Breaking News

Tag Archives: cm fadnavis

माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील पुन्हा एकदा संशयाच्या फेऱ्यात पत्नीची भागीदारी असलेल्या कंपनीवर मेहेरनजर

मुंबईः प्रतिनिधी एसआरएचे सीईओ म्हणून कार्यरत असताना आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील हे पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचे उघडकीस आले आहे. त्या अनुषंगाने त्यांच्यावर संशयाची सुई आली असून सदर प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबई उपनगराचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून विश्वास पाटील हे …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांचे पुन्हा तीन दिवस काम बंद आंदोलन वैद्यकीय सेवांच्या खाजगीकरणाविरोधात आंदोलनाचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अखत्यारीतील रूग्णालयातील चतुर्थश्रेणी सेवांचे खाजगीकरण करण्याच्या धोरणाविरोधात या वर्गातील कर्मचाऱ्यांनी तीन दिवस काम बंद आंदोलनाचा इशारा राज्य सरकारी चतुर्त श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने राज्य सरकारला नुकताच दिला. यासंदर्भात संघटनेने जाहीर प्रसिध्दीपत्रकही काढले आहे. ११ ते १३ जून या कालावधीत तीन दिवस काम …

Read More »

आता शाळांमध्ये डब्‍बेवाल्‍यांचे डबे? पोलीस आयुक्‍त आणि शिक्षण उपसंचालकांनी तातडीने संयुक्‍त बैठक घेण्याचे मुख्‍यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांचे निर्देश

मुंबईः प्रतिनिधी मुंबईतील डबेवाल्‍यांना शाळांमध्‍ये सुरक्षेच्‍या कारणास्‍तव प्रवेश देण्‍यास शाळांनी बंदी घातली असली तरी डबेवाल्‍यांची आजपर्यंतची प्रामाणिक सेवा व त्‍यांचे महत्‍व लक्षात घेता ही बंदी अयोग्‍य असून मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले असता त्‍यांनी मुंबई पोलीस आयुक्‍तांनी तातडीने याबाबत संयुक्‍त बैठक …

Read More »

वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणासाठी सरकारचा अध्यादेश राज्य सरकारचा निर्णय महसूल मंत्री पाटील यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या अद्यादेशामुळे रद्द झालेले विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतील अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी राज्य …

Read More »

महाराष्ट्र सुर्य किरणांनी आणखी तापणार वाढत्या तापमानापासून लोकांनी काळजी घ्यावी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात १९ मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे २५ मे पर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील. या दरम्यान अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान ४६ …

Read More »

धारावी पुर्नवर्सन प्रकल्प अदानीला? शेखलिंक कंपनीवर अधिकाऱ्याची मेहेरनजर

मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून शहरातील धारावी झोपडपट्टीच्या पुर्नवर्सनाचे भिजत पडलेले घोंगडे मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरु केले. मात्र या प्रकल्पाला गती देण्याच्या नादात एका अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांना न विचारताच परस्पर शेखलिंक कंपनीवर मेहेरनेजर दाखविण्यास सुरुवात केल्याने हा प्रकल्प शेखलिंकऐवजी अदानी समुहाला देण्याच्या हालचालींना सुरुवात झाल्याची माहिती विश्वसनीय …

Read More »

मराठा आरक्षणासाठी आचारसंहिता शिथिल करा निवडणूक आयोगाला पत्रः महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील पदवुत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा आऱक्षण होण्याबाबत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयालने दिलेल्या निकालावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आचारसंहितेमुळे याप्रश्नी तातडीने तोडगा काढण्यात अडचण येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी आचारसंहितेत सूट मिळावी अशा आशयाचे पत्र निवडणूक आयोगाला पाठविण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री …

Read More »

राज्यातील गंभीर परिस्थितीवर चर्चा करायचीय, मुख्यमंत्री महोदय वेळ द्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्हयांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे असे सांगत दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी वेळ द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका …

Read More »

राज्यात मान्सूनचे आगमन जरा उशीराच १० जूनपर्यंत मुंबईत आगमन होणार असल्याचा स्कायमेटचा अंदाज

मुंबईः प्रतिनिधी गतवेळच्या मान्सूनमध्ये पुरेसा पाऊस न पडल्याने जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच राज्यातील जनतेला दुष्काळी परिस्थितीचे चटके जाणवू लागले. तर मार्च महिन्यापासून पाणी टंचाईला सामोरे जावू लागले. त्यातच यंदा राज्यातील मान्सून उशीराने दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेट या हवामान कंपनीने व्यक्त केला. मान्सूनचे आगमन केरळमध्ये चार जूनला होण्याची शक्यता व्यक्त करत सरासरीच्या …

Read More »

टँकर देण्यासाठी २०१८ च्या लोकसंख्येचा आधार घ्या मराठवाड्यातील ३ जिल्ह्याच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ची लोकसंख्या लक्षात न घेता 2018 ची लक्षात घेऊन पिण्याचा पाणी पुरवठा करावा. जनावरांसाठी याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. वर्षा निवासस्थानातून ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून परभणी, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी …

Read More »