ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रविवारी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जाहीर सभा झाली. या सभेतून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्र सोडले. राऊत यांनी आपल्या भाषणातून अप्रत्यक्षपणे मालेगावचे आमदार दादा भुसे यांचा उल्लेख ढेकूण असा केला. तर सुहास कांदे यांना बाजारातील कांद्याची उपमा दिली. …
Read More »उध्दव ठाकरे यांचा भाजपासह शिंदे गटाला खोचक टोला, किमान आडनावाप्रमाणे तरी जागा द्या… २०२४ निवडणूकीत आपण यांना फेकून दिलं नाही तर हुकुमशाहीत रहावं लागेल
मालेगांव येथील जाहिर सभेत बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडत म्हणाले, तुम्हाला खरी शिवसेना बघायची असेल तर या इथे मालेगावात या तुम्हाला पाह्यला मिळेल. माझं पक्ष नाव, निवडणूक चिन्ह चोरलंत. पण माझ्यावर आणि बाळासाहेब ठाकरेंवर जीवापाड करणारी माणसं तुम्ही हिरावून घेऊ शकला नाहीत. त्यामुळे …
Read More »उध्दव ठाकरे यांनी राहुल गांधीना ठणकावलं, सावरकर आमचे दैवत…बोलेलं खपवून घेणार नाही काही जण तु्म्हाला सावरकर बोलण्यासाठी डिवचतायत
तुम्ही कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली. आम्ही तुमच्यासोबत असल्याने महाराष्ट्रात आदित्य ठाकरे तर काश्मीरमध्ये संजय राऊत सहभागी झाले. आता आपण देशाच्या लोकशाहीसाठी एकत्र आलेलो आहोत. पण आज राहुल गांधी यांना जाहिरपणे सांगतोय की, स्वा.सावरकर हे आमचं दैवत आहे. त्यांच्यावर बोललं चालणार नाही असे ठणकावून ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव …
Read More »संकल्प सत्याग्रहात काँग्रेसचा इशारा, पंतप्रधान मोदींना उत्तर द्यावेच लागेल राहुल गांधींवरील कारवाई दडपशाही व हुकूमशाहीचे उदाहरण, काँग्रेस अशा कारवाईला घाबरत नाही- पृथ्वीराज चव्हाण
राहुल गांधी यांनी अदानी उद्योग समुहातील महाघोटाळा उघड केल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारची जगभर नाच्चकी झाली आहे. अदानीच्या कंपनीत वीस हजार कोटी रुपयांचा काळा पैसा आला तो कोणाचा आहे याची चौकशी करण्याची मागणी करत राहुल गांधींनी अदानी-मोदींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्यामुळेच राजकीय आकसातून त्यांच्यावर कारवाई केली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना …
Read More »राष्ट्रवादीची वारे परिवर्तनाचे…आणि प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, नाथाभाऊंच्या हाती धनुष्य-बाण अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच जयंतराव पाटील कार्यकर्त्यांच्या भेटीला ;उत्तर महाराष्ट्र पिंजून काढणार...
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आजपासून रविवार दिनांक २६ मार्च “राष्ट्रवादी पुन्हा… वारे परिवर्तनाचे… ध्यास प्रगतीचा…” या दौऱ्याला सुरुवात केली. राज्यात परिवर्तनाच्या लढाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. चार दिवसाच्या या दौऱ्यात …
Read More »प्रियंका गांधी-वड्रा यांनी सांगितला ३२ वर्षापूर्वीचा प्रसंग, म्हणाल्या, मग श्रीराम घराणेशाही मानणारे होते का? संकल्प सत्याग्रह आंदोलनावेळी राजीव गांधी यांच्या अंत्ययात्रेचा सांगितला प्रसंग
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने देशव्यापी संकल्प सत्याग्रह पुकारला आहे. या सत्याग्रह आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. तरीही काँग्रेसकडून नवी दिल्लीत आंदोलन करण्यात आले. या वेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वड्रा यांनी बोलताना ३२ वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आवर्जून सांगितला. गांधी परिवारावर टीका करणाऱ्या नेत्यांवरही प्रियंका गांधी यांनी …
Read More »‘नियम सारखेच…’ बॅनरबाजीवर बच्चू कडूंचे प्रत्युत्तर, या अज्ञानामुळेच सत्ता जाते… पाषणा येथील बॅनरबॅजीवरून राष्ट्रवादीवर केली टीका
२०१९ साली कर्नाटकातील कोलर येथील जाहिर सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका करताना नरेंद्र मोदींबाबत अपमानकारक वक्तव्या केले. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यानंतर बच्चू कडू यांची आमदारकी (विधानसभा सदस्यत्व) रद्द करा, अशी मागणी करणारे बॅनर काल २५ मार्च रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने …
Read More »अली जनाब टीकेवरून संजय राऊतांचा पलटवार, अशी वक्तव्ये करणं म्हणजे फाळणीची बीजं… अर्थसंकल्पिय अधिवेशानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांची केली होती टीका
नाशिक जिल्ह्यातील मालेगावात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सभा होत आहे. या सभेपूर्वी ठाकरे गटाकडून वेगवेगळे बॅनर लावण्यात आले आहेत. यात काही उर्दू बॅनरदेखील आहेत. हे बॅनर पाहून एकनाथ शिंदे गट आणि भाजपाकडून उद्धव ठाकरेंवर टीका सुरू केली आहे. उध्दव ठाकरेंच्या सभेच्या निमित्ताने मालेगावात अनेक ठिकाणी अली …
Read More »संजय राऊत यांची खासदारकी जाणार की शिक्षा होणार, विधानसभाध्यक्षांनी हक्कभंग अहवाल पाठविला… राज्यसभा उपसभापती उपराष्ट्रपतींकडे पाठविला
अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातच संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. त्यानंतर राऊतांविरोधात विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. याप्रकरणी गठीत समितीने संजय राऊत यांचा खुलासा आल्यानंतर सदरचा खुलासा अमान्य करत पुढील कारवाईसाठी हे प्रकरण राज्यसभेच्या सभापतींकडे वर्ग करण्यात आलं आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात विधानसभेत …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, तिजोरी लुटण्यासाठी दिल्लीत अदानी तर मुंबईत अजय आशर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार ‘हम करेसो कायदा’
राज्यात भाजपाप्रणित सरकार आल्यापासून जनतेच्या पैशाची लूट सुरु आहे. मागील ९-१० महिन्यात शिंदे फडणवीस सरकारने तिजोरी लुटण्याचे काम केले आहे. जी-२० परिषदेच्या बैठकांवर वारेमाप पैशांची उधळपट्टी करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही. दिल्लीत अदानीच्या रुपाने तर राज्यात अजय अशरच्या रुपाने सरकारी तिजोरी लुटण्यासाठी बसवले आहे, असा घणाघाती आरोप …
Read More »