Breaking News

राज्यसभासाठीच्या ५७ पैकी ४१ जागी बिनविरोध निवडणूक; हे उमेदवार आले निवडूण कपिल सिब्बल, पी.चिदमबरम, राजीव शुक्ला आदी विजयी

राज्यसभेतून १५ राज्यांतील ५७ सदस्य निवृत्त झाल्याने त्यासाठी आज मतदान घेण्यात आले. एकूण ५७ जागांपैकी ११ राज्यांतील ४१ जागांवर बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. तर उर्वरित जागांवर मतदान घेण्यात आले असून त्या ठिकाणची मतमोजणीला लवकरच पार पडणार आहे. रात्री उशीरा पर्यंत चार राज्यातील १६ जागांचे निकाल हाती येणार आहेत.

त्याचवेळी ४ राज्यांमध्ये १६ जागांसाठी आज मतदान होत आहे. ज्या ४१ जागांवर खासदार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आणि छत्तीसगडसह ११ राज्यांच्या जागांचा समावेश आहे. निवडून येणाऱ्यांमध्ये नुकतेच काँग्रेस पक्ष सोडलेले कपिल सिब्बल, काँग्रेसचे नेते माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम आणि राजीव शुक्ला यांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशमधून ११ जागांवर मतदानाशिवाय करता खासदार निवडून आले आहेत. निवडून आलेल्या ११ खासदारांपैकी ८ भाजपाचे आणि तीन सपाचे आहेत. भाजपाकडून लक्ष्मीकांत वाजपेयी, डॉ.राधामोहनदास अग्रवाल, महिला मोर्चाच्या माजी प्रदेशाध्यक्षा दर्शना सिंह, संगीता यादव, बाबुराम निषाद, राज्यसभा सदस्य सुरेंद्र कुमार नागर, डॉ.के. लक्ष्मण आणि माजी खासदार मिथिलेश कुमार यांचा या यादीत समावेश आहे. त्याचवेळी, सपा आघाडीकडून, सपाकडून राज्यसभा सदस्य जावेद अली, आरएलडीचे जयंत चौधरी आणि सपाला पाठिंबा असलेले कपिल सिब्बल यांचा समावेश आहे.

आंध्र प्रदेशातील चार जागांवर निवडून आलेले सर्व खासदार वायएसआर काँग्रेसचे आहेत. यामध्ये विजयसाई रेड्डी, बी. मस्तान राव, आर. कृष्णय्या आणि एस. निरंजन रेड्डी यांचा समावेश आहे.
बिहारमधून पाच जागांवर मतदान न करता खासदार निवडून आले आहेत. यामध्ये भाजपाला दोन, आरजेडीला दोन आणि जेडीयूला एक जागा देण्यात आली आहे. भाजपाकडून सतीशचंद्र दुबे आणि शंभू शरण पटेल, जेडीयूकडून खिरू महतो तर आरजेडीकडून मीसा भारती आणि फयाज अहमद राज्यसभेचे खासदार बनले आहेत.

तामिळनाडूतून सहा खासदार मतदानाशिवाय निवडून आले आहेत. यामध्ये डीएमकेकडून एस कल्याणसुंदरम, आर गिरीराजन आणि केआरएन राजेश कुमार अशी तीन नावे आहेत. एआयएडीएमकेकडून सीव्ही षणमुगम आणि आर धरमार तर काँग्रेसकडून पी चिदंबरम निवडून आले आहेत.

मध्य प्रदेशात भाजपला दोन तर काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. कविता पाटीदार आणि सुमित्रा वाल्मिकी भाजपाकडून तर विवेक तनखा काँग्रेसकडून निवडून आले. तर, ओडिशातील तीनही जागा बीजेडीच्या बाजूने गेल्या आहेत. त्यात सुलता देव, मानस रंजन मंगराज आणि सस्मित पात्रा आहेत.

तेलंगणात दोन जागांवर टीआरएसचे बी. पार्थसारधी रेड्डी आणि डी. दामोदर राव. छत्तीसगडमध्ये दोन्ही जागांवर काँग्रेसचे राजीव शुक्ला आणि रंजीत रंजन बिनविरोध निवडून आले. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला दोन्ही जागा मिळाल्या. येथून बलबीर सिंह सीचेवाल आणि विक्रमजीत सिंह साहनी राज्यसभेत पोहोचले. झारखंडमध्ये महुआ माझी एक जागा आणि एक जागा भाजपच्या आदित्य साहू यांच्या बाजूने गेली. उत्तराखंडमधील भाजपाच्या उमेदवार डॉ. कल्पना सैनी राज्यसभेत पोहोचल्या आहेत.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *