Breaking News

विशेष बातमी

चोकलिंगम यांची माहिती, दुसऱ्या टप्प्यासाठी दोन मतदान यंत्रे तर अकोल्यात मात्र एक

महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये १९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये मतदारांनी चांगला सहभाग नोंदवत मतदान केले असून निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. दुसऱ्या टप्प्यातील २६ एप्रिल रोजी होत असलेल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज असल्याची …

Read More »

एनजीएसपी पोर्टलवर नोंदवू शकता निवडणुकीसंदर्भातील तक्रारी

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने माहिती मिळविणे आणि तक्रारी नोंदविण्यासाठी नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर आतापर्यंत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सात हजार ९१४ नागरिकांनी आपले म्हणणे मांडले होते. त्यापैकी सहा हजार …

Read More »

मतदार म्हणून नाव नोंदवलं नाही, पण मतदान करण्याची इच्छा आहेः बातमी वाचाच

निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. या अर्जांची आणि पुरावा म्हणून जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी व हरकती मागवण्यासाठी हा साधारण १० दिवसांचा कालावधी गृहीत धरला गेला आहे. राज्यात पाचव्या टप्प्यात २० …

Read More »

मतदार म्हणून काही अडचण आहे? मग हा फोन नंबर डायल करा

भारत निवडणूक आयोगाच्या १८००२२१९५० मतदार साहाय्यता क्रमांकावर १८ एप्रिल २०२४ पर्यंत ७३१२ इतके फोन आलेले आहेत. सर्व फोन कॉल्सना व्यवस्थित उत्तरे देण्यात आली आहेत आणि आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिले आहे. यांमध्ये सर्वसामान्य माहिती, अर्जाची स्थितिगती, मतदार ओळखपत्र …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आश्चर्य, एपीएमसीच्या जमिनीवर ५ स्टार हॉटेल? गुजरात उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला

गुजरात उच्च न्यायालयाने कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC), सूरत यांना ५-स्टार हॉटेल बांधण्यासाठी आणि चालवण्यासाठी कथित गैरव्यवहार केलेल्या जमिनीचा लिलाव करण्याचे निर्देश दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (१९ एप्रिल) नकार दिला. जिल्हा मार्केट यार्ड बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनीचा लिलाव करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने योग्य असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने …

Read More »

मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी राष्ट्रपती, सरन्यायाधीश, इस्त्रोचे प्रमुखांचे आवाहन

देशातील प्रथम नागरिक आणि सर्वोच्च घटनात्मक प्रमुख पदावरील महनीय व्यक्तींनी गुरुवारी दूरदर्शनच्या माध्यमातून मतदारांना पुढे येऊन भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. निवडणुकीच्या पहिल्या फेरीच्या काही तास अगोदर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मतदारांना, विशेषत: प्रथमच मतदारांना मतदानात सहभागी होण्यासाठी आणि देशाचे भविष्य ठरवण्यात योगदान देण्याचे आवाहन …

Read More »

इराणने ताब्यात घेतलेल्या जहाजावरील पहिला भारतीय क्रु मेंबर भारतात परतली

इराणी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी ताब्यात घेतलेल्या पोर्तुगाल ध्वजांकित MSC मेष या जहाजावरील सतरा भारतीय खलाशांपैकी एक केरळमध्ये परतला आहे, अशी घोषणा परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. त्रिशूर येथील रहिवासी असलेल्या सुश्री ॲन टेसा जोसेफ १८ एप्रिल रोजी इराणहून आल्यावर सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांचे कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. “तेहरानमधील भारतीय मिशनने …

Read More »

१०५ लोकसभा मतदारसंघातील जनतेची प्राथमिकता कोणत्या मुद्यांना लोकनीती प्री-पोल सर्व्हेत दिली कारणे

मागील महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर करण्यात आली. त्यावेळी देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघामध्ये सात टप्प्यात मतदान घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केले. यातील पहिल्या टप्प्यात देशातील १०५ या सर्वात मोठ्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी थंडावला. तसेच या १०५ मतदारसंघातील उमेदवारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून १९ एप्रिल रोजी मतदान …

Read More »

५ लोकसभा मतदारसंघातील १,४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून यंदा १८-१९ या वयोगटातील १ लाख ४१ हजार ४५७ नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवमतदारांनी मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. मुख्य निवडणूक …

Read More »

चोकलिंगम यांची माहिती, पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज, १५० कंपनी तैनात

महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये १९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण १०,६५२ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत ९५,५४,६६७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी बॅलेट युनिट (बीयु) २१,५२७ तर …

Read More »