Breaking News

विशेष बातमी

शिंदे गटातील मंत्र्यांवर मुख्यमंत्री शिंदेंची माणसे ठेवणार लक्ष्य भाजपाच्या पध्दतीने शिंदेंचे पाऊल

राज्यात स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना खात्याचे वाटप करण्यात आले. मात्र खाते वाटपानंतर आधीच्या तुलनेच चांगली खाती मिळाली नसल्यावरून शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये नाराजीच्या चर्चा बाहेर आल्यानंतर या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच मंत्री झालेल्यांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील माणसे त्यांच्या दिमतीला देत आपल्याच मंत्र्यांवर अप्रत्यक्ष लक्ष ठेवणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंनी नाराज मंत्र्यांना केले खुष; स्वत:कडील खात्यांची जबाबदारी “या” मंत्र्यांकडे संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभुराज देसाई, दिपक केसरकर यांच्यासह आठ जणांकडे सोपविली जबाबदारी

मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाते वाटप जाहिर केले. परंतु शिंदे गटातील अनेक मंत्र्यांना मिळालेल्या खात्यांचे वाटप रूचलेले नसल्याने अनेक मंत्री नाराज असल्याची चर्चा शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये सुरु झाली. त्यातच बुधवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याच्या यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील अतिरिक्त असलेल्या खात्यांचा कारभार नाराज …

Read More »

सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाला म्हणाले, धनुष्यबाण विषयीचा निर्णय आम्ही घेऊ उध्दव ठाकरेंना दिलासा; निवडणूक आयोगाला फटकारले

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी वेगळा गट स्थापन केला. त्यास आता १२ खासदारांनीही पाठिंबा दिला. शिंदें गटाकडून आता शिवसेनेवर दावा करण्यात येत असताना आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाण चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरु केली. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटाकडून …

Read More »

सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची मागणी, नेताजींच्या यांच्या अस्थी भारतात आणा जपान मध्ये असलेल्या अस्थी भारतात आणून गंगेत विसर्जन करा

आज देशभरात ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे. सकाळी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. परंतु नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जर्मनस्थित मुलगी अनिता बोस फाफ यांनी सुभाषबाबूंचे स्मरण करत त्यांच्या अस्थि भारतात आणण्याची विनंती भारत …

Read More »

खाते वाटपात भाजपाच्या तुलनेत शिंदे गटाला काय मिळाले आणि आणखी काय मिळणार? महत्वाची खाती वगळता तोफेच्या तोंडी शिंदे गटाचे मंत्री

हिंदूत्वाच्या मुद्यावरून आणि आम्हाला चांगली खाती पाहिजेत असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपासोबत जात राज्यात स्थापन केली. उशीराने का होईना राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर या मंत्र्यांना खात्याचे आज वाटपही करण्यात आले. आज झालेल्या खातेवाटपात राज्याच्या दिशाधोरण आणि क्रिमची ओळखली जाणारी महत्वाची खाती …

Read More »

अजित पवार यांच्या ‘त्या’ मागणीने प्रशासनाला प्रश्न, उत्तरांना मान्यता कोण देणार? विधिमंडळाकडून उत्तरे पाठविण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून ३९ दिवस झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. आता मंत्रिमंडळ विस्तार होवून तीन दिवस होत आले तरी अद्याप मंत्र्याना खाते वाटप झालेले नाही. त्यातच १७ तारखेपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात तारांकित प्रश्नोत्तरे न घेण्याची भूमिका घेणाऱ्या सरकारने आता प्रश्नोत्तरे घेण्याची …

Read More »

राज्यभरातील कारागृहांमध्ये उमटले “जीवनगाणे गातचं जावे”चे सूर… एकाच दिवशी एकाच वेळी ३६ कारागृहात विशेष कार्यक्रमांचे आयोजन

छोट्या मोठ्या चुकांमुळे कैदी बनून आयुष्य जगणाऱ्या बनलेल्या अनेकांसाठी आजचा दिवस विशेष ठरला.. निमित्त होते, “जीवन गाणे गातचं गावे”… या अनोख्या कार्यक्रमाचे… स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत, राज्यातील ३६ प्रमुख कारागृहांत सांस्कृतिक, प्रबोधनात्मक व समुपदेशनात्मक कार्यक्रमाचे आज आयोजन करून, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने एक विक्रम केला. “जीवन गाणे गातच जावे…” या विशेष कार्यक्रमाचे एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात कारागृहात …

Read More »

“तिरंग्यावरही भाजपाचे नाव” काँग्रेसने फाडला “हर घर तिरंगा” घोषणेचा बुरखा परभणीतील व्हिडिओ जारी करत केली भाजपाने माफी मागावी केली मागणी

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्टला हर घर तिरंगा या योजनेची घोषणा केली. या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी देशाच्या विविध भागात सर्वसामान्य नागरिकांना झेंडा खरेदी करण्यासाठी कशा पध्दतीची अडवणूक आणि छळवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यातच आता महाराष्ट्रात तिरंगा झेंड्यावर भाजपाचे नाव …

Read More »

जालन्यात वऱ्हाडी म्हणून आले अन् ३९० कोटींची मालमत्ता जप्त करून गेले आयकर विभागाने महाराष्ट्रात केलेली सर्वात मोठी कारवाई

मागील महिन्यांपासून राज्यातील राजकिय नेत्यांच्या मागे ईडी, आयकर विभागाचा ससेमिरा लागला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योजकांकडे फारशी अवैध मालमत्ता असते याची माहितीच पुढे येत नव्हती. मात्र आज आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी जालन्यात वऱ्हाडी असण्याचे सोंग घेत जालन्यातील स्टील कारखानदार, रिअल इस्टेट डेव्हलपर आणि कपडे व्यापाऱ्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापा टाकला. या छाप्यात …

Read More »

शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भाजपासोबत गेले अन् पावन झालेल्यांची संख्या चार संजय राठोड, राधाकृष्ण विखे-पाटील, विजयकुमार गावित, सुधीर मुनगंटीवार

शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन झाले. मात्र न्यायालयीन लढाईमुळे शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार ३९ दिवस रखलेला होता. हा रखडलेला मंत्रिंडळाचा विस्तार आज अखेर झाला. मात्र या विस्तारात भाजपासोबत गेले अन् पावन झालेल्या मंत्र्यांची लक्षात येण्यासारखी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वनमंत्री असलेल्या संजय राठोड यांचे एका …

Read More »