Breaking News

चोकलिंगम यांची माहिती, दुसऱ्या टप्प्यासाठी दोन मतदान यंत्रे तर अकोल्यात मात्र एक

महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये १९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये मतदारांनी चांगला सहभाग नोंदवत मतदान केले असून निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. दुसऱ्या टप्प्यातील २६ एप्रिल रोजी होत असलेल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना चोक्कलिंगम म्हणाले, दुसऱ्या टप्प्यात विदर्भ व मराठवाड्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या ८ लोकसभा मतदार संघामध्ये २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी एकूण १६,५८९ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत १ कोटी ४९ लाख २५ हजार ९१२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये इटीपीबीएसद्वारे १८,४७१ सेवा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर १२ डी अर्जाद्वारे ८५ वर्षावरील व दिव्यांग असे एकूण १४,६१२ मतदार मतदान करणार आहेत. या आठ मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) ३७,४०३ तर कंट्रोल युनिट (सीयु) १६,५८९ आणि १६,५८९ व्हीव्हीपॅट उपलब्ध असून दुसऱ्या टप्प्यात एकूण २०४ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. यापैकी हिंगोली परभणी लोकसभा मतदारसंघात तीन बॅलेट युनीट लावण्यात येणार आहेत. तर अकोला येथे १ तर इतर लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी प्रत्येकी दोन ईव्हीएम मशिन्स लावणार असल्याची माहिती दिली.

या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या निवडणूक प्रक्रियेसाठी यंत्रणा पूर्ण तयारीनिशी निवडणुकीसाठी सज्ज असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.

यावेळी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या जय भवानी या घोषणेवर आक्षेप घेत तशी नोटीस पाठविल्याबाबत विचारले असता चोकलिगंम म्हणाले की, यासंदर्भात शिवसेना उबाठा गटाने पुन्हा एकदा पुर्नविचारासाठी पत्र पाठविले आहे. मात्र वास्तविक पाहता पक्षाच्या प्रचारासाठी ऑडिओ आणि व्हिडिओ प्री सर्टीफाय करून घेणे आवश्यक आहे. मात्र नेत्यांच्या भाषणात करण्यात आलेल्या घोषणांना प्रीसर्टीफिकेशनची गरज नसल्याचे मत व्यक्त केले.

मतदान केंद्र सुरक्षेसह सज्ज

मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही रॅण्डमायझेशन (Randomization) झाले आहे. या आठ लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग (Commissioning) करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील सर्व मतदारसंघासाठी मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे.

मतदानाच्या ४८ तास आधी प्रचारास बंदी

मतदान संपण्याच्या वेळेच्या ४८ तास आधी आठही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये ४८ तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत.

मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या आहेत. इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देवून जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.

ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी सुविधा

८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या मतदान प्रक्रियेसाठी मतदारसंघनिहाय जनरल निरिक्षक आठ पोलीस निरिक्षक पाच तर खर्च निरिक्षक अकरा नियुक्त करण्यात आले आहे.

प्रतिबंधात्मक कारवाई

कायदा व सुव्यवस्थांतर्गत २२ एप्रिलपर्यंत ४९,१३४ शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. तर परवाने रद्द करून १०५७ शस्रे जप्त करण्यात आलेली आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत ९५,२५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

राज्यामध्ये १ मार्च ते २२ एप्रिल २०२४ या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे ४३.९६ कोटी एकूण रोख रक्कम तर ३४.७८ कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू ८८.३७ कोटी रुपये, ड्रग्ज २१६.४७ कोटी, फ्रिबीज ०.४७ कोटी आणि इतर बाब अंतर्गत ८७.८४ कोटी रुपये अशा एकूण ४७१.८९ कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

२६,२६५ तक्रारी निकाली

१६ मार्च ते 23 एप्रिल २०२४ या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या ३,३४५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ३,३३७ तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील २६,८१५ तक्रारीपैकी २६,२६५ निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात पूर्व प्रमाणिकरणाचे १२२ प्रमाणपत्र वितरित

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने १२२ प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

          पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी :

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

पुरूष मतदार

मतदान केलेले पुरूष मतदार

महिला मतदार

मतदान केलेल्या महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

मतदान केलेले तृतीयपंथी मतदार

एकूण मतदार टक्केवारी

1

9- रामटेक

10,44,891

 

6,66,302

(63.77%)

 

10,04,142

 

5,83,556

(58.11%)

 

52

6 (11.54%)

 

61.00%

 

2

10 – नागपुर

11,13,182

 

6,28,636

(56.47%)

 

1109876

 

578680

(52.14%)

 

223

 

28

 (12.56%)

 

54.30%

 

3

11- भंडारा-गोंदिया

9,09,570

 

6,26,275

(68.85%)

 

9,17,604

 

598675

(65.24%)

 

14

 

6

(42.86%)

 

67.04%

 

4

12-गडचिरोली -चिमुर

8,14,763

 

5,95,281

(73.06%)

 

8,02,434

 

5,67,147

(70.68%)

 

10

 

5

(50.00%)

 

71.88%

 

5

13-चंद्रपुर

9,45,736

 

6,58,448

(69.62%)

8,92,122

 

5,83,583

(65.42%)

48

 

11

(22.92%)

67.58%

 

दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघातील मतदान प्रक्रियेच्या तयारीची माहिती खालीलप्रमाणे :

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

मतदान केंद्रे

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या

बॅलेट युनिट (बीयु)

कंट्रोल युनिट

(सीयु)

व्हीव्हीपॅट

1

05 बुलढाणा

1,962

21

3,924

1,962

1,962

2

06 अकोला

2,056

15

2,056

2,056

2,056

3

07 अमरावती

1,983

37

5,949

1,983

1,983

4

08 वर्धा

1,997

24

3,994

1,997

1,997

5

14यवतमाळवाशिम

2,225

17

4,450

2,225

2,225

6

15 हिंगोली

2,008

33

6,024

2,008

2,008

7

16 नांदेड

2,068

23

4,136

2,068

2,068

8

17 परभणी

2,290

34

6,870

2,290

2,290

एकूण

16,589

204

37,403

16,589

16,589

 

दुसऱ्या टप्प्यातील मतदारांची संख्या

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

पुरुष मतदार

महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

एकुण

ETPBS द्वारे मतदान करणारे सेवा मतदार

85 +  व दिव्यांग मतदारांकडून प्राप्त झालेल्या  12अर्जांची संख्या.

1

05 बुलढाणा

9,33,173

8,49,503

24

17,82,700

4,395

2992

2

06 अकोला

9,77,500

9,13,269

45

18,90,814

3,843

2667

3

07 अमरावती

9,44,213

8,91,780

85

18,36,078

2,689

1236

4

08 वर्धा

8,58,439

8,24,318

14

16,82,771

1,521

1784

5

14 यवतमाळवाशिम

10,02,400

9,38,452

64

19,40,916

1,545

 

1842

6

15 हिंगोली

9,46,674

8,71,035

25

18,17,734

1,348

1348

7

16 नांदेड

9,55,084

8,96,617

142

18,51,843

1,689

945

8

17 परभणी

11,03,891

10,19,132

33

21,23,056

1,441

1798

एकूण

77,21,374

72,04,106

432

1,49,25,912

18,471

14612

 

मतदारांचा तुलनात्मक तपशील :-

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

2014 मधील मतदार संख्या

2019 मधील मतदार संख्या

2024 मधील मतदार संख्या

1

05- बुलढाणा

15,95,435

17,62,918

17,82,700

2

06 – अकोला

16,72,643

18,65,169

18,90,814

3

07- अमरावती

16,12,739

18,33,091

18,36,078

4

08- वर्धा

15,64,552

17,43,283

16,82,771

5

14- यवतमाळ – वाशिम

 

17,55,292

 

19,16,185

19,40,916

6

15 – हिंगोली

15,86,194

17,33,729

18,17,734

7

16 -नांदेड

16,87,057

17,19,322

18,51,843

8

17 -परभणी

18,03,792

19,85,228

21,23,056

       तिसऱ्या टप्प्यातील अंतिम उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

क्रमांक व मतदारसंघ

अंतिम उमेदवारांची संख्या

32-रायगड

13

35-बारामती

38

40-धाराशीव (उस्मानाबाद)

31

41-लातूर

28

42-सोलापुर

21

43-माढा

32

44-सांगली

20

45-सातारा

16

46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

9

47-कोल्हापुर

23

48-हातकणंगले

27

एकूण

258

तिसऱ्या टप्यातील 11 लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या संख्येचा अंतिम तपशिल खालीलप्रमाणे :

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

पुरुष मतदार

महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

एकुण

85 +  व दिव्यांग मतदारांकडून प्राप्त झालेल्या  12अर्जांची संख्या.

मतदान केंद्रे

1

32-रायगड

8,20,605

8,47,763

4

16,68,372

3,146

2,185

2

35-बारामती

12,41,945

11,30,607

116

23,72,668

431

2,516

3

40-धाराशीव (उस्मानाबाद)

10,52,096

9,40,560

81

19,92,737

4,588

2,139

4

41-लातूर

10,35,376

9,41,605

61

19,77,042

2,566

2,125

5

42-सोलापुर

10,41,470

9,88,450

199

20,30,119

2,052

1,968

6

43-माढा

10,35,678

9,55,706

70

19,91,454

2,346

2,030

7

44-सांगली

9,53,024

9,15,026

124

18,68,174

1,859

1,830

8

45-सातारा

9,59,017

9,30,647

76

18,89,740

1,272

2,315

9

46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

7,14,945

7,36,673

12

14,51,630

 

3,726

 

1,942

10

47-कोल्हापुर

9,84,734

9,51,578

91

19,36,403

3,103

2,156

11

48-हातकणंगले

9,25,851

8,88,331

95

18,14,277

1,122

1,830

एकूण

1,07,64,741

1,02,26,946

929

2,09,92,616

26,211

23,036

        

         तिसऱ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदार संघातील सन 2014 व सन 2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमधील मतदारांचा तुलनात्मक तपशील खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

2014 मधील मतदार संख्या

2019 मधील मतदार संख्या

2024 मधील मतदार संख्या

1

32-रायगड

15,32,781

16,52,965

16,68,372

2

35-बारामती

18,13,553

21,14,663

23,72,668

3

40-धाराशीव(उस्मानाबाद)

17,59,186

18,89,740

19,92,737

4

41-लातूर

16,86,957

18,86,657

19,77,042

5

42-सोलापुर

17,02,739

18,51,654

20,30,119

6

43-माढा

17,27,322

19,09,574

19,91,454

7

44-सांगली

16,49,107

18,09,109

18,68,174

8

45-सातारा

17,19,998

18,48,489

18,89,740

9

46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

13,67,362

14,55,577

14,51,630

10

47-कोल्हापुर

17,58,293

18,80,496

19,36,403

11

48-हातकणंगले

16,30,604

17,76,555

18,14,277

 

चौथ्या टप्प्यात 01 नंदुरबार, 03 जळगाव, 04 रावेर, 18 जालना, 19 औरंगाबाद, 33 मावळ, 34 पुणे, 36 शिरूर, 37 अहमदनगर, 38 शिर्डी, 39 बीड अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 13 मे 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

दिनांक 18.04.2024

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक

दिनांक 25.04.2024

नामनिर्देशन पत्र छाननी करण्याचा दिनांक

दिनांक 26.04.2024

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक

दिनांक 29.04.2024

मतदानाचा दिवस

दिनांक 13.05.2024

 

         चौथ्या टप्प्यात दि.23 एप्रिल 2024 पर्यंत खालीलप्रमाणे उमेदवार व त्यांची नामनिर्देशने प्राप्त झालेली आहेत.

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

उमेदवारांची  संख्या

नामनिर्देशनाची संख्या

1

01 नंदुरबार

04

08

2

03 जळगाव

04

05

3

04 रावेर

06

10

4

18 जालना

11

16

5

19 औरंगाबाद

21

27

6

33 मावळ

10

16

7

34 पुणे

16

19

8

36 शिरूर

10

17

9

37 अहमदनगर

10

12

10

38 शिर्डी

06

08

11

39 बीड

13

15

 

एकूण

111

153

 

Check Also

आतंरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या ५० मध्ये या भारतीय शैक्षणिक संस्थाचा समावेश

एप्रिल महिन्याच्या पहिल्या १० दिवसात जगभरातील विद्यापाठांची QS ने जागतिक क्रमवारी जाहिर केली असून या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *