Breaking News

५ जानेवारीला शासकिय कार्यालये सुरू असून बंद राहणार ?

मुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारी सेवेत काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा पूर्ण करावा या प्रमुख मागणीसाठी प्रथम व द्वितीय श्रेणीतील अधिकारी सामूहीक रजेवर जाण्याचा इशारा दिलेला आहे. त्यातच या अधिकाऱ्यांच्या सामूहीक रजेच्या आंदोलनात तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी सहभागी होण्याची तयारी इतर संघटनांनीही केल्याने ५ जानेवारी २०१९ रोजी सर्व शासकिय कार्यालये सुरू असून बंद राहण्याची शक्यता आहे.

मागील अनेक वर्षापासून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी सेवेत असलेल्या शासकिय कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करावी अशी मागणी करण्यात येत आहे. परंतु त्यावर राज्य सरकारकडून अद्याप पर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यातच राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, गोवा, बिहार, तामीळनाडू आणि पश्चिम बंगाल राज्यांसह राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या एमएमआरडीए आणि एमआयडीसीसह ५ उपक्रमांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. मात्र थेट शासकिय सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी हा आठवडा लागू करण्यात आलेला नसल्याची माहिती महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष रा.कों.धनावडे यांनी दिली.

या सामूहीक रजेच्या आंदोलनात मंत्रालयातील अधिकाऱ्यांसह राज्यभरातील विविध विभागातील तब्बल १ लाख ५० हजार अधिकारी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या आंदोलनात प्रथम व द्वितीय श्रेणीतील अधिकाऱ्यांबरोबरच तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱी संघटनांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे. अधिकारी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाचा फायदा इतर कर्मचारी वर्गासही होणार आहे. त्यामुळे या आंदोलनाची ताकद वाढविण्यासाठी तृतीय व चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनाही सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे संघटनेचे सचिव विष्णू पाटील यांनी सांगितले.

पाच दिवसाच्या आठवड्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्याबाबत संघटना आग्रही असून यास महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघानेही पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे हे सामूहीक रजेचे आंदोलन यशस्वी होवून त्याचा फायदा सर्व अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांना होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.   

Check Also

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; तर या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *