Breaking News

कृषी

शेतकऱ्यांसाठीही ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ राज्यातील पिकांचा नकाशा तयार करण्याचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ ठरणे आवश्यक असल्याने येणाऱ्या काळात राज्यातील पिकांचा नकाशा तयार करण्याचे उद्दिष्ट आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी ई–पीक …

Read More »

मूग, उडिदच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनो केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करा पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आ‌वाहन

मुंबई : प्रतिनिधी हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने मूग व उडीद खरेदीसाठीची नोंदणी उद्या १५ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे उडीदासाठी हमी भाव ६ हजार, मूग हमी भाव ७ हजार …

Read More »

पाऊस चांगला झाल्याने यंदा रब्बी क्षेत्रात ६० लाख हेक्टरपर्यंत वाढ अपेक्षित खरीपाच्या धर्तीवर रब्बीसाठी कृषिमंत्र्यानी प्रथमच घेतली राज्यव्यापी बैठक

मुंबई : प्रतिनिधी राज्यात खरीप हंगामाच्या धर्तीवर यावर्षी प्रथमच रब्बी हंगाम नियोजनाची राज्यव्यापी बैठक कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली. राज्यात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा रब्बीच्या क्षेत्रात ६० लाख हेक्टरपर्यंत वाढ अपेक्षीत असून ही बाब विचारात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश भुसे यांनी यावेळी दिले. पुणे येथे झालेल्या या बैठकीमध्ये कृषी विभागाचे सचिव …

Read More »

कृषी संशोधनासाठी संस्था निर्माण होणे गरजेचे केंद्रीय कृषीमंत्र्यांसमवेतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कृषीप्रधान देशात शेती ही आपली संपत्ती असून तिचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून शेतकऱ्याला सन्मान देतानाच कृषी क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात पिकेल ते विकेल याधर्तीवर शेती क्षेत्रात काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. केंद्र शासनाने शेती …

Read More »

सोमवार पासून भाजप किसान मोर्चातर्फे बँकांमध्ये ठिय्या आंदोलन मोर्चा अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे याचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना सुद्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरीता दिरंगाई करत असून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे कर्ज …

Read More »

दूधाला १० तर भुकटीला ५० रू. च्या अनुदानासाठी भाजपा-महायुतीचे आंदोलन राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाल्या महायुतीचा दावा

मुंबई : प्रतिनिधी दुधाला सरसकट १० रु.  लिटर अनुदान व दुध पावडरला प्रती किलो ५० रु. अनुदान द्यावे या मागणीसाठी  आज भाजपा, रयत क्रांती, रासप, रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) महायुतीतर्फे राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश …

Read More »

गाव चावडीवर दूधाभिषेक घालत किसान सभा व दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन दूध उत्पादकांचा राज्यव्यापी एल्गार दणक्यात यशस्वी !

अकोले-अहमदनगर : प्रतिनिधी दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी 1 ऑगस्ट रोजी राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे आंदोलन आज राज्यभर किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जोरदार यशस्वी झाले. महाराष्ट्रातील सुमारे २० जिल्ह्यांत हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनात हिरीरीने भाग घेतला आणि आपल्या दुधाचा अभिषेक गावचावडीवर घातला. …

Read More »

दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी महायुतीतर्फे १ ऑगस्टला आंदोलन भाजपाचे सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न केल्याने भाजपा, रयत क्रांती,  रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) रासप आणि शिवसंग्राम महायुतीतर्फे १ ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. महायुतीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी दिली. या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विधानसभेतील विरोधी पक्ष …

Read More »

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांचे मंत्रिमंडळाने केले अभिनंदन राज्यात गेल्या १० वर्षातली विक्रमी कापूसाची खरेदी

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असून देखील पणन विभागाने विक्रमी २१८.७३ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली. आज या संदर्भात मंत्रिमंडळाने या कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्धल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सहकार व पणन मंत्र्यांचे अभिनंदन केले. गेल्या १० वर्षात झाली नाही अशी विक्रमी खरेदी झाल्याचे प्रधान सचिव, पणन …

Read More »

२००० सालचे धोरण बदलले तरच दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा सहकारीऐवजी शासकिय दूध विक्रीला प्राधान्य देणे गरजेचे

मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील काही वर्षापासून दूध उत्पादक शेतकऱ्याना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांला प्रति लिटर मागे ५ रूपये, १० रूपये अनुदान द्यावी अशी मागणी विविध शेतकऱ्यांच्या संघटनेकडून करण्यात येत आहे. मात्र वास्तविक पाहता राज्य सरकारने २००० साली काढलेले दूधविषयक धोरणात जर बदल केला तर …

Read More »