Breaking News

देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार, जीवनातील शेवटची निवडणूक समजून लढा.. अभी नही तो कभी नही अशा आवेशात लढा

मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या पदाधिकारी आणि आमदारांसमोर बोलताना उध्दव ठाकरे यांनी धोका दिल्याचा आरोप करत त्यांना जमिन दाखविण्याची वेळ आल्याचा इशारा दिला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकत म्हणाले, ‘अभी नही तो कभी नही, अशा आवेशात लढा. आता एकच लक्ष मुंबई महानगरपालिका,’ असे आवाहन भाजपा कार्यकर्त्यांना केले.

लालबाग गणपतीच्या दर्शनासाठी मुंबई दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत या शासकीय निवासस्थानी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. तेव्हा देवेंद्र फडणवीस बोलत होते.

महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकणार आहे. मुंबईत ओरिजनल शिवसेना आमच्यासोबत आली आहे. गणेशोत्सवात सगळ्या ठिकाणी भाजपाचाच बोलबाला आहे. शिवसेना राजकारण करत असेल तर, आपण त्यांना मागे टाकू. आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे, असं माना. अभी नही तो कभी नही, आता केवळ एकच लक्ष्य मुंबई महानगरपालिका आहे, असा कानमंत्रही देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

आपल्या ‘मिशन मुंबई’साठी सर्वांचचं योगदान महत्वाचं आहे. सर्वांनी जोरदार तयारी करायची आहे. वॉर्ड रचना, प्रभाग रचना याचा विचार करुन चालणार नाही, पदाधिकाऱ्यांनी काम करत रहावे. पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर जनेतचा रोष आहे.

पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. केवळ दोन जागांसाठी त्यांनी २०१४ मध्ये युती मोडली असं सांगतानाच मोदी आणि फडणवीसांच्या नावाने मतं मागून जिंकून आल्यानंतर आमच्याशी विश्वासघात केल्याचा आरोप करत भाजपाने कधी कोणाला धोका दिला नसल्याचेही अमित शाह सांगितले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *