Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

नालासोपारा, विक्रोळी रेल्वे ट्रॅकवर पाणी, मुसळधार पावसामुळे लोकल वाहतूक विलंबाने

काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मुंबई शहर आणि उपनगरासह आजही चांगलाच मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील काही भागात पाणी साचल्याचे आणि रेल्वे स्थानकातही पावसाचे पाणी चांगलेच साचल्याचे चित्र पाह्यला मिळाले. विशेषतः नालासोपारा आणि विक्रोळी रेल्वे स्थानकात पावसाचे पाणी साचल्याचे चित्र पाह्यला मिळाले. त्याचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाल्याचे पाह्यला मिळाले. तर …

Read More »

पंढरपुरात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या धर्मशाळा-भक्तनिवासाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन व लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीपराव वळसे पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, ह.भ.प. कानोबा महाराज मोरे, …

Read More »

महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावातील काही भाग खचला

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात नावली गावातील वरच्या बाजूचा काही भाग आज सकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला. झाडासह काही भाग रस्त्यावर वाहून मलबा रस्त्यावर आला आहे. मलबा हटवण्याचे काम सुरू आहे, प्रशासन सर्व बाबतीत बारकाईने लक्ष ठेवून कार्यवाही करीत आहे. गावाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. याबाबत वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेल्या वृत्तामुळे राज्य आपत्ती …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, केंद्र आणि राज्याच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ

महाराष्ट्राने सहकार चळवळीचे मर्म शंभर वर्षांपूर्वीच समजून घेत शेतकऱ्यांना आर्थिक बळ दिले. आजही सहकार हेच ग्रामीण विकासाचे सर्वात प्रभावी साधन ठरत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ मिळत असून, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज व विकास पोहोचविण्यात सहकारी संस्थांची भूमिका निर्णायक ठरत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्र डिजिटल क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल

पॅरिस येथे होणाऱ्या ‘ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६’ या गेमिंग विश्वाच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ‘इंडिया रायझिंग’ आणि ‘जिओ ब्लास्ट’च्या माध्यमातून भारताचे दरवाजे खुले होत आहेत. महाराष्ट्रातील आणि देशातील प्रत्येक गुणवंत युवा गेमरला आता जागतिक स्तरावर आपल्या कौशल्याचा ठसा उमटविण्याची संधी उपलब्ध झाली असून, हा भारताच्या डिजिटल क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेच्या वाटचालीतील ऐतिहासिक टप्पा असल्याचे …

Read More »

दत्तात्रय भरणे यांचे आवाहन, सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू; ३१ जुलैपूर्वी नोंदणी करा

राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ व इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातील नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावे, या उद्देशाने राज्य शासनाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. तेंव्हा ३१ जुलैपूर्वी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. यासंदर्भातील …

Read More »

राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल, तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तू पसरू देताय? असा …

Read More »

४ ते ६ जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता …

Read More »

विद्यार्थ्यांना दिलासा: प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत

सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता सहा महिन्यांची मुदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान …

Read More »

मागण्या मान्य करा अन्यथा १० ऑगस्टला राज्यभर जेलभरो

महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने चार श्रम संहिता लागू करू नका व इतर मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर ३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत महाधरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भर पावसातही पाच हजार कामगारांनी सहभाग नोंदविला. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याबरोबर …

Read More »

जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, आरडीसींच्या अधिकारांचे ‘नवे’ वाटप जाहीर

राज्यातील महसूल प्रशासनाला अधिक गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीसह जिल्ह्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या जबाबदारी व अधिकारात मोठे फेरबदल करण्याचा धडाकेबाज निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. प्रशासकीय कार्यपद्धतीत झालेल्या कालानुरूप बदलाचा विचार करून अधिकार व कामकाजाचे सुधारित व सुसंगत वाटप करण्यात आले आहे. तब्बल बारा वर्षांनंतर हा व्यापक निर्णय …

Read More »

उदय सामंत यांची माहिती, मुंबईत सहा महिन्यात भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र सुरू करणार

राज्यातील भटक्या श्वानांच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने विविध स्तरांवर व्यापक उपाययोजना सुरू केल्या असून, केंद्र शासनाच्या प्राणी जन्म नियंत्रण नियम, २०२३ तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सर्व नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधानसभेत सदस्य अर्जुन खोतकर …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, ॲट्रॉसिटी’ कायद्याअंतर्गत गुन्ह्यांमधील दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अर्थात ‘ॲट्रॉसिटी’ कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवन येथे अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंमलबजावणीसाठी गठीत राज्यस्तरीय दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत दिले. या कायद्यासारख्या विशेष कायद्यामध्ये सरकारी वकिलांमार्फत दोषसिद्धी वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या कार्याचा उल्लेख त्यांच्या मूल्यमापनात करण्याचे …

Read More »

आदिती तटकरे यांची माहिती, पहिल्या टप्प्यात ५ हजार महिलांना ई-रिक्षा योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट

राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी (पिंक) ई-रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, चालू आर्थिक वर्षात किमान ५ हजार महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई-रिक्षा योजनेची प्रभावी …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, ईएसआय रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर

राज्यातील कामगार विमा रुग्णालयांमध्ये (ईएसआय) आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आरोग्यसेवा सक्षम, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. सदस्या मनीषा कायंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य भाई जगताप, प्रसाद लाड, राजीव पोतदार यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना …

Read More »