लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे दहा दिवस उरले असून, काँग्रेससह भाजपा आणि इतर प्रादेशिक पक्ष पूर्णतः निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील बस्तर येथे काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर टीका करताना जाहिरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याचा आरोप केला.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल रोजी विरोधी पक्ष काँग्रेसवर निशाणा साधला आणि म्हटले की, त्यांनी स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपासून गरिबांच्या गरजांकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या वेदना कधीच समजल्या नाहीत.
छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात १९ एप्रिलला मतदान होणार आहे, या रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे. काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार ही देशाची ओळख बनली होती. स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसने अनेक दशकांपासून गरिबांच्या गरजांकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या वेदना कधीच समजल्या नाहीत,” असा आरोपही यावेळी केला होता.
या टीकेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेऊन पंतप्रधान मोदींविरोधात तक्रार दाखल केली. काँग्रेसने म्हटले आहे की, पीएम मोदींनी पक्षाच्या जाहीरनाम्याबद्दल जे सांगितले आहे ते खोटेपणाचे आहे.
दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक मोहिमा सुरू केल्या आहेत, ज्यामुळे मतदारांना, विशेषत: तरुण आणि पहिल्यांदाच मतदारांना निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रेरित केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील मतदान १९ एप्रिलपासून सुरू होणार असून, १ जून हा शेवटचा टप्पा आहे.
हमने चुनाव आयोग के सामने ऐसी बात रखी है, जिसपर हम पहले भी
आपत्ति दर्ज कराते रहे हैं।जैसे..
– चुनाव प्रचार के दौरान प्रधानमंत्री द्वारा पहनी गई सेना की यूनिफॉर्म वाली तस्वीरों का दुरुपयोग हो रहा है।
– चुनाव आयोग में पहले से ही एडवाइजरी है कि चुनाव के दौरान ऐसा नहीं किया जा… pic.twitter.com/MpvPqWD43j— Congress (@INCIndia) April 8, 2024
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर काँग्रेस नेते सलमान खुर्शीद म्हणाले की, पंतप्रधान आपल्या भाषणात जे बोलतात ते पाहून आम्हाला खूप दु:ख झाले आहे, त्यांनी आमच्या जाहीरनाम्याबद्दल जे काही सांगितले आहे ते खोटेपणाचे आहे, याचे आम्हाला खूप दुःख झाले आहे. तुम्ही इतर कोणत्याही पक्षाशी असहमत असू शकता, तुम्ही त्यावर वाद घालू शकता, तुम्ही त्याचे विच्छेदन करू शकता, पण आपल्या राष्ट्रीय चळवळीत सहभागी असलेला राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आपल्या जाहीरनाम्यात असे खोटेपणाचे लिहितो, असे म्हणायचे , वास्तविक पाहता अतिशय चांगला जाहीरनामा लिहिला गेला आहे. आपल्या धर्मनिरपेक्ष समाजाच्या स्वातंत्र्याला विरोध करणाऱ्या पक्षांचा हा जाहीरनामा आहे असे दिसते… या प्रकरणामुळे आम्ही अत्यंत दु:खी आहोत आणि पंतप्रधानांना असे बोलण्याचा अधिकार नाही हे आम्हाला समजते. आम्ही हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर ठेवले आहे आणि त्यांनी गांभीर्याने घेऊन त्यावर कारवाई करण्याची विशेष विनंती केली असल्याचे सांगितले.
नरेंद्र मोदी जी ने अपने भाषणों में कांग्रेस के घोषणा पत्र को झूठ का पुलिंदा कहा है, यह काफी दुखद है।
आप किसी भी पार्टी से मतभेद रख सकते हैं, लेकिन एक राष्ट्रीय स्तर की पार्टी के घोषणा पत्र के बारे में ऐसा कहना दुखी करने वाली बात है।
PM मोदी ने यह भी कहा कि यह उन पार्टियों का… pic.twitter.com/upcALZrUbx
— Congress (@INCIndia) April 8, 2024
तर काँग्रेसचे नेते पवन खेरा म्हणाले, आम्ही अनेक मुद्दे उपस्थित केले, पंतप्रधानांनी आमच्या जाहीरनाम्याला मुस्लिम लीगचा दर्जा दिल्याबद्दल आम्ही तीव्र आक्षेप नोंदवला. आम्ही विद्यापीठांमधील पंतप्रधानांच्या होर्डिंग्जवरही आमची मते मांडली… निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्यामुळे, भारताच्या निवडणूक आयोगाने कोणाला काढायचे आहे किंवा नाही याची शिफारस करावी, केंद्रीय मंत्रालयात सध्या काळजीवाहू सरकार आहे, आणि त्यांच्याकडे कोणतेच अधिकार नाहीत. अशा प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घालण्याचा अधिकार असे असतानाही पंतप्रधान अशा पध्दतीचे वक्तव्य करत असल्याचे सांगितले.
पिछली बार हमने चुनाव आयोग के सामने फ्री-स्पीच और BJP के सोशल मीडिया हैंडल पर पोस्ट किए जाने वाले विभाजनकारी पोस्ट का मुद्दा उठाया था।
– आज हमने चुनाव आयोग से कहा है कि सूचना-प्रसारण मंत्रालय कई यू-ट्यब चैनल्स को बंद कर रहा है। इसपर चुनाव आयोग ने कहा है कि वो फ्री-स्पीच चाहते… pic.twitter.com/OATAVlTH6y
— Congress (@INCIndia) April 8, 2024