Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

आशिष शेलार यांची माहिती, अंशकालीन पदवीधर/पदविकाधारक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत विद्यमान कायद्यानुसार निर्णय

अंशकालीन पदवीधर/पदविकाधारक कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेचा लाभ, पूर्वीची सेवा ग्राह्य धरणे तसेच सेवानिवृत्तीचे वय वाढविणे या मागण्या विद्यमान कायदेशीर तरतुदींनुसार मान्य करता येत नसल्या, तरी या कर्मचाऱ्यांना आणखी कोणते लाभ देता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिवांच्या स्तरावर विशेष समितीची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, अवैध डान्स बार रोखण्यासाठी पोलीस कायद्यात दुरुस्ती करणार

राज्यात डान्स बारवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या विद्यमान कायद्यातील पळवाटा बंद करण्यासाठी राज्य सरकार महाराष्ट्र पोलीस अधिनियमात दुरुस्ती करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. या दुरुस्तीनंतर डान्स बार चालविण्यासाठी  महाराष्ट्र डान्स बार कायद्यांतर्गतच परवाना घेणे बंधनकारक राहील. पोलीस कायद्यांतर्गत केवळ सादरीकरण (परफॉर्मिंग लायसन्स) घेऊन डान्स बार चालविण्याची प्रथा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, ‘एल निनो’चे संभाव्य संकट जलसंधारणासाठी इष्टापत्ती

विविध हवामान संस्थांनी या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये ‘एल निनो’बाबत दिलेल्या इशाऱ्यांबाबत शासन गंभीर आहे. यामुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य टंचाई परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यासाठी शासन सज्ज आहे. त्यामुळे एल निनोचे संभाव्य संकट हे जलसंधारणासाठी इष्टापत्ती असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमी कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, ओबीसी विचार महाराष्ट्राचा, महाराष्ट्राचा हा विचार देशभर पोहचवा

ओबीसी विचार महाराष्ट्राने देशाला दिला आहे. शिव, शाहु, फुले, आंबेडकर विचार व वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान हे ओबीसी चळवळीचे दोन स्रोत आहेत आणि या विचाराचा माणूस जातीच्या पलीकडे पहात असतो. महाराष्ट्राचा हा विचार देशभर पोहचवण्याची आज नितांत गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, बाल गुन्हेगारांची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षे करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार

बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा १८ वर्षांवरून १६ वर्षे करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. बालकांचा गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या वितरणासाठी वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी, यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीकडे वाढता कल याबाबत सदस्य अर्जुन …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, बिश्नोई गँगचा महाराष्ट्रात वाढता धुमाकूळ,खंडणीसाठी धमक्या आणि गोळीबाराच्या घटना

महाराष्ट्रात बिश्नोई गँगच्या नावावरून सुरू असलेली खंडणी, जीवे मारण्याच्या धमक्या आणि गोळीबाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरत गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, पिंपरी-चिंचवड …

Read More »

एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती, आम्ही तुडवायला नाही तर शिवसेना वाढवायला आलोय

सहा खासदारांनंतर विधान परिषेदेतील आमदार सचिन अहिर यांना सोबत घेत शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठवडाभरात दुसऱ्यांदा उबाठाला जोरदार झटका दिला. आम्ही तुडवायला नाही तर शिवसेना वाढवायला आलोय, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी …

Read More »

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार रोईंग वर्ल्ड कप अंडर-१९ व अंडर-२३ आशियाई स्पर्धा

स्वित्झर्लंडमधील ल्युसर्न येथे झालेल्या रोईंग वर्ल्ड कप–III स्पर्धेतील लाईटवेट मेन्स डबल स्कल्स प्रकारात सुवर्णपदक पटकावत भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर अभिमानाने फडकविणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या ऐतिहासिक यशानंतर आता रोईंग वर्ल्ड कप अंडर-१९ व अंडर-२३ आशियाई स्पर्धेचे आयोजन पिंपरी-चिंचवड येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्पर्धेच्या आयोजनासाठी महाराष्ट्र शासनामार्फत आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून …

Read More »

आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून विधानसभेत गोंधळ, विरोधकांचा सभात्याग..!

महाराष्ट्रात अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर सखोल चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घालून सभात्याग केला. हा विषय फार महत्त्वाचा आणि गंभीर असून दलित समाजावर अन्यायकारक आहे अशी टीका विरोधकांनी केली. या विषयावर व्यापक चर्चेअंती, सर्व सहमतीने निर्णय घेऊ,कोणावरही अन्याय केला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली. …

Read More »

राज ठाकरे यांचा सवाल, आधी परकीयांनी लुटली, आता बदला म्हणून हिंदूच आपली मंदिरं लुटत आहेत का ?

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या हुंडीत जमा होणारे दान, देणगी स्वरूपात येणारा निधी, दागदागिने यांचा कुठलाही धड हिशोब राखला जात नाहीये, आणि त्यात अपहार झाल्याची स्पष्ट शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्याचा तपास करणाऱ्या एसआयटीनेच त्यांच्या प्राथमिक अहवालात याची पुष्टी केली, काही आरोपी पकडले गेले असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले. …

Read More »

सचिन अहिर यांचे पुन्हा पक्षांतर न करताच विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिंदेच्या शिवसेनेत

काही दिवसांपूर्वी खासदार ओमराजे शिंदे यांच्या प्रसारमाध्यमाशी सांगितल्या प्रमाणे शिवसेना उबाठातील सहा खासदारांचे केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे राष्ट्रीय नेते अमित शाह यांच्याशी फोनवरून बोलणे केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय़ घेतला. त्यास काही दिवसांचा अवधी लोटत नाही तोच आता विधान परिषदेचे आमदार तथा राष्ट्रवादीचे माजी मंत्री सचिन …

Read More »

दादा भुसे म्हणाले, टीईटी-२०२६ परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत आणि विधान परिषदेत निवेदनाद्वारे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची टीका, एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश ही गंभीर घटनात्मक चिंता

एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये मनुस्मृतीचा समावेश करणे हे गंभीर घटनात्मक चिंता निर्माण करते आणि समाजावरील याच्या परिणामांबाबत प्रश्न उपस्थित करते, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. पुढे बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती पूर्णपणे नाकारली होती. त्यांचे असे मत …

Read More »

टीईटीच्या पेपरफुटीवरून विधानसभा आणि विधान परिषदेत गोंधळ

एकामागून एक पेपरफुटीच्या  घटना राज्यात होत असताना २८ जूनला होणाऱ्या टीईटीच्या परीक्षेला पेपर २७ जूनलाच फुटल्याने त्या परीक्षा अचानक रद्द करण्यात आल्या. त्यामुळे शिक्षक होऊ पाहणाऱ्यांचे अनेकांचे स्वप्न भंगले असल्या कारणाने विरोधकांनी सर्व कामकाज बाजूला ठेऊन स्थगन प्रस्ताव मांडत सर्व कामकाज बाजूला सारत याप्रश्नी चर्चा करावी अशी मागणी विधानसभेत शिवसेना …

Read More »

अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण विरोधात विधान भवनावर मोर्चा

अनुसूचित जाती (एससी) आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. या प्रस्तावित उपवर्गीकरणाला तीव्र विरोध करण्यासाठी उद्या ३० जून रोजी विधान भवनावर भव्य मोर्चा धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर, अनुसूचित जातीच्या २७ आमदारांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे …

Read More »