राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आपल्या समर्थक ५० आमदार आणि खासदार घेऊन आसाम राज्यात गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याची चर्चा राज्यभर आहे.
त्यावरुन कामाख्या देवीला रेड्याचा बळी देतात मुख्यमंत्री शिंदे नेमका कुणाचा बळी देणार असा बोचक सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी शिंदे गटाने गुवाहाटीला कामाख्या देवी मंदिरात नवस केला होता. आता तो नवस पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि ५० आमदार जात आहेत. मात्र कामाख्या देवीला रेड्यांचा बळी देतात तशी तिथे प्रथा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे नेमका कोणाचा बळी देण्यासाठी गुवाहाटीला जाणार आहेत, असा खोचक सवाल अजित पवार यांनी केला आहे. शिंदे गटाचे मंत्री, त्यांचे समर्थक आमदार आणि खासदार पुन्हा एकदा गुहाटीला जाणार आहेत अशी माहिती त्यांचे समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीच दिली होती. तसेच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी देखील आम्ही महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा नवस कामाख्या देवीला केला होता.असे सांगत आता नवस फेडायला जाणार आहोत असे सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक ५० आमदार आणि १३ खासदार पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार असल्याची राज्यभर सुरू असतानाच त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यावर मिश्किल टिप्पणी करतीना म्हटले आहे की, काही ठिकाणी बोकडांचा बळी दिला जातो, तर काही ठिकाणी कोंबड्यांचा बळी देण्याची प्रथा असते मात्र कामाख्या देवीला रेड्यांचा बळी दिला जातो.अशे मला कळाले आहे.तर आता कोणाचा बळी देण्यासाठी ते गुहाहाटीला चालले आहेत, ते आता आपण बघूया, असे अजित पवार मिश्किलपणे म्हणाले.