कृषी विभागाचा पदांबाबतचा आकृतीबंधाचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. त्याचे काम पूर्ण करुन कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही तत्काळ सुरु करण्यात येईल. या पदभरतीची जाहिरात येत्या १५ दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. विधानपरिषदेत सदस्य सतिष चव्हाण यांनी कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याबाबत प्रश्न उपस्थित …
Read More »अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदेंनी आश्वासन दिल्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधा कृषी मंत्री अब्दुल सत्तार पोहोचले धुळे जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांचे पाहणीसाठी पोहचले
मागील आठवडाभरात जवळपास दोनवेळा अवकाळी पावसाने झोडपल्याने हाता तोंडाशी आलेली पिके हातची निघुन गेली. आधीच शेतमालाला भाव मिळत नसताना आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला या अवकाळी पावसाने चांगलाच तडाका दिल्याने शेतकरी अधिकच संकटात अडकल्याचे चित्र दिसू लागले. याप्रश्नी सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात सातत्याने आवाज उठविला. मात्र राज्य सरकारकडून कोणतीही मदत …
Read More »धनंजय मुंडे यांच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, प्रलंबित प्रस्ताव तातडीने काढणार हरभरा खरेदी केंद्र सुरू करा नाफेडशी चर्चा करून प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यात येतील
एकीकडे पाऊस व गारपिठीने राज्यातील शेतकरी हैराण आहे. गारपीठ व पावसाने आपला हरभरा खराब होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांना तो हरभरा खरेदी केंद्रावर विकायचा आहे. मात्र राज्यात नाफेडद्वारे चालवण्यात येणारी बहुतांश हरभरा खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. नाफेडकडे हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठीचे बरेच …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत अंतिम करणार शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे
गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीक्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून येत्या दोन दिवसांत हे पंचनामे पूर्ण केले जातील आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधान …
Read More »अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या चिखलातः जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना बसला फटका निसर्ग कोपलाः गारपीठाचा मारा, शेतकरी झाला हवालदिल
शेतकऱ्यांच्या आयुष्यात समाधान आणि आनंदाचा उष:काल होईल असं वाटत असतानाच आज पुन्हा त्याच काळरात्रीच्या दिशेला शेतकरी लोटला गेलाय. हा उष:काल उजाडण्याआधीच शेतकऱ्यांच्या नशिबात नको असलेल्या संकटाची काळ रात्र आलीय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. इतकी मेहनत केली, संघर्ष केला, यातना सोसल्या, वेळप्रसंगी अपमान सोसले, पण तरीही शेतकऱ्यांना पुन्हा पदरी यातनाच पडल्या …
Read More »दूध भेसळ रोखण्यासाठी कडक कारवाई करणार दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अन्न व औषध प्रशासनाकडे ‘आरे’कडील कर्मचारी वर्ग वळवून दूध भेसळ रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. सदस्य हरिभाऊ बागडे, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री विखे- पाटील म्हणाले की, येणाऱ्या काळात दूध भेसळ रोखण्यासाठी …
Read More »कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे आश्वासन, पीक विम्याची थकीत ५०३ कोटी रक्कम १५ दिवसांत ५० लाख, ९८ हजार ९९ शेतकऱ्यांना २ कोटी ३५६ लाख भरपाई
पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई देत असून उर्वरित ५०३ कोटी रुपयांची रक्कम पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत दिली. तसेच केवळ एक रुपयांत पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे, हा राज्य सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी विरोधकांच्या …
Read More »शेतकरी-कष्टकऱ्यांचे लाल वादळ मुंबईच्या दिशेनेः विधानभवनाला घालणार घेराव नाशिक ते मुंबई लॉग मार्च, मंत्री दादाजी भुसे भेटणार मोर्चाच्या प्रतिनिधींना
मागील काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना त्यांनी कष्टातून पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तसेच थकित वीजबीलामुळे शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्यात येत आहे, त्यातच अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. या सगळ्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने तात्काळ मदत जाहिर करणे अपेक्षित असताना आणि विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले …
Read More »१०१ शेतकऱ्यांची मागणीः पिकाला भाव मिळत नाही, राष्ट्रपतीजी इच्छा मरणाला परवानगी द्या राष्ट्रपती मुर्मु यांना पत्र लिहित केली मागणी
मागील काही महिन्यापासून नगदी पिकं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा, द्राक्षे, कापूस आदींसह भाजीपाल्यास बाजारात चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला आणि अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने इच्छा मरणा परवानगी द्यावी अशी मागणी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे केली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील १०१ शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडत …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, राज्यात २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करणार सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचा कणेरी मठ येथे शुभारंभ
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना व उपक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले जात असून २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी केले. कणेरी मठ येथे २० ते …
Read More »