Breaking News

मुंबई पालिका आयुक्त चहल, प बंगालच्या डिजीपींना निवडणूक आयोगाने हटविले

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होऊन दोन दिवस झाले. परंतु निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ज्या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना एकाच पदावर तीन वर्षाहून अधिक काळ झालेले आहेत अशांना निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी इतरत्र बदली करावी असे आदेश दिले होते. परंतु दिल्ली दरबारी असलेले वजन वापरून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय एस चहल यांची बदली रोखण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आले. मात्र अखेर राज्य सरकारच्या प्रयत्नांना अपयश आले आल्याने मुंबई पालिका आयुक्त आय एस चहल आणि पश्चिम बंगालचे पोलिस महासंचालकांना सध्याच्या विद्यमान पदावरून हटविले.

मुंबई महापालिकेचे आयुक्त आय एस चहल यांना पदावरून हटवू नये यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्राचे निवडणूक मुख्य अधिकारी यांना पाठविला होते. परंतु निवडणूक मुख्याधिकाऱ्यांनी राज्य सरकारने पाठविलेले पत्र फेटाळून लावली आहे. त्यामुळे पालिका आयुक्त आय एस चहल यांना निवडणूकीची जबाबदारी नसलेली जबादारी देण्यात यावी अशी स्पष्टपणे राज्य सरकारला सांगितले.

तर दुसऱ्याबाजूला पश्चिम बंगालचे पोलिस महासंचालक आणि आयजी यांनाही पदावरून हटविण्यात आले असून त्यांच्यावर निवडणूकीशी संबधित नसलेल्या पदाची जबाबदारी सोपविण्यात यावी असे निर्देशही निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या राज्य सरकारला दिले आहेत.

मुंबई महापालिकेचे आयुक्त आय एस चहल हे मागील तीन वर्षाहून अधिक काळ झाला ते सातत्याने मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावर विराजमान आहेत. त्यामुळे निवडणूकीच्या कालावधीत पारदर्शक निवडणूका पाडण्याच्या उद्देशाने त्यांना पालिका आयुक्त पदावरून हटविणे निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे आवश्यक आहे. परंतु राज्य सरकारने चहल यांना हटवून नव्या आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याऐवजी आय एस चहल यांनाच पदावर नियमित ठेवावे अशी विनंती निवडणूक आयोगाला केली. परंतु निवडणूक आयोगाना राज्य सरकारने पाठविलेले पत्र फेटाळून लावत चहल यांना पदावरून हटविण्यात आल्याचे आदेश दिले.

Check Also

भारतीय राज्यघटना बदलली तर राष्ट्र कोलमडेल

देशातील अठरापगड जातधर्माचे १४० कोटी लोक राज्यघटनेमुळे एकत्र नांदत असून देश एकसंघ आहे. भारतीय राज्यघटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *