Breaking News

विशेष बातमी

पाकिस्तानी स्तंभलेखक तारेक फतेह यांचे निधनः आरएसएसने ट्विट करत वाहिली श्रध्दांजली कर्करोगाशी झुंज देत ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रख्यात पाकिस्तानी स्तंभलेखक आणि लेखक तारेक फतेह यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. तारेक फतेह मागील अनेक दिवसांपासून कर्करोगाशी संघर्ष करत होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ते ७३ वर्षांचे होते. त्यांचं कॅनडामध्ये निधन झालं असून त्यांची मुलगी नताशा फतेह यांनी याची पुष्टी केली. “पंजाबचा सिंह… हिंदुस्थानचा पुत्र… कॅनडा …

Read More »

साबरमती एक्सप्रेसप्रकरणी फाशीची शिक्षा भोगत असलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला जामीन १७ ते २० वर्षे शिक्षा भोगली म्हणून दिला जामीन

गुजरातच्या गोध्रा येथे २००२ साली साबरमती एक्स्प्रेसला आग लावलेल्या आठ आरोपींची सर्वोच्च न्यायालायने जामीनावर सुटका केली आहे. या प्रकरणातील आरोपी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. १७ ते २० वर्षे या आरोपींनी शिक्षा भोगली आहे. तर, चार आरोपींची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. धक्कादायक म्हणजे ज्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती …

Read More »

नितीन गडकरीजी, पंतप्रधान मोदीजी आणि मुख्यमंत्री शिंदेजी हाच का तो विकास? जमिनीची किंमत न देताच आदिवासींना घरातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडून जोर जबरदस्ती

काही महिन्यांपूर्वी राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार असताना मराठवाड्यातील एका रस्ते प्रकल्पासाठी स्थानिक पातळीवर शिवसेना कार्यकर्त्ये जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा जाहिर उल्लेख केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी करत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रस्ते विकासाच्या माध्यमातून विकासाची गंगा आणत सबका साथ सबका …

Read More »

अखेर राज्य सरकारला सुचले शहाणपण, तोंडदेखली का होईना केली समिती स्थापन वस्तुस्थिती तपासण्यासाठी एक सदस्यीय समिती

राज्यात सत्तांतर होऊन जवळपास शिंदे-फ़डणवीस सरकारला नऊ महिन्याचा कालावधी होत आला आहे. या नऊ महिन्यात कधी नैसर्गिक तर कधी अपघाताने निष्पाप जिवाचे बळी गेले. परंतु या प्रत्येक घटनेत संबधित व्यक्ती आणि तेथील परिस्थिती जबाबदार होती. तरीही कार्यकर्त्ये असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत तर जखमींवर शासकिय …

Read More »

जार ने पाणी विकताय परवानगी घेतली का ? ; आता ‘ही’ वाहने होणार शासन जमा अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांची माहिती

स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील ग्राहक जार मधून पाणी विकत घेतात. या पाण्याची शुद्धता, स्वच्छता आणि आरोग्य तपासण्यासाठी सध्या कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नाही. या जार मधुन पाणी विकणाऱ्यांना यापुढे अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घावी लागणार आहे. यासाठीच्या अधिसूचनेचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची …

Read More »

बिल्कीस बानो प्रकरणी आरोपींची मुक्तता; सर्वोच्च न्यायालयाने घेतले गुजरात सरकारला फैलावर शिक्षा पूर्ण होण्याआधीच विशेष बाब म्हणून माफी देण्याचा गुजरात सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

गोध्रा दंगलीवेळी लहान मुलीला ठार मारून बिल्किस बानो हीच्यावर सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणी १२ आरोपींना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार १५ ऑगस्ट २०२२ रोजी या प्रकरणातील गुन्हेगारांची विशेष बाब म्हणून झालेली शिक्षा माफ करत त्यांना तुरूंगातून मुक्त करण्यात आले. विशेष म्हणजे देशाच्या स्वातंत्र्य दिना निमित्त लाल किल्ल्यावरून भाषण …

Read More »

‘डॉक्टर’ बाबासाहेब, संतती नियमन आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था लेखन- डॉ. प्रदीप आवटे

“अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पातील सार्वजानिक आरोग्यावरील तरतूद किती तोकडी आहे ते पहा. एकूण अर्थसंकल्पिय खर्चाच्या अवघी अडीच टक्के! आमची खेडी पाण्यासाठी आक्रोश करत आहेत. शेकडो गावांना पाणी पुरवठ्याची कोणतीही व्यवस्था नाही. आमची खेडी म्हणजे निव्वळ उकीरडे झाले आहेत. त्यांना गाव म्हणणेच चूक आहे.ग्रामीण भागात सांडपाण्याची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे. …

Read More »

राज्यात २ दिवसांची टोलमाफी अमित शाहंसाठी की आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शिष्यगणांसाठी ? महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम १६ एप्रिलला पण टोल माफी दोन दिवसांची, गौडबंगाल काय

मागील ८ वर्षापासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आहे. मात्र परंतु श्रीलंका देश दिवाळखोरीत निघाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने मोफत सवलतींवरून आपल्या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांवर सातत्याने टीका करत असतात. मात्र आता एकप्रकारे भाजपाच्याच सहभागाने महाराष्ट्रात स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या कार्यक्रमास दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित …

Read More »

बाबरी विध्वंसाआडून चंद्रकांत पाटील यांचा नेमका कोणावर निशाणा, ‘शिंदे, फडणवीस कि ठाकरे ?’ देवेंद्र फडणवीसांची १८ दिवसांची जेलवारी आणि चंद्रकांत पाटील यांना अटक नाही

शिवसेनेतील फूटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार गेले. त्यानंतर राज्यात भाजपासोबतच्या सरकारची धुराही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. या सगळ्या परिस्थितीत जनमत आज स्थितीला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या बाजूने असल्याचे दिसून येत नाही. या सरकारबद्दल अद्यापही जनतेच्या मनात चांगली भावना नसल्याचे वेळोवेळी दिसून …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टच केले, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं हे माध्यमांचं कर्तव्य मल्याळम वृत्तवाहिनी मिडिया वन ला न्यायालयाचा दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा आदेश चुकीचा ठरवला आहे, ज्याद्वारे राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणाखाली मिडिया वन चॅनेलच्या प्रसारण परवान्याचे नूतनीकरण करण्यास सरकारकडून नकार देण्यात आला होता. गृह मंत्रालयाकडून सुरक्षेसंबंधी मंजुरी न मिळाल्यामुळे मीडिया वन चॅनेलच्या प्रसारण परवान्याचे नूतनीकरण करण्यास नकार दिला होता. त्यानंतर मीडिया वन वृत्तवाहिनीने केंद्र सरकारच्या या निर्णयाला …

Read More »