Breaking News

राजकारण

ज्योती मेटे यांनी घेतली शरद पवार यांची भेटः बीडमध्ये होणार सामना

शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक स्व.विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी विनायक मेटे यांचा राजकिय वारसा चालविण्याची इच्छा व्यक्त करत लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु ज्योती मेटे या कोणत्याही राजकिय पक्षाच्या सदस्या नव्हत्या. या सगळ्या घडामोडीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता जारी करण्यात आली. त्यामुळे अखेर निवडणूकीच्या रिंगणातून राजकारणात …

Read More »

वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला ७ जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव !

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवले असून, यात राज्यातील काँग्रेस पक्षाच्या ७ जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या पत्रात प्रकाश आंबेडकर म्हणाले की, १७ मार्च रोजी मुंबईतील ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या समापन महासमारंभात तुम्हाला आणि राहुल गांधी …

Read More »

संरक्षित स्मारक परिसरात विनापरवानगी जाहिरात अथवा चित्रीकरणास प्रतिबंध संचालक डॉ. तेजस गर्गे यांची माहिती

गेटवे ऑफ इंडिया, मुंबई हे राज्य संरक्षित स्मारक महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तू शास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० अन्वये राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. अधिनियमातील तरतुदीनुसार राज्य संरक्षित स्मारक परिसरात कोणतीही जाहिरात करण्याअगोदर त्याचप्रमाणे कोणताही कार्यक्रम अथवा चित्रीकरण करण्याकरिता संचालनालयाची विहीत पद्धतीने लेखी परवानगी प्राप्त …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती, महाविकास आघाडीसोबत युतीसाठी दरवाजे सदैव उघडे

काँग्रेसकडे आम्ही कोणत्याही अटी ठेवलेल्या नाहीत. आम्ही केवळ एवढेच म्हणालो आहोत की, त्या तुमच्या ७ जागांबाबत माहिती द्या. आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करायला तयार आहोत. आमच्यासोबत त्यांचा कोणताही संवाद झाला नाही. मात्र, आम्ही आशा करतो की, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसने या प्रस्तावावर त्यांचा काय विचार आहे ते कळवावे, असे …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, राज ठाकरेंशी युती करून भाजपा कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार ?

भारतीय जनता पक्षाने राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेऊन भाजपाने उत्तर भारतीय बांधवांचा फक्त विश्वासघातच केला नाही तर त्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावला आहे. उत्तर भारतीय बांधवांना लाठ्या काठ्यांनी मारणा-या राज ठाकरेंना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार आहे? असा सवाल …

Read More »

राहुल गांधी यांच्या त्या विधानावरून पंतप्रधान मोदींचा निशाणा; टीएमसीकडून तक्रार दाखल

लोकसभा निवडणूकीच्या प्रत्यक्ष रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात या रणधुमाळीचा धुराळा अद्याप उडायला सुरुवात झालेली नसली तरी दक्षिण भारतातील केरळ, तामीळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मात्र लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला रंग चढण्यास सुरुवात झालेली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मेव्हणीने सीता सोरेन यांनी झारखंड …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, ‘घड्याळ’ चिन्ह वापरा पण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे जाहिर करा

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याचा दावा करण्यात आला. परंतु आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणूकीत निवडणूक चिन्ह म्हणून तुतारी चिन्ह वापरण्यास मान्यता देत अजित पवार गटाच्या निवडणूक घड्याळ निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात …

Read More »

राज ठाकरे आणि अमित शाह यांची दिल्लीत चर्चा

लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता जाहिर होऊन आज जवळपास चार दिवस झाले. मात्र देशातील सर्व लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी कोणत्या राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांकडून अद्याप जाहिर करण्यात आलेली नाही. निवडणूकांची प्रत्यक्ष नोटीफीकेशन जाहिर होण्यास अद्याप काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. त्यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या युत्या-आघाड्या आणि राजकिय समीकरणं साधण्याला सध्या …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे एसबीआयला आदेश, २१ मार्चपर्यंत सर्व तपशील सादर करा

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्टेट बँक ऑफ इंडियाला इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित सर्व तपशीलांचा संपूर्ण खुलासा करण्याचे निर्देश दिले, ज्यात खरेदीदार आणि प्राप्तकर्ता राजकीय पक्ष यांच्यातील दुवा उघड करणाऱ्या बाँड क्रमांकांचा समावेश आहे, त्याची सविस्तर माहिती २१ मार्चपर्यंत सादर करावी असे निर्देश दिले. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने …

Read More »

बिहारमध्ये भाजपा, जनता दल युनायटेडचे जागा वाटप जाहिर

सोमवारी जाहीर झालेल्या जागावाटप करारानुसार भाजपा बिहारमध्ये १७ जागा लढवणार आहे, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील JD(U) आगामी लोकसभा निवडणुकीत १६ जागा लढवणार आहे, असल्याची माहिती भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितले. बिहार एनडीए आघाडीच्या सदस्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी जागावाटपाची घोषणा केली. जागावाटप …

Read More »