Breaking News

Tag Archives: loksabha election 2024

शरद पवार यांचा सवाल, …मग महाराष्ट्रातच चार ते पाच दिवसात निवडणूका का?

देशाची ही निवडणूक लोकशाही पद्धतीने होते की नाही, याबाबत लोकांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे देशातील निवडणुकांकडे जगाचे लक्ष लागले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत सांगितले. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, आज महाराष्ट्राची निवडणूक चार ते पाच टप्प्यांनी घेतली आणि …

Read More »

राहुल गांधी यांचा थेट सवाल, मोदीजी घाबरलात का?

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झालेली आहे. त्यातच पुन्हा एकदा भाजपा आणि नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. त्यातच आज आंध्र प्रदेशमधील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राहुल गांधी यांच्यावरच निशाणा साधत निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राहुल गांधी यांनी अचानकपणे …

Read More »

निर्मला सीतारामन यांची सॅम पित्रोदांच्या वर्णद्वेषी टिप्पणीवरून टीका

आंतरराष्ट्रीय ख्यातकिर्त विचारवंत शास्त्रज्ञ आणि काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी आज एक व्हिडिओ जारी करत देशाच्या विविध भागात राहणाऱ्या लोकांचे वर्ण कोणत्या प्रकारची आहेत आणि तसेच त्यांच्या मध्ये भारतीयत्व असण्याची भावना कोणत्या पध्दतीची आहे यावर भाष्य केले. त्यावरून नवा वाद निर्माण झाला असून सॅम पित्रोदा यांच्या त्या व्हिडिओवरून भाजपाच्या नेत्यांनी …

Read More »

भारतीय निवडणूक प्रक्रियेचे चार देशांच्या परदेशी शिष्टमंडळाकडून कौतुक

भारतासारख्या लोकशाही देशात निवडणूक प्रक्रिया ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. येथील मतदारांचा स्वयंप्रेरीत मतदानासाठीचा उत्साह आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हे आयोगामार्फत राबवण्यात आलेल्या मतदान जागृती कार्यक्रमाचे यश असून मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाने उत्कृष्ट नियोजन केल्याचे मत निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी आलेल्या परदेशी शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरात ६०.१९ टक्के मतदान

सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६०.१९% मतदान झाले. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या ९३ मतदारसंघांमध्ये पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. आसाममध्ये सर्वाधिक ७४.८६% मतदान झाले, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ७३.९३%, तर महाराष्ट्रात सर्वात कमी ५३.६३% मतदान झाले, बिहारमध्ये ५६.०१% इतके चांगले मतदान झाले. काँग्रेस नेते राहुल …

Read More »

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी पाहिली तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात झाले आहे. तर सर्वात कमी मतदान सोलापूर लोकसभा मतदारसंघात झाले आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० …

Read More »

वंचितच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या वाहनावर हल्ला

वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात गाडीच्या समोरील काचा फुटल्या असून उत्कर्षा रूपवते सुखरूप असल्याची माहिती आहे. झाडीतून दगडफेक करत हा हल्ला करण्यात आला. दगडफेकीनंतर हल्लेखोर पळून गेले. शिर्डी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांचा जोरदार झंझावात सुरू …

Read More »

बारामतीत मतदानाच्या दिवशीच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, तर सोलापूरात तणाव

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या दृष्टीने उत्सुकता निर्माण झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढतीकडे सर्वाचे लक्ष्य लागून राहिलेले आहे. त्यातच आज सकाळपासून ११ लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र वास्तविक पाहता काल रात्रीपासूनच सुप्रिया सुळे समर्थक कार्यकर्त्यांनी आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर आज सातत्याने आरोप …

Read More »

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४२ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ७ मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले आहे. आज तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. आज सकाळपासून वातावरणात उष्मा राहिला असल्याने मतदार धीम्या गतीने बाहेर …

Read More »

तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीचा प्रचार थंडावला

लोकसभा निवडणूकीसाठी तिसऱ्या टप्प्यासाठी सुरु असलेला प्रचार आज थंडावला. ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. आज प्रचाराचा शेवटच्या दिवस असल्याने जवळपास सर्वच राजकिय पक्षांनी जाहिरसभांच्या माध्यमातून आणि रोड शोच्या माध्यमातून आपापल्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार केला. तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, …

Read More »