Breaking News

राजकारण

हाच तुमचा नवीन भारत आहे का? मुस्लिमांसोबतच्या त्या व्हिडिओवर संताप

राजधानी दिल्ली येथील एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये मुस्लिम बांधव नमाज पठण करत असून, त्यांना पोलीस लाथांनी मारहाण करीत असल्याचे दिसून येत आहे. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, शाहू महाराज आणि डॉ आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्य करीत असलेली लंडन मधील वास्तू शासनाने आपल्याकडे घेतल्याचा अभिमान आहे, त्याचीच प्रतिकृती माणगाव येथे साकार करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एैतिहासिक परिषद माणगाव येथेच झाली होती. या दोघांचे संयुक्त स्मारक माणगाव येथे उभारण्याचा आपला संकल्प असून त्यासाठी १९९ कोटी रुपयांचा …

Read More »

काँग्रेसची ३९ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहिरः राहुल गांधी वायनाड

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपली ३९ उमेदवारांची यादी आज जाहिर केली. काँग्रेस नेते तथा राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील अमेठीबरोबरच केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज जाहिर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र काँग्रेसने आज जाहिर केलेल्या ३९ उमेदवारांच्या यादीत दक्षिण भारतातील आणि ईशान्य भारतातील उमेदवारांची यादी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही,… २ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल

राज्यात ‘माविम’ अंतर्गत १० हजार ५०० गावात, २९५ शहरात एकुण १ लाख ६५ हजार बचत गटांमार्फत २० लाख महिला जोडल्या असून राज्य शासनाने सुरू केलेले मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान २ कोटी महिलांच्या आयुष्यात क्रांतीकारी बदल घडवणारे अभियान ठरले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कोल्हापूर जिल्हयातील हातकणंगले तालुक्यातील …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान, डिक्लेरेशनमध्ये लिहिलेल्या बायकोला पंतप्रधान….

लोकसभा निवडणुका लागणार आहेत, मोदींनी घोषणा केली आहे की, ४०० पार जागा निवडून आणणार आहोत. लोकांनी ठरवलं पाहिजे की, या ४०० पैकी ४८ जागा या महाराष्ट्रात आहेत. ४०० मधून ४८ गेले की ३५२ राहतात. त्यामुळे ४८ जागा कमी करणे ही आपली जबाबदारी आहे. त्या ४८ जागा आपण कमी करूया असे …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, … हा भाजपाचा ‘चुनावी जुमला’

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची चाहूल लागल्याने भारतीय जनता पक्ष एक एक जुमले फेकत आहे. महिला दिनाचे औचित्य साधत गॅस सिलिंडर १०० रुपयाने कमी केला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत ४५० रुपयांनी गॅस सिलिंडर देण्याचे होर्डींग लावले पण सत्ता येऊनही अद्याप ४५० रुपयांचे सिलिंडर काही आले नाही. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळीही दोन सिलिंडर …

Read More »

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल

आज जागतिक महिला दिन आहे. हा मंगलयोग साधून नारीशक्तीला वंदन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १०० रुपयांची कपात केली आहे. तुमच्या सरकारचे पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी कोणत्या निवडणुकीच्या तोंडावर नऊवरून १२ सिलिंडर वाढवले होते..’ जरूर वाचा, म्हणजे काँग्रेसी “जुमला “कळेल असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित केला. …

Read More »

निवडणूक आयोगाचे सरकारला आदेशः राजकीय नेत्यांचे फोटो तातडीने हटवा

देशातील लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम आणि त्यासाठीची आचारसंहिता लागू होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक तत्वे जाहिर करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील निवडणूक मुख्याधिकारी यांनी राज्य सरकारला आदेश बजावत राज्य सरकारच्या मालकीच्या विविध संकेतस्थळावरील राजकिय नेत्यांचे फोटो तात्काळ आणि विनाविलंब हटविण्याचे आदेश राज्याच्या …

Read More »

अखेर महागाईवर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सवर बोलले, गॅस दरात १०० रू. कपात

मागील ९ वर्षापासून आणि विशेषतः कोरोना काळापासून इंधन आणि गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य ते मध्यम वर्गातील कुटुंबियांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मात्र तरीही काटकसरीची परिसिमा गाठत सर्वसामान्य नागरिक आणि महिला वर्गाकडून आपल्या प्रपंचाचा गाडा ओढला जात आहे. या सगळ्या घडामोडींवर मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत …

Read More »

नाना पटोले म्हणाले की, भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्चला महाराष्ट्रात तर…

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करणार असून या यात्रेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. नंदूरबार येथून ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल व १७ मार्चला मुंबईत समारोप होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात न्याय यात्रेची सांगता सभा होणार आहे. या सभेला इंडिया आघाडीचे …

Read More »