मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सिंह आणि वाघ एकत्र येवून दमदार सत्ता सध्या राबवित आहोत. आणि असेच वाघ आणि सिंह एकत्र रहात २०१९ मध्येही आम्ही सत्ता राखू. वाघ आणि सिंहाच्या यांच्या वाटेत येणाऱ्या उंदरांचा निपात करू असे अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस विरोधकांच्या मूषक पूराणावर पलटवार केला.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील तुमचे मूषक पुराण ऐकले. फारच चांगले होते. त्यामुळे तुम्ही चांगले पटकथाकार आणि संवाद लेखक व्हाल मी तुम्हाला सांगतो असे सांगत त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना टोला लगावला.
या उत्तराला प्रतित्तुर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील उभे राहत म्हणाले की, तुमच्याच माणसांनी उंदीर सोडले आहेत. तर आता राज्यातील जनता वाघ, सिंह आणि उंदरी या तिघांचा बंदोबस्त जनताच करेल असे सांगत मुख्यमंत्र्यांवर कडी केली.