Breaking News

Recent Posts

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरवादी, साहित्यिक, विचारवंतांची बैठक

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नामवंत आंबेडकरवादी, साहित्यिक आणि विचारवंताची एक बैठक पार पडली. या बैठकीला महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्यासह आंबेडकरवादी विचारवंत अर्जून डांगळे, डॉ भालचंद्र मुणगेकर, डॉ उर्मिला पवार, प्रज्ञा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याशिवाय काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई हे ही उपस्थित होते. लोकसभेची ही …

Read More »

नॅशनल पेन्शन योजनेच्या मालमत्तेत ११ टक्क्याने वाढ

इक्विटी मार्केटमुळे, नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मालमत्ते अंतर्गत व्यवस्थापन (AUM) मध्ये २० एप्रिलपर्यंत २७.८५ टक्के वार्षिक वाढ ₹ ११.७३ लाख कोटी (₹ ९.१७ लाख कोटी) इतकी नोंदवली गेली आहे, PFRDA च्या ताज्या आकडेवारीनुसार. अटल पेन्शन योजना (APY) सह एकूण AUM मार्च २०२४ अखेरच्या ₹ ११.७३ लाख कोटीच्या तुलनेत वाढ असल्याचे …

Read More »

HCL Technologies ने जाहिर केला डिव्हिडंड

HCL Technologies (HCLTech) ने २६ एप्रिल रोजी Q4FY24 मध्ये ३,९८६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे जो मागील वर्षीच्या याच कालावधीत ३,९८३ कोटी रुपये होता. आयटी फर्मने १८ रुपये लाभांश जाहीर केला. कंपनीने आर्थिक वर्ष २४ च्या चौथ्या तिमाहीत रु. २६,६०६ कोटींच्या तुलनेत 7.1% वाढून रु. २८,४९९ कोटी इतका महसूल …

Read More »

पतंजली फूड्सने संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला हा निर्णय

पतंजली फूड्सने शुक्रवारी सांगितले की त्यांच्या संचालक मंडळाने २६ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या बैठकीत पतंजली आयुर्वेद लिमिटेडकडून कंपनीला PAL च्या नॉन-फूड व्यवसाय उपक्रमाची विक्री करण्याच्या प्राप्त झालेल्या प्रारंभिक प्रस्तावावर चर्चा केली. PAL च्या नॉन-फूड पोर्टफोलिओ आधारावर कोणत्याही प्रकारे समन्वय वाढविण्याच्या सर्वात कार्यक्षम पद्धतीचे मूल्यमापन करण्यासाठी मंडळाने तत्त्वतः मान्यता दिली. तसेच …

Read More »

मारूती सुझुकीने जाहिर केला सर्वात जास्तीचा डिव्हिडंड

मारुती सुझुकीने मार्च २०२४ च्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ४८% वाढ नोंदवली. मार्च २०२३ तिमाहीत २६२३.६ कोटी रुपयांच्या तुलनेत मार्च २०२४ तिमाहीत निव्वळ नफा वाढून ३,८७७.८ कोटी रुपये झाला. फर्मच्या बोर्डाने प्रति शेअर रु. १२५ च्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे, जो आतापर्यंतचा सर्वोच्च आहे. मार्च २०२३ च्या तिमाहीत ३०,८९२१ कोटी …

Read More »

एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने नागरिकांना हवी असलेली माहिती मिळविणे आणि तक्रारी नोंदविण्यासाठी एनजीएसपी अर्थात नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर आलेल्या कॉल्सना सकारात्मक प्रतिसाद यासाठी नियुक्त पथकाकडून देण्यात येत आहे. निवडणूक …

Read More »

फुटपाथवर राहणाऱ्या बेघर लोकांचे अप्रतिम छायाचित्रण

आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांना कॅमेऱ्यातून फोटो क्लिक करताना पाहिले असेल, पण आम्ही तुम्हाला फूटपाथवर राहणाऱ्या अशा बेघर नागरिकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे कॅमेऱ्यातून क्लिक केलेले १३ फोटो निवडले गेले आहेत आणि माय मुंबई कॅलेंडर २०२४ हे आकर्षक कॅलेंडर बनले आहे. असे म्हणता येईल की १३५० छायाचित्रांचा हा संग्रह मुंबईकडे केवळ त्याच्या …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा शब्द, वर्षा गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवणार

देशात हुकूमशाही येता कामा नये, घटना बदलण्याचे काम केले जात आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी ही लढाई असून महाविकास आघाडीचे राज्यात व देशात इंडिया आघाडीचे सरकार आले पाहिजे. वर्षाताई गायकवाड या मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत ते कुठूनही लढू शकतात, वर्षा गायकवाड यांना माझे मत मिळणार आहे, पंजाच्या हातात मशाल आहे …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, गुजरातला परवानगी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केले?

कांदा निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करत असताना त्याकडे केंद्रातील मोदी सरकारने दुर्लक्ष केले. आता लोकसभा निवडणुका सुरु असताना मोदी सरकारने गुजरातमधील २ हजार मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. गुजरातला परवानगी देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेजारचा महाराष्ट्र का …

Read More »

पियुष गोयल यांच्या विरोधात बातमी छापल्याने पत्रकाराला धमकी

मुंबई उत्तर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या “गोयल यांना सोसवेना मासळीचा वास” या मथळ्याखाली एका दैनिकात बातमी प्रकाशित झाल्यानंतर काही अज्ञात कार्यकर्त्यांनी संबंधित बातमी देणाऱ्या  महिला पत्रकाराला घरी जाऊन धमकावल्याची धक्कादायक बाब घडली. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली (प) येथिल …

Read More »

शरद पवार यांचा हल्लाबोल, एखाद्या हुकूमशहासारखं मोदींचा राज्यकारभार

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह आज जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास …

Read More »

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. पराभवाच्या भितीने ते सैरभैर झाले असून काँग्रेस व इंडिया आघाडीवर खालच्या पातळीवर येऊन टीका करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाच्या मेहरबानीवर बसवलेले मुख्यमंत्री आहेत. भाजपा जेवढी चावी देती ते तेवढेच बोलू शकतात परंतु …

Read More »

मुंबईतील दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही मतदारसंघांमध्ये २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. आज शुक्रवार २६ एप्रिल २०२४ रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली असून दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी आजपासून नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास सुरुवात …

Read More »

Supreme Court चा बॅलट पेपरला नकार मात्र ईव्हीएम-व्हीव्हीपॅटसाठी दिले हे आदेश

देशात लोकसभा निवडणूका ७ टप्प्यात होत आहेत. आतापर्यंत देशात चार टप्प्यात किंवा फार तर दोन टप्प्यात निवडणूका पार पाडल्या जात होत्या. मात्र यंदा पहिल्यांदाज देशातील लोकसभा निवडणूका सात टप्प्यात पार पडत आहेत. यापार्श्वभूमीवर ईव्हीएम मशिन्सच्या वापराबाबत अॅड प्रशांत भूषण यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त करत ईव्हीएम मशिन्सऐवजी लोकसभा निवडणूकीत …

Read More »

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत फक्त ४३ टक्के मतदान

महाराष्ट्रासह देशभरातील ८२ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण वर्धा, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ-वाशिम या आठ लोकसभा मतदार संघात सकाळी ९.०० वाजेपर्यंत सरासरी …

Read More »