Breaking News

कृषी

या योजनांसाठी केली पहिल्या टप्प्यात २ लाख शेतकऱ्यांची निवड कृषि योजनांसाठी प्रथमच ऑनलाईन सोडत-कृषि मंत्री दादाजी भुसे

मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांनी केलेल्या एकाच अर्जावर कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नुकतीच प्रथमच ऑनलाईन सोडत काढण्यात आली. त्याद्वारे राज्यातील २ लाख शेतकऱ्यांची पारदर्शकपणे निवड करण्यात आली आहे. यांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन, विशेष घटक योजना, नविन विहीरी व फलोत्पादनाच्या विविध बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती …

Read More »

बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांची माहिती

 मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री संबंधातील वाढत्या तक्रारी ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबधित कंपन्यावर गुन्हे दाखल केले जातील, असे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या रब्बी हंगामात एका कंपनीमार्फत सप्टेंबर, २०२० कालावधीत सुमारे ८ टन …

Read More »

केंद्राच्या दडपशाही विरोधात ६ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांचा चक्का जाम शेतकरी नेत्यांनी दिली हाक

मुंबईः प्रतिनिधी दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत आहे. सरकारने चारही आंदोलन स्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले आहे. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्न पदार्थ यांचा पुरवठा बळाचा वापर करत तोडण्यात आला आहे. भाजपचे कार्यकर्ते स्थानिक व्यापारी असल्याचे भासवत आंदोलकांवर पोलिसांच्या मदतीने …

Read More »

‘पोक्रा’ अंतर्गत गावांची माहिती आता एका क्लिकवर! कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ऑनलाईन ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिकेचे प्रकाशन

मुंबई : प्रतिनिधी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची गावातील सद्यस्थिती आता एका क्लिकवर पाहता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची माहिती सर्वांसाठी पारदर्शकपणे खुली झाली आहे. प्रकल्पाच्या संकेतस्थळावर ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिका तयार करण्यात आली असून, कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या …

Read More »

शेतकऱ्यांनो वीज बीले भरा आणि ५० टक्के सवलत मिळवा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कृषीपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी धाडसी पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 चे लोकार्पण वर्षा येथील समिती कक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. महावितरणने तयार केलेल्या कृषी …

Read More »

मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात हजारो शेतकरी मुंबईत होतायत पायी दाखल हजारोंच्या संख्येने पायी, वाहनाने मुंबईत दाखल होणार

भिवंडी: प्रतिनिधी केंद्र सरकारच्या तुघलकी कृषी कायदे रद्द करण्यासाठी आणि शेती मालाला किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी नवी दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील हजारो शेतकरी पायी आणि वाहन मार्चने मुंबईकडे रवाना होत आहेत. मुंबईत आल्यानंतर राज्यातील शेतकरी राजभवनला घेराव घालून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती अखिल भारतीय …

Read More »

भाजपा खासदाराने सांगितले, राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची कंपनी काढणार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यात नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, रोगराई आदींमुळे शेतकऱ्यांची उभी पिके हाताची जावून आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. त्यातच अनेक पीक विमा कंपन्या या पंचनामे करून विम्याचे पैसे शेतकऱ्याला देत नसल्याने शेतकऱ्यांची एकप्रकारे फसवणूकच होते. त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून राज्य सरकार स्वत:च पीक विमा कंपनी काढणार …

Read More »

पक्षी मृतावस्थेत आढळतायत तर मग या क्रमांकावर फोन आणि या गोष्टी करा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरीत संपर्क करा- सुनिल केदार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैदयकिय दवाखान्या मध्ये याची माहिती दयावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोलफ्री दुरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची …

Read More »

सरकारी खरेदी केंद्रांवर परराज्यातून धान आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने सुरु केलेली धानखरेदी केंद्रे ही आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी असून या केंद्रांवर परराज्यातलं धान विक्रीसाठी येऊ नये, त्यातून राज्याचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणासारख्या परराज्यांच्या सीमांवरील नाक्यांवर कडक तपासणी मोहिम राबवावी. परराज्यातून किंवा व्यापाऱ्यांकडून राज्यातील केंद्रांवर अवैध मार्गाने धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल …

Read More »

शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळे थेट ग्राहकांपर्यत पोहोचविण्याकरिता ‘नोगा’ ब्रँड मुल्यसाखळी विकसित करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक गटांचा भाजीपाला, फळे थेट ग्राहकांपर्यत पोहचविण्याकरता ‘नोगा’ ब्रँडखाली मुल्यसाखळी विकसित करण्यावर भर द्यावा. शहरी भागातील रहदारीच्या ठिकाणी व महामंडळाची मालकी असलेल्या जागेवर  ‘नोगा’  उत्पादनांची  विक्री स्थळे उभारावीत, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य कृषि उद्योग …

Read More »