Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या x हँडलवरून म्हटले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या सामाजिक न्यायाच्या विरोधात जाऊनही, आपले वर्चस्व टिकवण्यासाठी आणि सामाजिक जातीव्यवस्थेचे रक्षण …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णालयनिहाय आरोग्यसेवांची सर्वसमावेशक मानके निश्चित केली आहेत. ग्रामीण रुग्णालयापासून उपजिल्हा, सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत कोणत्या स्तरावर कोणत्या आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, तपासण्या, मनुष्यबळ, औषधे आणि पूरक सेवा उपलब्ध असाव्यात, याची स्पष्ट रूपरेषा निश्चित करण्यात आल्याची …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ढोल ताशाला जागतिक नामांकन

शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग वाढविण्यासोबतच संपूर्ण मदत देण्यात येईल त्यासोबत स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये चर्चा करून चांगली पॉलिसी तयार करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. रेशीमबाग मैदानावर मंथन फॉर युवा या उपक्रमांतर्गत ढोल ताशा पथकाचा जागतिक विक्रम …

Read More »

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण; राहुल गांधी मार्गदर्शन करणार !

काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे सोमवार, दि. २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली आयोजित या शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थींना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राहुल गांधींची कॉपी करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न फसला

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने भारतीय जनता पक्षाची झोप उडाली आहे. राहुल गांधी यांची तरुणाईमध्ये वाढती क्रेझ लक्षात घेऊन भाजपानेही त्याची क़ॉपी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पुण्यातील महिला विशेष छात्रों की गुंज कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशामुळे आपणही जेन-झी बरोबर संवाद …

Read More »

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची स्पष्टोक्ती, आरक्षण ही घटनात्मक तरतूद

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी शुक्रवारी सांगितले की, कोणाच्याही मागणीनुसार आरक्षण रद्द केले जाऊ शकत नाही. पिढ्यानपिढ्या सामाजिक भेदभावाला सामोरे गेलेल्या समाजांना पाठिंबा देण्यासाठी हा एक घटनात्मक अधिकार आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पाटणा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना चिराग पासवान यांना, आरक्षण व्यवस्था संपुष्टात आणण्याच्या मागणीसाठी जंतर मंतर …

Read More »

छात्रों की गुंजच्या यशस्वीतेनंतर राहुल गांधी यांना भाजपा सेक्रेटरी स्मृती इराणी यांचे आवाहन

भाजपच्या सरचिटणीस स्मृती इराणी यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विधानमंडळात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाच्या तात्काळ अंमलबजावणीला पाठिंबा देण्याचे आणि काँग्रेस मुख्यालयात ‘वंदे मातरम’चे पूर्ण गायन करण्याचे आवाहन केले. पुण्यातील त्यांच्या ‘छतरों की गुंज’ या जनसंपर्क कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींना “पितृसत्ता मोडून काढा” असे आवाहन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी …

Read More »

सीजेपीचा केंद्र सरकारला इशारा, विद्यार्थ्यांचा विश्वासघात करू नका दिलेला शब्द पाळा

कॉकरोच जनता पार्टी -सीजेपी- २५ जुलै रोजी आपले देशव्यापी आंदोलन मागे घेताना दिलेल्या आश्वासनांवर केंद्राने दिलेल्या प्रतिसादाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी आपल्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची बैठक घेणार आहे. कॉकरोच जनता पार्टी -सीजेपी पक्षाने म्हटले आहे की, ती आश्वासने पूर्ण करण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, हे सरकारने अद्याप औपचारिकपणे कळवलेले नाही. …

Read More »

ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईत पडझड झालेले जैश ए मोहम्मदचे मुख्यालय पुन्हा सुस्थितीत

एका वृत्तवाहिनीला मिळालेल्या काही दृश्यांनुसार, पाकिस्तानच्या बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या (JeM) मरकज सुभान अल्लाह मुख्यालयाचे पुनर्रचना पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात भारताच्या ऑपरेशन सिंदूर हल्ल्यात या मुख्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पंजाब प्रांतात असलेल्या या छावणीची नवीन संगमरवर, नवीन रंग आणि प्लास्टरने पुनर्बांधणी करण्यात आली आहे, तसेच खराब झालेले …

Read More »

केंद्रीय मंत्र्यांच्या बंगल्याच्या दुरुस्ती, नूतनीकरण आणि सजावटीवर यंदा ९२.३५ कोटीचा खर्च

आरटीआय (RTI) अर्जाद्वारे एका वृत्तसंस्थेला मिळवलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील ‘ल्युटियन्स बंगला झोन’मधील केंद्रीय मंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानांचे नूतनीकरण, सजावट आणि दुरुस्ती यांवरील वार्षिक खर्च २०२५-२६ मध्ये विक्रमी ९२.३५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हा खर्च २०१४-१५ मधील २७.४७ कोटी रुपयांच्या तुलनेत तिप्पटाहून अधिक आहे. दुरुस्ती, नूतनीकरण आणि देखभालीचे काम पाहणाऱ्या ‘केंद्रीय सार्वजनिक बांधकाम …

Read More »

भाजपाच्या नाकावर टिच्चून राहुल गांधींचा पुण्यात मुलींशी संवाद; ’छात्रों की गुंज’चा आवाज महाराष्ट्रभर..

राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज हा देशातील चौथा कार्यक्रम पुणे येथे हजारो मुलींच्या साक्षीने मोठया उत्साहात संपन्न झाला. भारतीय जनता पक्षाकडून राहुल गांधी यांचा कार्यक्रम यशस्वी होऊ नये म्हणून अनेक व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमात सहभागी होऊ नये म्हणून मुलींना धमक्या देण्यात आल्या, हिंसक घटना घडवून आणल्या, कार्यक्रमाला बदनाम …

Read More »

साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता सुभेदारी गेस्ट हाऊस, औरंगाबाद येथे महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील साखरेचे वाढते दर, इथेनॉल निर्मितीकडे वळवण्यात येणारी साखर व मळी, तसेच …

Read More »

खासगी शिकवणी केंद्रांच्या नियमन कायद्याच्या प्रारूप मसुद्यावर ४ सप्टेंबरपर्यंत सूचना-हरकती पाठवा

राज्यातील खासगी शिकवणी केंद्रांच्या नोंदणी व नियमनासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या दृष्टीने शासनाने ‘महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६’ या कायद्याचा प्रारूप मसुदा तयार केला आहे. यावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. हा प्रारूप मसुदा शालेय शिक्षण विभागाच्या https://education.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला …

Read More »

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या देशभरातील ४८ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना

टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल्य, रोजगारक्षमता, उद्योजकता आणि नावीन्यता विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. राज्यात टाटा स्ट्राइव्हचे कार्य २०१५ पासून सुरू असून, नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक येथे मोठी कौशल्य विकास केंद्रे कार्यरत आहेत. या उपक्रमातून रोजगार वाढीसाठी चालना मिळेल, असे मत …

Read More »