राज्यातील महाविकास आघाडीमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे बाहेर पडल्यानंतर त्यांच्या बाहेर पडण्याबाबत महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्यांनी याबाबत ब्र शब्दही काढला नाही. मात्र आज पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, एखादी गोष्टी मला किंवा कोणत्याही मंत्र्यांना सागितली व त्यांच्या कामांना नकार दिला असे …
Read More »सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेले नाही हे डोक्यात ठेवून कामाला लागा आज महागाई इतकी वाढलीय याबाबत लोकांना सांगा...केंद्र सरकारची पोलखोल करा - जयंत पाटील
प्रचाराचे तंत्र आता बदलले आहे. प्रत्यक्षात पटवून देत नाही तोपर्यंत लोकं मान्य करत नाही. त्यामुळे आपण लोकांशी बोला… आज महागाई इतकी वाढली आहे याबाबत लोकांना सांगा.. केंद्रसरकारची पोलखोल करा… या जगात सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेले नाही. हे डोक्यात ठेवून कामाला लागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मोठी करा असे आवाहन राष्ट्रवादी …
Read More »कोण अयोध्येत गेला काय किंवा राममंदिरात गेला काय… महागाईचे चटके कमी होणार का? गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची उपरोधिक टोला
कोण अयोध्येत गेला काय किंवा राममंदिरात गेला काय… सर्वसामान्यांच्या जीवनात महागाईचे जे चटके बसत आहेत ते कमी होणार आहेत का? असा संतप्त सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. महागाईकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावं आणि तुमच्या हेडलाईन्स महागाईवर कसं बोलू नये यासाठी हे सर्व केलं जातंय व त्या ट्रॅपमध्ये तुम्ही …
Read More »अजित पवारांचा खोचक सवाल, अयोध्येला जाण्याचा बोभाटा का, आम्ही गेलो… राज ठाकरेंना लगावला टोला
पुण्यात आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरे यांच्या या दौऱ्यानंतर उलट-सुलट तर्क-वितर्क लढविले जात असताना यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावत खोचक सवाल केला. अहो भारतात कोणी कुठेही जावू शकतो. त्यामुळे ज्याला अयोध्येला जायचं आहे त्याला …
Read More »गोबेल्स नीतीला मारक अशी संघटना आपल्याला तयार करायचीय देशात, राज्यात जे धार्मिक राजकारण केले जातय त्यामुळे तरुणांमध्ये अस्थिरता-जयंत पाटील
देशात, राज्यात जे धार्मिक राजकारण केले जात आहे, त्यामुळे तरुणांमध्ये एक अस्थिरता आहे. त्यांना फुले – शाहू – आंबेडकर यांच्या मार्गावर चालण्याची दिशा आपल्याला द्यावी लागेल. यासाठी वैचारिक बैठका घ्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाई येथे केले. सध्या देशात गोबेल्स नीती अवलंबिली जात …
Read More »…ही किमया राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते नागरिकांनी भाजपारुपी रावणाची जातीयवादी व धर्मवादी लंका दहन करण्यासाठी प्रतिज्ञा केली पाहिजे- महेश तपासे
पुण्यातील हनुमान मंदिरात आरती आणि मुस्लिम समाजातील बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन ही किमया फक्त सर्वधर्मसमभाव या तत्त्वांवर निष्ठा ठेवणारी राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते ती भाजप करू शकत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे. महाराष्ट्रात व देशामध्ये सांप्रदायिकतेचा नाग पुनश्च एकदा आपला फणा काढून …
Read More »विरोधकांच्या “त्या” वक्तव्यावरील टीकेनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, जर मी… नाना लढले तर तुम्हाला फेस आला जर मी लढलो असतो तर
कोल्हापूरातील पोट निवडणूकीत काहीही करून काँग्रेसच्या ताब्यातील जागा हिसकावून घ्यायचीच असा चंग बांधून कोल्हापूरात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे ठाण मांडून बसले होते. तरीही भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे सध्या चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्याची चर्चा सुरु झाली असून त्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आता हिमालयात जा अशी उपरोधिक …
Read More »माजी समेंलनाध्यक्ष सबनीस म्हणाले, मला तर संविधानाचा आवाज पवित्र राजकिय पक्षांच्या भोंगा विरूध्द आरती युध्दाला श्रीपाल सबनीसांचे उत्तर
नुकत्याच झालेल्या गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंग्याच्या विरोधात भूमिका घेत जर भोंगे काढले नाहीत तर मस्जिदीसमोर हनुमान चालिसा वाजवू असा इशारा दिला. त्यानंतर भाजपासह सर्वच राजकिय पक्षांकडून ऐनकेन प्रकारे राजकीय कुरघोड्यांचे राजकारण सुरु झाले. यापार्श्वभूमीवर मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी महत्वाचे वक्तव्य केले …
Read More »राज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले, “त्या” रस्त्याने जायचा कार्यक्रम दिसतोय भोंगा विरूध्द हनुमान चालिसावरून शरद पवारांनी व्यक्त केले मत
मागील काही दिवसांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणात जातीय समीकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकेचा भडीमार केला. त्यास शरद पवार यांनीही मुद्देसुद्द उत्तर देत राज ठाकरे यांचे आरोप परतवून लावले. मात्र आता मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसे आणि भाजपाची एकच भूमिका असल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याने आगामी काळात मनसे …
Read More »फडणवीसांच्या टीकेवर शरद पवार म्हणाले, प्रश्नाचे गांभीर्य नसणाऱ्याचं फारस गंभीर… मुंबईतल्या १३ व्या बाँम्बस्फोटावरून पवारांनी दिले उत्तर
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जाती-पातीतील संघर्ष निर्माण झाला असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. त्यानंतर मुस्लिम समुदायाचे लांगुलचालन आणि मतांचे राजकारण करण्यावरून भाजपाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या एकूण धार्मिक राजकारणाचा पडदा पाश करण्यासाठी सलग १४ ट्विट करत मुस्लिमधार्जिणे राजकारण पवार करत असल्याचा आरोप केला. …
Read More »