Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

नितेश राणे यांची माहिती, पनवेल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम व सी लायन मनोरंजन केंद्र’ उभारणार

पनवेल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रस्तावित ‘स्कायला अॅक्वेरियम व सी लायन मनोरंजन केंद्र’ प्रकल्प उभारण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. या प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत आमदार विक्रांत पाटील यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर निवेदन सादर केले. ‘स्कायला …

Read More »

डिजिटल युगात डेटा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सोशल मीडिया आणि डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे वैयक्तिक डेटाचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. चुकीच्या हातात गेलेला डेटा व्यक्ती, समाज आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो. सायबर गुन्हे, डिजिटल अटक, फसवणूक, तसेच डेटा लीकच्या घटनांमुळे याची गंभीरता अधिक असल्याने डिजिटल युगात डेटा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे …

Read More »

तुळजापूरमधील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस होते. तुळजापूर येथील तुळजापूर मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी संस्थांनामार्फत चालविले जाणारे श्री तुळजाभवानी …

Read More »

सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास व त्यासाठी सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तरावरचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे नाव यापुढे शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँण्ड टेक्नॉलॉजी), …

Read More »

आदिवासींच्या ५ प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिकमध्ये, १९ माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिकमध्ये श्रेणीवाढ

आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या पाच प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिक स्तरापर्यंत आणि १९ माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिक – कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत श्रेणीवाढ करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठा हातभार लागणार आहे. या आश्रमशाळांची श्रेणीवाढ केल्याने …

Read More »

पत्नीच्या जाचाला कंटाळून न्यायाधीश अमन शर्मा यांनी केली आत्महत्या

“आता जगणे अशक्य आहे,” असे दिल्लीस्थित न्यायाधीश अमन शर्मा यांनी आपल्या वडिलांना शेवटच्या फोन कॉलवर सांगितले होते. पत्नीने वडिलांचा केलेला अपमान सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वी हे सांगितले, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. दिल्लीत कार्यरत असलेले न्यायाधीश आणि अलवरचे रहिवासी असलेले अमन शर्मा यांनी २ मे रोजी आत्महत्या …

Read More »

इराणची स्पष्टोक्ती, आता चेंडू अमेरिकेच्या ताब्यात, पण इराण दोन्ही गोष्टींसाठी तयार

अमेरिकेने तेहरानच्या ताज्या शांतता प्रस्तावावर साशंकता दर्शवल्यानंतर, पुढील पाऊल वॉशिंग्टनच्या हातात आहे, असे इराणने म्हटले आहे. इराणचे उप परराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी तेहरानमधील राजनैतिक अधिकाऱ्यांना सांगितले की, “मुत्सद्देगिरीचा मार्ग निवडायचा की संघर्षात्मक दृष्टिकोन सुरू ठेवायचा, हे आता अमेरिकेच्या हातात आहे,” आणि इराण “दोन्ही मार्गांसाठी तयार आहे.” अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड …

Read More »

अनिल देशमुख यांचा सवाल, राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही?

पुणे जिल्ह्यातील नसरापूर (भोर) येथे साडेतीन वर्षीय चिमुकलीवर ६० वर्षीय नराधमाने केलेला अत्याचार आणि तिची निघृण हत्या, ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्र दिनी अशी लाजीरवाणी घटना घडणे हे राज्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे.या घटनांवरून राज्यात कायद्याचा धाक शिल्लक आहे की नाही,असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, एल आय टी जगाला उत्तम इंजिनियर्स देईल

आठ दशकांपासून कार्यरत असलेल्या लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ चे विद्यार्थी आज जगभरात आहेतच, परंतु भविष्यातही देशाला व जगाला उत्तम इंजिनियर्स देण्याचे काम एल आय टी करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक व प्रशासकीय सुविधांच्या एकत्रित बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते …

Read More »

दिवसाच्या वीजवापरात ७० लाख ग्राहकांना २२३५ कोटी रुपयांचा लाभ

राज्यातील वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीजवापरासाठी टीओडी (टाइम ऑफ डे) सवलत जुलै २०२५ मध्ये लागू केल्यापासून आतापर्यंत ७० लाख ग्राहकांना एकूण २२३५ कोटी रुपयांचा लाभ झाला असून त्यामध्ये १५,९०७ उच्चदाब औद्योगिक ग्राहक एकूण १५३४ कोटी रुपयांच्या लाभासह प्रथम स्थानावर आहेत, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली. …

Read More »

शेतकरीविरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसची ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’

केंद्रातील व राज्यातील भाजपा महायुतीच्या मागील १२ वर्षांच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही व दुसरीकडे महागाईने शेती करणे कठीण झाले आहे. देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत तरीही भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाही. शेतकरी विरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, महिला व मुलींवरील अत्याचार रोखण्यात भाजपा सरकार अपयशी

पुण्यातील ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तीची हत्या करण्यात आल्याची घटना संताप आणणारी व माणुसकीला काळीमा फासणारी आहे, अशा नराधमांना फाशीच दिली पाहिजे. राज्यात कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे सांगण्यास ही घटना पुरेशी आहे. दररोज महिला अत्याचाराच्या घटना होत आहेत पण प्रत्येक घटनेनंतर कडक कारवाई करू व विरोधकांनी राजकारण करू नये …

Read More »

नसरापूर अत्याचार प्रकरणी बाल हक्क आयोग सक्रिय

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्या शुभांगीताई तांबट यांनी आज सकाळी पीडित बालिकेच्या घरी भेट देऊन तिच्या पालकांशी व नातेवाईकांशी संवाद साधला. यावेळी आयोगाच्या वतीने कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आयोग …

Read More »

‘सेल्फी’ साठी कनेक्टिंग लिंकवर थांबू नका; सीसीटीव्हीची २४x७ नजर राहणार

यशवंतराव चव्हाण मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो, घेण्यासाठी वाहन चालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रुतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून वाहनधारकांसाठी अपघाताचा धोका असल्याने ते टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र …

Read More »

पूर्व दिल्लीत इमारतीला आग लागून झालेल्या दुर्घटनेत ९ जणांचा गुदमरून मृत्यू

लोखंडी जाळ्या, बिघडलेले स्मार्ट डोअर लॉक आणि दाटीवाटीच्या रचनेमुळे पूर्व दिल्लीतील एक निवासी इमारत रविवारी मृत्यूचा सापळा बनली. पहाटे ३.४० ट्या सुमारास इमारतीत आग लागली. काही वेळातच आग वेगाने पसरली आगीत किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. इमारतीच्या रचनेतील त्रुटी आणि ताणतणावात अयशस्वी ठरलेल्या सुरक्षा उपायांमुळे …

Read More »