Breaking News

कोरोना चाचणी केली नसल्याने माजी मुख्यमंत्र्यांसह २५ जणांना प्रवेश नाकारला कॉंग्रेस आमदार अमिन पटेल यांनी उपस्थित केला मुद्दा

मुंबईः विशेष प्रतिनिधी

अर्थसंकल्पिय अधिवेशन कालावधीत दोन वेळा कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य असताना काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह २५ आमदारांनी चाचणीच केली नसल्याने विधिमंडळात प्रवेश नाकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. जरी आमदारांनी चाचणी केली नसली तरी त्यांना विधिमंडळात प्रवेश द्यावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनी विधानसभेत केली.

अधिवेशनाच्या सुरुवातीला कोरोनाची चाचणी केल्यानंतर पुन्हा एकदा एका आठवड्यानंतर कोरोना चाचणी करणे विधिमंडळाच्या सर्व सदस्य अर्थात आमदार मंत्र्यांबरोबर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली. चाचणी केल्यानंतर निगेटीव्ह अहवाल असेल तरच विधिमंडळात प्रवेश मिळणार आहे. परंतु या २५ आमदारांना चाचणी करण्याचा निरोप मिळाला नसल्याने त्यांनी चाचणी केली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

या आमदारांमध्ये काँग्रेस, शिवेसना, भाजपा सदस्यांचा समावेश असल्याचे कळते. त्यामुळे या आमदारांनी चाचणीच केली नसल्याने आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पास त्यांना उपस्थिती लावता येणार नाही. तसेच पुढील उर्वरीत दोन दिवसाच्या अधिवेशनासाठी हजेरी अंधातरीच राहणार आहे.

कोरोना चाचणी अनिवार्य केल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने आमदारांना अधिवेशनाला गैरहजर रहावे लागत आहे. परंतु या आमदारांनी आज चाचणी केल्यानंतर त्याचा निगेटीव्ह अहवाल सादर केल्यास पुन्हा उर्वरीत दोन दिवसासाठी हजेरी लावता येणार आहे. परंतु या सर्वांनी कोरोना चाचणी करणे गरजेचे असल्याचे मत विधिमंडळातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *