Breaking News

नवाब मलिकांचा नवा आरोप, जबाब बदलण्यासाठी पंचावर एनसीबी दबाव आणतेय पंचनामा मागील तारखा बदलण्याबाबत समीर वानखेडे आणि पंचामधील संभाषण मलिकांनी केले माध्यमांसमोर उघड

मराठी ई-बातम्या टीम

मॅडी नावाच्या पंच साक्षीदाराला जुन्या केसमध्ये मागील तारखेवर जबाब नोंदविण्यासाठी एनसीबीच्या किरणबाबू नावाच्या अधिकाऱ्याकडून कार्यालय सोडून अन्यत्र बोलावण्यात आल्याची संभाषणाची ऑडिओ क्लिप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर करुन एनसीबीच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा एक गंभीर आरोप केला.

नवाब मलिक यांनी त्यांच्या घराच्या मोकळ्या जागेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी दोन संभाषणाच्या ऑडीओ क्लीपही जाहिर केल्या.

एनसीबीचे वादग्रस्त विभागीय संचालक समीर वानखेडे त्या साक्षीदाराला स्वाक्षरी करण्याची सूचना देत असल्याचेही संभाषण या ऑडिओ क्लीपमध्ये असल्याचा दावा मलिक यांनी करत एनसीबी कशापद्धतीने फर्जीवाडा करत आहे याची माहिती निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.

एनसीबीचे वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध एनसीबीच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी फर्जीवाडा करणारा व चुकीच्या पद्धतीने लोकांना अडकवणारा अधिकारी असल्याचा अहवाल दिला असतानाही भाजपाचा राज्यातील एक मोठा नेता त्याला पुन्हा मुदतवाढ मिळवून देण्यासाठी केंद्रीय गृहविभागाकडे प्रयत्नशील असल्याचा गौप्यस्फोट करतानाच समीर वानखेडे याला मुदतवाढ द्या, त्यामुळे खंडणी वसूल करण्याच्या खेळात कोण कोण सहभागी आहेत हे उघड करण्याची संधी मिळेल असेही त्यांनी भाजपाला ठणकावून सांगितले.

मुख्य आरोपी करण सजलानी आहे. याशिवाय सहा आरोपी या प्रकरणात आहेत. करण सजलानी याच्याकडील माल एनसीबीने ताब्यात घेतला. त्याविरोधात अपील नाही. फर्नीचरवालाच्या विरोधात अपील नाही. मात्र समीर खानच्या विरोधात अपील दाखल करुन प्रसिद्धीचा खेळ सुरु आहे. आम्ही न्यायालयीन लढाई न्यायालयात लढू. आम्ही हे प्रकरण क्वॅश करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयात कागदपत्राद्वारे  सांगण्यात येत आहे की, ८४ किलोग्रॅम सोकॉल्ड पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये आले आहे. याच एजन्सीने लोअर कोर्टात एक किलो १०१ ग्रॅम असल्याचे लिहून दिले आहे. परंतु न्यायाधीशांनी मानले नाही. फक्त ६० ग्रॅम प्रकरण होते. फर्जीवाडयाची मर्यादा एनसीबीने पार केली आहे. जर एनसीबी प्रोफेशनल एजन्सी आहे तर एकट्या समीर खानच्या विरोधातच का हे त्यांना सांगावे लागेल असा सवालही त्यांनी यावेळी केला.

मला घाबरवण्यासाठीच असा प्रकार एनसीबी करत असेल तर मी घाबरणार नाही. जे नियम तोडून काम करत आहेत त्यांच्याविरोधात माझा लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा देत

एनसीबी अधिकार्‍याच्या घरातील लोक कोर्टात गेले. माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करण्यात आला. मला कोर्टाने बोलण्यापासून रोखले. कोर्टाचा आदर करत त्याच ऑर्डरमध्ये कोर्टाला आमच्याकडून स्पष्टपणे विचारण्यात आले एनसीबी किंवा केंद्रीय एजन्सी काही चुकीचं करत असेल तर मला बोलण्याचा अधिकार आहे, त्यामुळे नवीन फर्जीवाडा उघड करायला बंदी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आता हे प्रकरण पंचनामा बदलण्याचे आहे. याप्रकरणात एनसीबीचे डीजी किरणबाबू व समीर वानखेडे यांच्यावर काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी यावेळी केला.

स्मगलरच्यावतीने पीआर एजन्सीचा वापर केला जात आहे. ड्रग्ज पेडलर लाखो रुपये पीआर एजन्सीवर खर्च करून बातम्या पेरण्याचे काम करत आहेत असा थेटही त्यांनी यावेळी केला.

न्यायाधीश जोगळे यांनी समीर खानला जामीन देताना आपल्या ऑर्डरमध्ये फर्जीवाडा करुन लोकांना फसवण्यात आले आहे असे म्हटले आहे असे असताना समीर वानखेडेकडून पूर्वीचा पंचनामा बदलण्याचा प्रकार होत आहे. एनसीबीचाच अधिकारी आता अडचणीत येत असल्याचे समोर येताच पंचनामा बदलला जात असल्याचा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला.

एनसीबीचा फर्जीवाडा कोर्टासुध्दा आणि जनतेसमोर उघड करणार आहे. ज्याप्रकारे फर्जीवाडा झाला आहे तो मानहानीच्या केसमध्ये सिध्द करेन आणि येणाऱ्या काळात एनसीबीचे आणखी काही फर्जीवाडे समोर आणणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Check Also

राहुल गांधी यांची २४ एप्रिलला अमरावती व सोलापुरात जाहीर सभा

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघात काँग्रेस नेते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *