लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी पाहिली तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात झाले आहे. तर सर्वात कमी मतदान सोलापूर लोकसभा मतदारसंघात झाले आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले. तर तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
लातूर – ५५.३८ टक्के
सांगली – ५२.५६ टक्के
बारामती – ४५.६८ टक्के
हातकणंगले – ६२.१८ टक्के
कोल्हापूर – ६३.७१ टक्के
माढा – ५०.०० टक्के
उस्मानाबाद – ५२.७८ टक्के
रायगड – ५०.३१ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५३.७५ टक्के
सातारा – ५४.११ टक्के
सोलापूर – ४९.१७ टक्के