Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

आमदार रईस शेख यांची मागणी, प्रारूप मतदार याद्यांमध्ये त्रुटी, एसआयआरची दोन महिने मुदत वाढवा

निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत (एसआयआर ) असंख्य त्रुटी असून नुकत्याच जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये लाखों पात्र मतदारांची नावे गायब आहेत, अशी तक्रार समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी दोन महिने …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, सेवा संकल्प अभियान नसून ‘मेवा संकल्प अभियाना’चा शेवटचा अंक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा हा ‘सेवा संकल्प अभियान’ नसून ‘मेवा संकल्प अभियाना’चा शेवटचा अंक खेळण्यासाठी आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देशाची राजधानी दिल्ली असली …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, पाच हजार ‘लालपरी’ बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी, दर्जेदार आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने बसताफ्याच्या विस्तारासोबतच आधुनिकीकरणाला वेग दिला आहे. नव्या बसेसच्या माध्यमातून एसटीची सेवा अधिक सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्याच दिशेने पाच …

Read More »

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र शासनाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ साठी महाराष्ट्रभरातून ४३२ मंडळांनी अर्ज सादर केले आहेत. यात ठाणे जिल्ह्याचे सर्वाधिक ५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. या स्पर्धेचा विस्तार मागील वर्षीपासून तालुकास्तरापर्यंत करण्यात आला होता. यावर्षीपासून प्रथमच …

Read More »

अमित शाह यांची अपेक्षा, लॅबग्रोन डायमंडच्या संपूर्ण मूल्यसाखळीत भारताने जागतिक नेतृत्व करावे

प्रयोगशाळेत विकसित होणाऱ्या हिऱ्यांच्या (लॅबग्रोन डायमंड) निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून दागिने उत्पादन, ब्रँडिंग, शोरूम आणि जागतिक विक्री व्यवस्थेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी भारतात उभारावी. या उदयोन्मुख क्षेत्रात भारतीय उद्योगाने जागतिक नेतृत्व प्रस्थापित करावे, असे आवाहन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. भारतातील रत्न व आभूषण उद्योगातील उत्कृष्टता, नेतृत्व आणि उल्लेखनीय …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, ब्रिक्स परिषदेतही पंतप्रधान मोदी यांनी मांसाहार करणाऱ्या पाहुण्यांना शाकाहरी जेवण दिले

नवी दिल्ली येथे झालेल्या ‘ब्रिक्स’ (BRICS) परिषदेच्या स्नेहभोजनात (गाला डिनर) केवळ शाकाहारी पदार्थ ठेवल्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली आणि “८० टक्के भारतीय मांसाहारी आहेत,” असा दावा केला. या विधानावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी सरकारवर परदेशी पाहुण्यांवर आपल्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू आमदार नरेंद्र मेहतांची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ८१ वर्षीय माजी शालेय सहकारी यांनी महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर येथील अनेक दशके जुन्या जमिनीच्या वादाबाबत सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित बिल्डरांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून त्यांच्या मालमत्तेवर ताबा मिळवला. गुजरातच्या वडनगरमधील बीएन (BN) शाळेत पंतप्रधान …

Read More »

मनमोहन सिंग यांना आदरांजलीः मलेशियाचे पंतप्रधान आणि राहुल गांधी यांची भेट

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी नवी दिल्लीत मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांची नाश्त्यादरम्यान भेट घेतली आणि भारत-मलेशिया संबंधांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा देखील उपस्थित होत्या. पंतप्रधान अन्वर इब्राहिम हे मलेशियाचे प्रतिनिधी म्हणून नवी दिल्लीत आयोजित ‘ब्रिक्स’ (BRICS) परिषदेच्या निमित्ताने भारतात आले आहेत. मलेशिया …

Read More »

युक्रेन-रशिया युद्धात भारत-चीन मध्यस्थी करणार असल्याची रशियाची माहिती

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियाने सांगितले की ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी युक्रेन युद्ध संपवण्यासाठी शांतता चर्चेस मदत करण्याची तयारी दर्शवली. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांच्या या तयारीचे “स्वागत केले”. ही घडामोड अशा वेळी घडली आहे …

Read More »

अमित शाह यांची माहिती, २०२९ पर्यंत भाजपाशासित २१ राज्यांमध्ये समान नागरीक कायदा असेल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी सांगितले की, ‘समान नागरी कायदा’ (UCC) – ज्याद्वारे धर्मनिरपेक्षपणे विवाह, घटस्फोट, वारसाहक्क आणि दत्तकविधान यांसारख्या बाबींसाठी एकसमान वैयक्तिक कायदे लागू करण्याचा उद्देश आहे – तो २०२९ पूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची (NDA) सत्ता असलेल्या सर्व २१ राज्यांमध्ये लागू केला जाईल. अमित शाह पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, चॅरिटेबल ट्रस्टच्या शाळांमध्ये आरटीईच्या अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार

महाराष्ट्रातील सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालविल्या जाणाऱ्या शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्याची (RTE) प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील अशा सर्व अनुदानित आणि विना अनुदानित शाळांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी मानक कार्यप्रणाली, संनियंत्रण आणि मूल्यमापन …

Read More »

सुनेत्रा अजित पवार यांचे आवाहन, सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित…शिस्तबद्ध साजरा करूया

पुणे शहरातील गणेशोत्सवाला देशभरातून नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, वीजपुरवठा आणि गर्दी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यरत ठेवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक पार पडली. यावेळी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या पालनाची मागणी

अटक करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे महाराष्ट्रात पालन केले जात आहे का,असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. फैजान मिर्झा बोलताना म्हणाले की,सर्वोच्च न्यायालयाने अर्नेष कुमार आणि सत्येंदर कुमार अन्थील  या प्रकरणांमध्ये अटकेसंदर्भात स्पष्ट निकष आणि मार्गदर्शक …

Read More »

डॉ रत्नाकर महाजन यांच्या निधनाने अभ्यासू, संयमी नेतृत्व काळाच्या पडद्याआड

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, लोकप्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष डॉ रत्नाकर महाजन यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. समाजवादी विचारांसोबतच महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव असलेल्या डॉ महाजन यांनी आयुष्यभर आपली वैचारिक भूमिका आणि मूल्यांशी असलेली बांधिलकी जपली. महाराष्ट्राने एक अभ्यासू, संयमी नेतृत्व गमावले आहे, अशा शोकभावना …

Read More »

मुंबई शहराच्या विविध छटा’ टिपण्याची छायाचित्रप्रेमींना संधी

मुंबईची वैविध्यपूर्ण जीवनशैली, संस्कृती आणि दैनंदिन अनुभव छायाचित्रातून मांडण्याची संधी छायाचित्रप्रेमींना मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ-एमटीडीसी, पर्यटन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुंबई पर्यटन’ अंतर्गत ‘मुंबई शहराच्या विविध छटा’ या विषयावर छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी २२ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात …

Read More »