Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अशोक नगरमधील डोंगराचा भाग चाळीवर कोसळून झालेले मृत्यू ही दुर्घटना नसून बीएमसीने घेतलेले बळी

कुर्ला पश्चिमेतील अशोकनगर येथे डोंगराचा भाग चाळीवर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला, ही दुर्घटना नसून बीएमसीने घेतलेले बळी आहेत. पावसाळ्यात अशा घटना घडतात व त्यानंतर प्रशासनाला जाग येते.वारंवार अशा घटना घडत असूनही बीएमसीला जनतेच्या जीवाचे काहीही पडलेले नाही. पावसाळ्यापूर्वीच प्रशासनाने अशा धोकादायक ठिकाणांची पाहणी करून सुरक्षेसाठी ठोस …

Read More »

अभिजीत दीपके यांची घोषणा, जंतर मंतर सीजन-२ लवकरच

कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) बुधवारी लवकरच नवीन आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली असून, संस्थापक अभिजित दीपके यांनी याला “जंतर मंतरचा सीझन २” म्हटले आहे. दिल्लीतील नारायणा येथे सीजेपी स्वयंसेवकांची बैठक ऐनवेळी रद्द झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. अभिजीत दीपके यांनी आरोप केला की, सत्ताधारी भाजपाच्या “दबावामुळे” बँक्वेट हॉलच्या मालकाने बुकिंग …

Read More »

विरोधकांच्या विरोधानंतर एफसीआरए विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले

विरोधी पक्षांच्या विरोधानंतर आणि आक्षेपांनंतर केंद्राने लोकसभेत प्रस्ताव मांडल्यावर, परकीय योगदान (नियमन) सुधारणा विधेयक, २०२६ बुधवारी संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) पाठवण्यात आले. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. प्रस्तावित कायदा अल्पसंख्याकांना लक्ष्य करतो, या विरोधी पक्षाच्या आरोपावरून अखिलेश यादव आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्यातही जोरदार वाद झाला. …

Read More »

सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नात पंतप्रधान मोदी, मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी हास्यविनोदात

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर काँग्रेस नेत्यांसोबत हलक्याफुलक्या गप्पा मारत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (सपा) खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला असल्याचा दिशाभूल करणारा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ लग्नाच्या रिसेप्शनमधील नाही. या …

Read More »

टाटा सन्स मधून एन चंद्रशेखरन बाहेर पडले

सहा महिन्यांपूर्वी, टाटा सन्स एन चंद्रशेखरन यांना अध्यक्ष म्हणून पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा विचार करत होती. या प्रस्तावाला सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट, तसेच टाटा सन्सची ‘नॉमिनेशन अँड रेम्युनरेशन कमिटी’ (नामांकन आणि मोबदला समिती) आणि संचालक मंडळाचा पाठिंबा होता. त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी संचालक मंडळाची बैठक …

Read More »

चौकशी समितीच्या अहवाल न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधातील आरोप सिद्ध

दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील तिन्ही आरोप सिद्ध झाल्याचा निष्कर्ष तीन सदस्यांच्या चौकशी समितीने काढला आहे. त्यांच्या अधिकृत निवासस्थानी मोठ्या प्रमाणात अनाकलनीय रोख रक्कम सापडली, महत्त्वाचा पुरावा योग्यरित्या जतन केला गेला नाही आणि या घटनेबाबत त्यांनी दिलेले स्पष्टीकरण टाळाटाळ करणारे व असमाधानकारक होते, असे समितीने नमूद …

Read More »

बीडी कामगारांच्या थकीत किमान वेतनाची अंमलबजावणी सुरू

किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत पहिल्या अनुसूचीतील तंबाखू (बिडी निर्माणसह) वस्तुनिर्माणातील अनुसूचित उद्योगातील बिडी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन दराचा प्रश्न अखेर पूर्णपणे मार्गी लागला आहे. राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि पुढाकारामुळे बीडी कामगारांच्या किमान वेतनाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने शासनाने बिडी कामगारांच्या सुधारित …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहवालच सादर केला

राज्यातील कुणबी समाजातील नागरिकांना मराठा ओबीसीचे प्रमाणपत्र न देण्याबाबतचे एक पत्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बीड आणि इतर महसूल विभागीय कार्यालयाला पाठवले असल्याचा आरोप मराठा आरक्षणाचे आंदोलन कर्त्ये मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्या चुकीच्या कृत्याची भरपाई आता राज्य सरकारने करावी अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यावर …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटीच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन ११ ऑगस्टला खात्यात जमा होणार

दर महिन्याच्या ७ तारखेला अदा होणारे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रशासकीय दिरंगाई आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे यंदा काहीसे लांबले. मात्र, एसटी महामंडळाच्या तब्बल ८६ हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन उद्या, ११ ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रताप …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देणार

महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्यासाठी युवा प्रतिभांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘द गव्हर्नन्स चॅलेंज टीजीसी २०२६’च्या चौथ्या पर्वाची राज्य शासनाने घोषणा केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतातील राज्य शासन व्यवस्थेवर केंद्रित पहिली राष्ट्रीय …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मंत्रिमंडळ व विधिमंडळाचा प्रस्ताव सादर करूनही मोदी सरकारकडून दि बा पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांमधील प्रकल्पग्रस्त नागरिक आणि मूळचे आगरी-कोळी समाजबांधव, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी दीर्घकाळापासून करत आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळ आणि राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी (विधानसभा व विधान परिषद) २९ जून २०२२ रोजी एकमताने …

Read More »

राहुल गांधी यांचा खोचक सवाल, काल्पनिक संभाषणात रस नाही, फक्त पोलीस कारवाईचे आदेश दिले होते का?

“काल्पनिक संभाषणांमध्ये रस नाही.” लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी विद्यार्थी प्रश्नांवर चर्चा करण्याचा सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित गोळीबाराचा आदेश कोणी दिला, याचे उत्तर आधी द्यावे अशी मागणी केली. राहुल गांधी म्हणाले की, विरोधी पक्ष अमित शाह …

Read More »

उपचारासाठी परदेशी जाण्यास अखेर टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) सरचिटणीस आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांना डोळ्यांच्या उपचारासाठी तीन आठवड्यांकरिता परदेशात जाण्याची परवानगी दिली. देशाबाहेरील त्यांच्या हालचालींवरील निर्बंध शिथिल करण्यास कलकत्ता उच्च न्यायालयाने दिलेला नकार न्यायालयाने फेटाळला आहे. हा आदेश भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची व व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने …

Read More »

काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीच्या मागणीनुसार सरकारची तयारी, अमित शाह पोलिसी कारवाईवर उत्तर देणार

दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टी प्रणित संघटनेच्यावतीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर २० जुलै रोजी दिल्ली पोलीसांनी कारवाई करत विद्यार्थ्यांच्यावर लाठी चार्ज करत विद्यार्थ्यांच्या विरोधात पॅलेट गनचा वापर केल्याने अनेक विद्यार्थ्यी जखमी झाले, तर बिहारमध्ये एके-४७ रायफलचा कारवाई दरम्यान वापर करत जवळपास ९ राऊड विद्यार्थ्यांच्या विरोधात फायर करण्यात आल्या. या कारवाईवरून …

Read More »

झारखंड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष एल खियांगटे यांना अटक

झारखंड लोकसेवा आयोगाचे (JPSC) माजी अध्यक्ष एल. खियांगटे यांना आयोगाच्या १४ व्या नागरी सेवा परीक्षेसंदर्भातील आरोपांप्रकरणी राज्य सीआयडीने अटक केली आहे. जेपीएससीची १४ वी नागरी सेवा परीक्षा घेण्यासाठी काळ्या यादीत टाकलेल्या टीडीपीएल (TDPL) या कंपनीला पॅनेलवर का घेण्यात आले, यावरून एल खियांगटे यांची चौकशी सुरू होती. झारखंडचे माजी मुख्य सचिव …

Read More »