Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा निर्णय, शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ

राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना बदलत्या जीवनशैलीनुसार अधिक आधुनिक, सुसज्ज आणि प्रशस्त निवास सुविधा उपलब्ध होणार आहेत. शिवेंद्रसिंह राजे भोसले पुढे बोलताना म्हणाले की, या संदर्भात …

Read More »

हर्षवर्धऩ सपकाळ यांची मागणी, कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही मदत केली नाही. ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसल्याने ते हवालदिल झाले आहेत, त्यांना भरीव मदत करण्याची गरज आहे. शेतकरी जगला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका असून कोकणच्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी …

Read More »

अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्ज व्याज परतावा योजना अधिक सुलभ

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेची कार्यपद्धती अधिक सुलभ, पारदर्शक आणि लाभार्थी-केंद्रित करण्यात आली आहे. सुधारित प्रणालीमुळे लाभार्थ्यांना आता अनेक प्रक्रिया स्वतःच्या लॉगिनद्वारे ऑनलाईन पूर्ण करता येणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक …

Read More »

२० हजार लिटर अवैध पेट्रोलियमसह टँकर जप्त, ₹५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

रेशनिंग विभागास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाण्यातील कोपरी पोलीस ठाणे हद्दीत पहाटेच्या सुमारास शिधावाटप भरारी पथक आणि पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत २० हजार लिटर डिझेलसदृश अवैध पेट्रोलियम पदार्थासह टँकर जप्त करण्यात आला असून सुमारे ₹५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून …

Read More »

राज्यात नऊ नवीन कारागृहे प्रस्तावित; बंदी क्षमतेत वाढ

राज्यात पालघर, अहिल्यानगर, बारामती, येरवडा क्र.०२ व क्र. ०३ जि. पुणे, गोंदिया, हिंगोली, भुसावळ (जि. जळगाव) व अंबाजोगाई (जि. बीड) अशा एकूण नऊ ठिकाणी नवीन मध्यवर्ती व जिल्हा कारागृहे बांधणे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार एकूण १२ हजार २५८ ने बंदी क्षमतेत वाढ होणार आहे. त्यापैकी पालघर, नारायणडोह (अहिल्यानगर) व बारामती (पुणे) येथे अनुक्रमे १८, ३५ व ६० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित …

Read More »

हसन मुश्रीफ यांची माहिती, एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या विकास शुल्कातील बदल

राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२४-२५ व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील विकास शुल्कातील बदल तसेच एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर शैक्षणिक शुल्क सवलत देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मंत्रालयामध्ये आज राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी २०२४-२५ व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील विकास शुल्कातील …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, सीबीआयचे दोनवेळा छापे, मग महाराष्ट्र पोलीस काय करत होते?

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सगळीकडे जोरात सुरु असून ‘जामतारा’ रॅकेट यासाठी कुप्रसिद्ध आहे पण ‘जमतारा’ प्रमाणेच महाराष्ट्रातही अशा बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून जगभरातील नागरिकांना फसवून शेकडो कोटी रुपयांचा गोरखधंदा सुरु आहे, असा गंभीर आरोप करत या प्रकरणात आयपीएस अधिकारी दत्ता कराळे व दोन पोलीस अधिक्षक यांचाही सहभाग असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, उद्योगस्नेही वातावरणामुळे राज्यात उद्योगांचे नवे पर्व

राज्यात गुंतवणूक येऊन त्याचे उद्योगात रूपांतर करण्यासाठी अनेक धोरणात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. राज्य शासन महाराष्ट्रामध्ये उद्योग उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना पुरेपूर सहकार्य करीत आहे. त्यामुळे राज्यामध्ये सद्यस्थितीत उद्योगांचे नवे पर्व सुरू झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. श्याम स्टील आणि जेडब्ल्यू ग्लोबल उद्योग समूह राज्यात करीत असलेली गुंतवणूक त्याचे मूर्तीमंत उदाहरण …

Read More »

प्रियांका गांधी यांचा आरोप, महिला आरक्षण विधेयकाला राजकारणाचा वास

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आणि या कायद्याबाबत सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला. प्रियांका गांधी यांनी या प्रस्तावाच्या हाताळणीवर आणि वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अंमलबजावणीबाबत स्पष्टतेसाठी दबाव आणत आहेत. महिलांच्या आरक्षणाच्या चौकटीवरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये …

Read More »

संसदेत महिला आरक्षणाच्या मुद्यावरून अखिलेश यादव आणि अमित शाह यांच्यात शाब्दीक चकमक

गुरुवारी लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरील चर्चेदरम्यान मुस्लिम महिलांच्या आरक्षणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. पुढील तीन दिवसांत भारताच्या संसदेत तीन महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार आहे. महिलांसाठी ३३% आरक्षण लागू करण्यासाठी ही विधेयके आवश्यक असल्याचा सरकारचा दावा आहे, …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन, डिलिमीटेशप्रश्नी कोणात्याही राज्यावर अन्याय होऊ देणार नाही

डिलीमिटेशन-सीमांकन प्रक्रिया—जी सत्ताधारी एनडीए (NDA) आणि विरोधी पक्ष यांच्यात दीर्घकाळापासून वादाचा मुख्य मुद्दा ठरली आहे—ती कोणत्याही प्रकारे पक्षपाती किंवा अन्यायकारक नसेल. “मी हमी देतो की, पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण अशा कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही,” असे पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत सांगितले. महिला आरक्षण आणि डिलीमिटेशन प्रश्नी बोलविण्यात …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य, युद्ध जवळपास संपलेय पण, आणखी सैन्य पाठवा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचे युद्ध लवकरच संपू शकते अशी घोषणा केली आहे, परंतु होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी आणि तेहरानच्या अणु-संवर्धनावरून तणाव कायम असल्याने, वॉशिंग्टन सावधगिरीचा दृष्टिकोन स्वीकारून हजारो अतिरिक्त सैनिक तैनात करून मध्य-पूर्वेतील आपली लष्करी उपस्थिती वाढवत आहे. या वेळेमुळे तणाव आणखी वाढतो. एक नाजूक युद्धविराम २२ एप्रिलच्या अंतिम …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, नारीवंदन आरक्षण २०२४ पासूनच लागू करावं अशी मागणी, का केलं नाही?

खऱ्या अर्थानं जर नारी वंदन हा विषय संवेदनशीलता आणि जिव्हाळ्याचा राहिला असता भाजपचा, तर २०२३ साली हे बील जेव्हा पास झालं, त्यावेळेस काँग्रेसनं आग्रह धरला होता की २०२४ पासूनच हे आरक्षण लागू करावं, तेव्हा लागू का नाही केलं? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यावेळी केला. पुढे बोलताना अतुल …

Read More »

नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया स्थगित करा

अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या संदर्भातील उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेत गंभीर त्रुटी आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया स्थगित करावी तसेच   या संदर्भातील बदर समितीचा  संपूर्ण अहवाल त्वरित सार्वजनिक करावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी पाठवलेल्या पत्राद्वारे केली. नाना पटोले पुढे म्हणाले की, आरक्षण हा काही विशिष्ट व्यक्ती …

Read More »

उष्णतेच्या लाटापासून बचावासाठी असंघटीत कामगारांसाठी मार्गदर्शक सूचना

उच्च उष्णतेच्या लाटा संभावित असणाऱ्या शहरी जिल्ह्यातील मैदानी असंघटीत कामगारांच्या संरक्षणाबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. १. उद्दिष्ट- उष्णतेच्या लाटांच्या काळात शहरी भागातील बाहेर काम करणाऱ्या असंघटित कामगारांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र-विशिष्ट आणि अंमलात आणता येईल असा आराखडा उपलब्ध करून देणे. ही मानक कार्यपद्धती (एसओपी) एनडीएमए यांनी जारी केलेल्या राष्ट्रीय …

Read More »