जनतेच्या पैशाची उधळपट्टी, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’सध्या सुरू आहे. भारत सरकार ऐवजी मोदी सरकार, असा उल्लेख या यात्रेच्या निमित्ताने करणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. सरकारच्या या गैरप्रकाराला जनतेतून प्रचंड विरोध होत आहे. या विरोधाला घाबरून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोलीस बंदोबस्तात काढण्याची नामुष्की सरकारवर ओढवली असल्याची खरमरीत टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.
विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारच्या प्रचार, प्रसिद्धीसाठी सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या वाहनावर ‘मोदी सरकारची हमी’ असे शब्द लिहिले असल्यामुळे लोकांचा विरोध वाढत आहे. या योजना भारत सरकारच्या आहेत की मोदी सरकारच्या, असा सवाल जनता विचारत आहे. सरकारी यंत्रणांचाही या यात्रेच्या नियोजनासाठी वापर होतोय. त्यामुळे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्याचबरोबर शेतकरी, युवकांची प्रचंड नाराजी आहे. आतापर्यंत विदर्भ, मराठवाडा तसेच कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, नाशिक, नंदुरबार, सातारा या जिल्ह्यात यात्रेला विरोध झाला आहे. जनतेचा विरोध पत्करून, ही यात्रा सुरू असून जनता सरकारला धडा शिकवेल, अशी टीका केली.
शासकीय यंत्रणा ही भारत सरकारची आहे, भाजप त्यांना स्वतःचे कर्मचारी म्हणून का राबवून घेत आहे?
जनतेची कामे सोडून सत्ताधारी शासकिय यंत्रणा मोदींच्या प्रचारासाठी का वापरून घेत आहे ?
कार्यालयात येणाऱ्या जनतेची कामे कोण करणार ?
संविधानानुसार ‘भारत सरकार’ आहे.
संकल्प यात्रा रथावर… pic.twitter.com/nW4pePbHC4— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) December 31, 2023
विजय वडेट्टीवार म्हणाले की, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वापर पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे प्रचारासाठी केला जातोय. राजकीय कार्यक्रमात सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये. परंतु असे असताना सध्या या नियमांचे उल्लंघन करत, ही यात्रा सुरू आहे. पोलीस बंदोबस्तात प्रचार, प्रसिद्धी करण्याची वेळ सरकारवर आली आहे. यासारखं दुर्दैव नाही. ही यात्रा म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे. त्यामुळे जनता आता या भूल थापांना बळी पडणार नाही. विकसित भारत संकल्प यात्रेला जनतेतून होणारा विरोध, म्हणजे सरकारचे दिवस आता भरले आहेत. अशा शब्दात सरकारवर टिकास्र सोडले.
भारत सरकार ऐवजी मोदी सरकार, अश्याप्रकारे व्यक्ती विशेष नावाखाली देशातील संविधानिक सरकारचा उल्लेख करणे हा देशाचा अपमान आहे. तसेच लोकशाहीसाठी सुद्धा अत्यंत घातक आहे.
जनतेच्या पैशाची उधळपट्टी, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरू आहे.
जनतेच्या पैशाची…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 1, 2024