Breaking News

Tag Archives: eknath shinde

बेलापूरात तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू दोन जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले, ढिगाऱ्याखाली शोध घेण्याचे काम सुरु

बेलापूरातील सेक्टर १९ येथील शहाबाज गावात आज पहाटेच्या वेळी एक तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १ एकाचा मृत्यू, अनेक जण जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुर्दैवाने वेळीच मदत कार्य करणाऱ्या एनडीआरएफच्या जवानांनी मदतकार्य सुरु केल्याने दुपारपर्यंत ५५ जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सदरची …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्यांची मदत घ्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले. या घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची महानगर पालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

गौरी गणपती उत्सवानिमित्त शिधापत्रिकाधारकांना मिळणार “आनंदाचा शिधा” १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना मिळणार लाभ

यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा” वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रती संच १०० रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या “आनंदाचा शिधा” संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या शिधा जिन्नसांचा समावेश असणार आहे. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश,शासकीय कार्यालयात उमेदवारांना इंटर्नशीपची संधी द्या मंजूर पदांच्या पाच टक्के किंवा किमान एकास प्रशिक्षणाची संधी

राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशीप – प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून संधी उपलब्ध करून द्या. मंजूर पदाच्या कमीत कमी पाच टक्के आणि किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल यासाठी नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. ‘लाडका भाऊ’ म्हणून या योजनेला पसंती मिळाली आहे. यात पात्र …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, नाशिक, छ, संभाजीनगर, सोलापूरात कांदा महाबँक सुरु करा अणुऊर्जेच्या वापराने कांद्याची नासाडी रोखणार

कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत असून राज्यात नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. कांदा महाबॅंक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी आर्मी, नेव्हीच्या तुकड्या देखील सज्ज

राज्यातील मुंबईसह पुणे रायगडसह जवळपास अनेक जिल्ह्यांमध्ये कालपासून आणि पहाटेपासून मुसळधार पावसामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणावर सखल भागात पाऊसाचे पाणी जमा झाले. तर अनेकांना घरातून बाहेर पडणे शक्य झाले नाही. तर अनेक नदी-नाले तुडूंब भरून वाहु लागले. शिवाय अनेक भागात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे नदी-नाल्याच्या पुलावरून पाणी भरून वाहु लागल्याने अनेक …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, हळद उत्पादनाचे क्लस्टर करणार हळद उत्पादनातून मराठवाडा, विदर्भात सुवर्णक्रांती

देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत येथे होत आहे देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मराठवाडा, विदर्भ सारख्या दुष्काळग्रस्त भागात हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. सह्याद्री …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी सरकारडे पैसे, पण शेतकऱ्यांसाठी नाही महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा

राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झालेली आहेत, कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्यच आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, महायुती सरकारनेही संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय मेढपाळ, एमआयडीसीसाठी जमिन आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

जवळपास दोन आठवड्यानंतर राज्याच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत धनगर समाजासाठी राबविण्यात येणाऱी योजना अशीच पुढे सुरु ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेत शेत पिकांच्या नुकसानीची मोजणी करण्यासाठी अदयावत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ५१ सदनिका भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेत नाशिक मधील एमआयडीसीसाठीही १६ …

Read More »

दिव्यांग कर्मचाऱ्यांना २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी ३० जून २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. गट ड ते गट अ च्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये ४ टक्के आरक्षण ३० जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येत आहे. याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अ …

Read More »