कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान काढण्यात आलेली भारत जोडो यात्रा श्रीनगर मध्ये पोहोचली. या यात्रे दरम्यान, अनेक व्यक्ती, तरूण आणि मुली-महिला राहुल गांधी यांना भेटत होत्या. त्याच्यावर झालेल्या अन्यायाची, संकटाची, अडचणींची माहिती देत होत्या. भारत जोडो यात्रा काश्मीर मध्ये पोहोचल्यानंतर श्रीनगर येथे झालेल्या जाहिर सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यात्रे दरम्यान काही भेटलेल्या महिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे बलात्काराच्या घटना घडल्याचे विधान केले होते. या गोष्टीला ४५ दिवस उलटल्यानंतर दिल्ली पोलिस रविवारी सकाळीच राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचून त्या वक्तव्याची माहिती मागितली.
बलात्कार पीडितांवरील वक्तव्यावर चौकशी करण्यासाठी विशेष पोलीस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था सागर प्रीत हुड्डा यांना राहुल गांधी भेटले. तब्बल दोन तास त्यांच्या विविध प्रश्नांना राहुल गांधी यांनी उत्तरे दिली. आयुक्त म्हणाले की, आम्ही राहुल गांधी यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल माहिती मागितली. राहुल यांनी थोडा वेळ मागितला आहे आणि म्हणाले की, मी लवकरच माहिती देईन.
विशेष पोलीस आयुक्त हुड्डा म्हणाले की, राहुल यांनी सांगितलं की भारत जोडो यात्रेदरम्यान ते अनेक लोकांना भेटले. त्यानंतर त्यांनी ते वक्तव्य केलं होतं. सर्व माहिती जोडायला थोडा वेळ लागेल. आवश्यकता असल्यास आम्ही राहुल गांधी यांची पुन्हा चौकशी करू असेही सांगितले.
राहुल गांधी ३० जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये एका सभेत म्हणाले की, अनेक महिला मला भेटायला आल्या होत्या, त्या रडत होत्या, खूप दुःखी होत्या. त्यापैकी काही महिला म्हणाल्या की, त्यांच्यावर बलात्कार झाला आहे, त्यांचं लैंगिक शोषण झालं आहे. मी त्यांना म्हणालो की, मी पोलिसांना याबद्दल सांगू का. त्यावर त्या महिला म्हणाल्या की, राहुलजी ही गोष्ट आम्हाला केवळ तुम्हाला सांगायची होती. पोलिसांना याबद्दल सांगू नका. अन्यथा आम्हाला अधिक नुकसान सहन करावं लागेल.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर पोलिसांचं एक पथक १५ मार्च रोजी राहुल गांधी यांच्या घरी गेले होते. पथकाने तीन तास वाट पाहिली. परंतु राहुल भेटले नाहीत. १६ मार्च रोजी एक वरिष्ठ पोलीस अधिकारी पुन्हा एकदा राहुल यांच्या घरी गेले. त्यांनी देखील दीड तास वाट पाहिली. त्यानंतर राहुल यांच्याशी पोलीस अधिकाऱ्यांची भेट झाली. त्यानंतर राहुल यांनी नोटीस स्वीकारली. त्यानंतर काँग्रेसने सांगितले की, योग्य वेळी कायद्याने नोटीशीचे उत्तर दिले जाईल.
दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, दिल्ली पोलिसांना महिलांची इतकी काळजी आहे तर ते फेब्रुवारी महिन्यात राहुल यांच्याकडे का गेले नाहीत. भारत जोडो यात्रा संपून ४५ दिवसांनंतर चौकशी केली जात आहे. राहुल गांधी यांची लीगल टीम याला कायदेशीर उत्तर देईल.
A govt rattled by Shri Rahul Gandhi’s questions on PM Modi & Adani’s relationship hides behind its police.
45-days after Bharat Jodo Yatra was completed, Delhi Police has, via a notice, sought details of women who met him & spoke about harassment & violence they may have faced. pic.twitter.com/XBJrWFsd5H
— Congress (@INCIndia) March 16, 2023