपूर्ण देशातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, सेवा संकल्प अभियानात राज्यातील सर्व जनतेची आरोग्य तपासणी करा

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांच्या सर्वसमावेशक आरोग्य तपासणीसह अॅनिमिया निर्मूलन, बाल आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्यसेवा, शालेय विद्यार्थ्यांची तपासणी आणि उपचारांचा पाठपुरावा यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना  सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. आरोग्य संस्थांतील सेवांचे नियमित संनियंत्रण, जनआरोग्य समित्यांचा सहभाग, रुग्णवाहिका सेवेचे बळकटीकरण तसेच वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता यावर विशेष भर देण्यात यावा असेही …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री ते पंतप्रधान २५ वर्षात देशासाठी काय ‘दिवे’ लावले ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक जिवनात २५ वर्ष पूर्ण केली म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करा, असे आवाहन भाजपाकडून करण्यात येत आहे. नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांचा व त्यांच्या पक्षासाठी मोठा असेल पण मुख्यमंत्री ते पंतप्रधान म्हणून २५ वर्षात त्यांनी देशासाठी काय ‘दिवे’ …

Read More »

महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकऱ्यांना कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, अधिनियमांतर्गत कार्यवाहीसाठी ग्रामपंचायत क्षेत्रासाठी सहाय्यक कृषी अधिकारी आणि नगरपंचायत क्षेत्रासाठी कृषी अधिकारी (विस्तार) यांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संबंधित क्षेत्रासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांची …

Read More »

जयकुमार रावल यांची माहिती, कृषी पायाभूत सुविधांसाठी एक हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या संधी

महाराष्ट्राला केवळ कृषी उत्पादन करणारे राज्य न ठेवता कृषीमालाचे मूल्यवर्धन, प्रक्रिया आणि निर्यात करणारे आघाडीचे राज्य बनविण्यासाठी ‘मॅग्नेट २.०’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आधुनिक कृषी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. केळी, डाळिंब, आंबा, लिंबूवर्गीय फळे, काजू आणि हळद या सहा कृषी उत्पादनांच्या समूहांसाठी एक हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीची संधी निर्माण केली जाणार असून, खासगी क्षेत्राने या प्रक्रियेत …

Read More »