Breaking News

राजकारण

शिवसेना शिंदे गटाची लोकसभा ८ उमेदवारांची यादी जाहिरः उबाठा गटाशी संघर्ष

देशातील लोकसभा निवडणूकांचा रणसंग्रामाला चांगलीच सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज सादर करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशी सर्वच राजकिय पक्षांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच लगबग सुरु केली होती. त्यातच शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात चर्चित चेहऱ्याने अर्थात गोविंदा आहुजा यांनी प्रवेश …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, रामटेकच्या काँग्रेस उमेदवाराचे जात प्रमाणपत्र रद्दची कारवाई राजकीय द्वेषातून

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार असल्याचे चित्र देशात आहे. या पराभवाच्या भितीने भाजपाला ग्रासले असून त्याच भितीतून ते विरोधी पक्षांच्या विरोधात षडयंत्र करत आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई ही राजकीय सुडबुद्धीतून केलेली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

लोकसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ३७ स्टार प्रचारक

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी ३७ जणांची स्टार प्रचारक यादी राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली यांनी जाहीर केली आहे. या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे …

Read More »

काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द, विजय वडेट्टीवार यांचे टीकास्त्र

रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीत रद्द करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या ऐवजी त्यांचे पती यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहिर करण्यात येणार आहे. मात्र रश्मी बर्वे यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याच्या घटनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, रामटेक लोकसभा मतदारसंघातून …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून आदर्श आचारसंहितेचा भंग…

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून निवडणुक आयोगाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सुप्रीम कोर्टात अद्याप प्रलंबित आहे, त्याचा निकाल लागलेला नाही असे असताना बावनकुळे यांनी निकाल लागला असल्याचा दावा करुन मा. न्यायालयाचा अवमान केला आहे, हा …

Read More »

अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच

दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम दिलासा नाकारला. गेल्या आठवड्यात मद्य धोरण प्रकरणी अटक करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल यांनी दारू धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी झाली. अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलांनी २८ मार्चपर्यंत …

Read More »

आता महुआ मोईत्रा आणि दर्शन हिरानंदानी यांना ईडीची नोटीस

सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीला २८ मार्च रोजी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या TMC महुआ मोईत्रा आणि उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना परदेशी चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) उल्लंघन प्रकरणात चौकशीसाठी नवीन समन्स जारी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या आधारे द हिंदू या दैनिकाच्या संकेतस्थळाने दिले. ४९ वर्षीय तृणमूल काँग्रेस नेत्या महुआ मोईत्रा यांना यापूर्वीही केंद्रीय …

Read More »

‘एकत्रित या’ प्रकाश आंबेडकर यांना जितेंद्र आव्हाड यांची विनंती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बैठक होणार आहे. त्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर होईल असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार …

Read More »

अमरावतीत नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर भाजपाचे शिक्कामोर्तब

२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार होत्या. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणूकीच्या आधी राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षात दोन गट पडले. त्यातच खासदार नवनीत राणा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन पुकारले. तर स्थानिकस्तरावर शिवसेना नेते आनंदराव आडसूळ …

Read More »

नाना पटोले यांचे आवाहन, …लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

लोकसभा निवडणूक देशासाठी अत्यंत महत्वाची आहे. मागील १० वर्षात भारतीय जनता पक्षाने देश बरबाद केला आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी पुलवामा येथे ४० जवान शहीद झाले परंतु या स्फोटाचा तपास अजून लागलेला नाही. या स्फोटासाठी वापरण्यात आलेली स्फोटके नागपूरहून पाठवल्याच्या बातम्याही आल्या पण पाच वर्ष झाली अजून या स्फोटामागे कोण होते, …

Read More »