Breaking News

शरद पवारांच्या विधानावर देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा आव्हान, आता त्यांनीच पुढचे सांगावे ही अपेक्षा राष्ट्रपती राजवट कोणाच्या सांगण्यावरून लागू करण्यात आली-फडणवीस

एकाबाजूला भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष एकत्रित येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी घेत सरकार स्थापन केले. यावरून मागील १५-२० दिवसांपासून ही घटना चांगलीच चर्चेत आली. यापार्श्वभूमीवर आधी देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांना कल्पना होती. त्यांना कल्पना देऊनच सगळ्या गोष्टी झाल्या होत्या असं म्हटलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी फडणवीस हे सभ्य राजकारणी आहेत असं वाटलं होतं मात्र याबाबत ते असत्याचा आधार घेत आहेत असे सांगितले. मात्र आज शरद पवार यांनी असं म्हटलं आहे की पहाटेच्या शपथविधीचा एकच फायदा झाला की राष्ट्रपती राजवट राज्यातून उठली. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडवून दिली असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना आणखी एक आव्हान देत आता त्यांनीच पुढचं सांगावे ही अपेक्षा असल्याचे सांगत अप्रत्यक्ष शरद पवारांना आव्हान दिले.

२३ नोव्हेंबर २०१९ ला कुणाला काहीही कल्पना नसताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचा शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एका रात्रीत ही घडामोड घडली होती. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं, मात्र शरद पवार यांनी पुढच्या दोन दिवसात सगळ्या आमदारांना परत आणलं त्यामुळे हे सरकार गडगडलं. याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं असता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याआधीही हा विषय टाळला होता. आज मात्र त्यांनी या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली राष्ट्रपती राजवट उठली. जर राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का असं आज शरद पवार विधान केले.

शरद पवार यांच्या या वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, आता शरद पवार यांनी राष्ट्रपती राजवट कोणाच्या सांगण्यावरून राज्यात लागू करण्यात आली आणि का लागू करण्यात आली याबाबतची पुढची माहिती त्यांनीच द्यावी ही अपेक्षा. त्यानंतर पुढच्या सगळ्या कड्या जुळतील असे सूचक वक्तव्य कर अप्रत्यक्ष आव्हानही शरद पवार यांना दिले. आता फडणवीसांच्या दाव्यावर शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या विचारले असता ते म्हणाले, दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे आले होते. त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे बहुमत असेल तर सिद्ध करा. त्यातल्या एका पक्षाच्या नेत्याने आम्हाला आमदारांच्या सह्या असलेलं पत्र दाखवलं. त्यानंतर शपथविधी झाला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. पुढे कोर्टात जेव्हा आव्हान देण्यात आलं त्यावेळी त्यांनी माघार घेत राजीनामा दिला. राज्यपाल कधीही शपथविधीसाठी कुणाला बोलवत नाहीत. सरकार जे स्थापन करणार असतात ते बोलवत असतात. मी ज्यांना शपथ दिली त्यांनी याबाबतचं सत्य सांगितले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *