Breaking News

Tag Archives: modi government

विजय वडेट्टीवार यांची टीका, ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोलीस बंदोबस्तात…

जनतेच्या पैशाची उधळपट्टी, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’सध्या सुरू आहे. भारत सरकार ऐवजी मोदी सरकार, असा उल्लेख या यात्रेच्या निमित्ताने करणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. सरकारच्या या गैरप्रकाराला जनतेतून प्रचंड विरोध होत आहे. या विरोधाला घाबरून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोलीस बंदोबस्तात काढण्याची नामुष्की सरकारवर ओढवली …

Read More »

कांद्यावरून शरद पवार यांची टीका, चुकिच्या धोरणामुळे… कष्टाला किंमत नाही

कांदा हे दिलदार शेतकऱ्यांचे पीक आहे, कांदा हे असे पीक आहे की, दोन पैसे त्याच्यात मिळतात त्यासाठी तुम्ही सर्व कष्ट करतात पण, दुर्दैवाने ज्यांच्या हातात देशाचे धोरण ठरवायचे अधिकार आहे या सर्वांमध्ये तुमच्या कष्टाला किंमत द्यावी ही भावना क्वचित ही नाही; केंद्र सरकारमध्ये जे सत्ताधारी बसलेले आहेत त्यांना मी जाऊन …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयः कलम ३७० ही तात्पुरती तरतूद

२०१९ साली केंद्रातील मोदी सरकारने जम्मू व काश्मीर राज्याला कलम ३७० कलमान्वये देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापाठीने आज योग्य ठरविला. सर्वोच्च न्यायालयात चार वर्षापूर्वी दाखल करण्यात आलेल्या या संदर्भातील याचिकेवर आज मुख्य सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठाने केंद्र …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, दुष्काळ निवारणासाठी.. .सरकारचा अक्षम्य हलगर्जीपणा वाढीव दुष्काळी महसूल मंडळांना सरकारने आर्थिक मदत करावी

दुष्काळ जाहीर करण्याचे निकष आणि वेळ सरकारने पाळली नाही. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक वेळीच घेतली नाही. सरकार सत्ता टिकवण्यात गुंग असल्याने प्रशासनावर वचक नाही. या सरकारच्या गोंधळामुळे आता दुष्काळ निवारणासाठीच्या निधीवर टाच आली आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करताना केलेल्या गलथानपणामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची …

Read More »

मोदी सरकारच्या काळात शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

२०१९ च्या लोकसभा निवडणूकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा भाजपाकडून भारत हा विश्वगुरु आणि जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उभी रहात असल्याचा प्रचार सुरु केला. तसेच अनेक पाश्चिमात्य देश भारतातील पुराणतील संदर्भाचा वापर करून पुढे जात असल्याचे जाहिरपणे सांगितले जाऊ लागले. तसेच देशाच्या शिक्षण पध्दतीत बदल करून रोजगारक्षम देणारी शिक्षण …

Read More »

सरकारने अल्पबचत योजनेत बदल केले, पीपीएफचे आकर्षण वाढले ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासह अनेक लहान बचतीचे नियम बदलले

सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासह अनेक लहान बचतीचे नियम बदलले आहेत. यामुळे ते गुंतवणुकीसाठी अधिक आकर्षक झाले आहेत. नवीन नियमांनुसार, आता तुम्हाला ज्येष्ठ नागरिक बचत योजना उघडण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ मिळेल. फक्त एक महिन्याचा कालावधी शिल्लक होता. यासंदर्भात सरकारने ९ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी …

Read More »

२०२४ निवडणूकीपूर्वी महिला आरक्षण लागू करा: सर्वोच्च न्यायालय म्हणते, मुद्दा चांगला पण…

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी पाच दिवसांचे विशेष अधिवेशन मोदी सरकारने बोलावित देशभरातील महिला वर्गाला खुश करण्यासाठी महिला आरक्षण विधेयक मंजूर करवून घेतले. मात्र हा कायदा २०२४ च्या लोकसभा निवडणूका झाल्यानंतर जणगणना आणि मतदारसंघांची पुर्नरचना झाल्यानंतर लागू करण्याची घोषणा केली. त्या विरोधात काँग्रेसच्या नेत्या डॉ जया ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल …

Read More »

मोदी सरकारचा फतवाः अधिकाऱ्यांनो रथयात्रा काढा, काँग्रेसची टीका सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सरकारच्या कामाचा प्रचार करण्याचे निर्देश

आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचे वेळापत्रक जाहिर झाले आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रियाही सुरु झाली आहे. देशभरातील प्रमुख राजकिय पक्ष निवडणूकीच्या प्रचाराला लागले आहेत. मात्र नेहमीप्रमाणे मोदी सरकारमधील बहुसंख्य खासदार, मंत्री आणि विविध राज्याचे मुख्यमंत्री यासह स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही प्रचाराच्या कामात व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारित …

Read More »

सचिन सावंत यांचा आरोप, मोदी…. नापास जागतिक भूक निर्देशांकात पाकिस्तानपेक्षाही भारत खालच्या स्तरावर हे मोदींचे मोठे अपयश

जगात भारताचा डंका वाजत असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या तथाकथित विश्वगुरू नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताचा भूक निर्देशांक आणखी ४ स्थानांनी घसरला असून १२५ देशांमध्ये भारत १११ व्या स्थानावर आला आहे. भूक आणि उपासमारीला सामोरे जाणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार भारत आता पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशच्याही खाली घसरला आहे ही बाब आपल्यासाठी भूषणावह नाही. …

Read More »

संसदेतील मार्शल्सचा ड्रेस कोड बदलला, मोदी सरकारचा आणखी एक बदल सफारी जाऊन लष्करी साधर्म्य असलेला पोशाख निश्चित

भाजपाप्रणित नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून मागील काही वर्षांपासून दिल्लीतील कधी रस्त्याचे नाव बदल तर कधी पाठ्यपुस्तकातून प्रमाणित इतिहास बदल, तर कधी गुलामीचे प्रतिक म्हणून संसद बदल असे अतार्किक निर्णय घेण्याचा सपाटाचा लावला. त्यातच आज संसदेत मागील ७५ वर्षापासून असलेल्या मार्शल्स अर्थात सुरक्षा अधिकाऱ्यांचा ड्रेसकोड अर्थात पोषाख बदलत त्यांना …

Read More »