Breaking News

Tag Archives: monsoon session

देवेंद्र फडणवीस यांची माहिती, राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती विधानसभेत दिली माहिती

राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभेत लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची पत्राद्वारे शेतकऱ्यांना साद, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूया… छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया

राज्यातील शेती आणि शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारे निर्णय जाहीर करतानाच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. शेतकरी बांधवांना भावनिक आवाहन करत ‘रडायचं नाही, लढायचं…अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला दिलासा दिला. विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील …

Read More »

विधान भवन पासून हाकेच्या अंतरावर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला मात्र १५ टक्के भाजला

विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू असताना सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना विधान भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आयनॉक्स थिएटर समोर उस्मानाबादचे सुभाष भानुदास देशमुख या शेतकऱ्याने अंगावर रॉकेल टाकत स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवत देशमुख यांना जवळच्या …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केले ‘हे’ महत्वपूर्ण निर्णय सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई

सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी टाळण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. सन २०२२ च्या माहे जुलै व ऑगस्ट महिन्यात राज्यात …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, २५ हजार कोटींच्या मागण्या पण शेतकऱ्यांसाठी दमडी नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शिंदे-फडणवीस सरकारचे दुर्लक्ष

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे परंतु एकनाथ शिंदे- फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांसाठी केवळ मदत जाहीर केली तीसुद्धा तुटपुंजी आहे. २५ हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यास आल्या पण त्यात शेतकऱ्यांसाठी दमडीची तरदूत केली नाही हे अत्यंत …

Read More »

भाषणात व्यत्यय आणण्यावरून जयंत पाटील आणि विधानसभाध्यक्षामध्ये खडाजंगी आपण सत्तारूढ पक्षाची बाजू घेऊन बोलत असल्याचा भास आम्हाला होतोय

विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिल्यानंतर राईट रिप्लाय अंतर्गत अजित पवार हे बोलायला उभे राहीले. मात्र मध्येच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवारांना थांबवित त्या घटनेची माहिती देवू लागले. त्यामुळे लोकशाही संकेताचे हे सरळसरळ उल्लंघन असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगत जे काही बोलायचे …

Read More »

तर मुख्यमत्री शिंदे बरसले, तुमच्या चिठ्या काढेन विरोधकांच्या आरोपावर दिली धमकी

नव्याने राज्यात स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणीस सरकारचे पावसाळी अधिवेशन पहिलेच असूनही महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी चांगलेच घेरले. त्यामुळे पावसाळी अधिवेशन चांगलेच रंगतदार झाल्याचे दिसून येत आहे. मात्र विरोधकांच्या सततच्या प्रश्नाच्या भडीमारामुळे थोडेसे गांगरलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज थेट विधानसभेत विरोधकांना सूचक इशारा देत म्हणाले, मी तुमच्यासोबतही काम केले आहे. त्यामुळे …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मुंडेवर पलटवार, तुमचा प्रवास माहित आहे ना…. विरोधकांनाही दिले सडेतोड उत्तर

नगर परिषदेच्या नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधारीत विधेयक विधानसभेत सादर केले. या विधेयकावर बोलताना विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली. तसेच राष्ट्रवादीचे आमदार धंनजय मुंडे यांनीही खोचक शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली. या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

एकनाथ खडसे यांची मागणी, बेरोजगारांना ५ हजार बेरोजगारी भत्ता सुरु करा तारांकित प्रश्नातून राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारला घेरले...

राज्यातील सेवायोजन कार्यालय (एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज) जवळपास बंद झालेले आहेत. एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधून पूर्वी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायच्या त्या आता होत नाहीत. तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना पूर्वी बेरोजगारी भत्ता मिळत होता. राज्य सरकारने तो भत्ता बंद केलेला आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना महिना ५ हजार रुपये भत्ता द्यावा, अशी मागणी माजी मंत्री आणि …

Read More »

धनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला, ‘एकनाथ’च रहावे ‘ऐकनाथ’ होऊ नये थेट निवडणूकीतून नगराध्यक्ष निवडीवरून साधला निशाणा

विधानसभेतील पावसाळी अधिवेशन चांगलेच रंगलं असून आज नगर परिषद अध्यक्ष जनतेतून निवडून दिले जावेत, यासंबंधीच्या विधेयकवरून माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलावा लागतो, हे दुर्दैव …

Read More »