मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा सोमवार ७ ऑक्टोंबर रोजीचा शेवटचा दिवस होता. दिवसभरात जवळपास ५०० हून अधिक उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतले. राज्यातील सर्वाधिक उमेदवार नांदेड पश्चिम मध्ये ३८ उमेदवार रिंगणात राहीले आहेत. सर्वात कमी उमेदवार हे चिपळून मध्ये असून या विधानसभा मतदारसंघात अवघे ३ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
निवडणूकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघात ५ हजार ५४३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. यापैकी ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून ८०० उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा एकूण उमेदवार एकूण मतदारसंघ
अक्कलकुवा २६ ४
धुळे २८ ५
जळगांव १०० ११
अकोला ६८ ५
वाशिम ४४ ३
अमरावती १०९ ८
वर्धा ४७ ४
नागपूर १४६ ८
भंडारा ४२ ३
गोंदिया ४७ ४
गडचिरोली ३८ ३
चंद्रपूर ७१ ६
यवतमाळ ८८ ७
नांदेड १२१ ८
हिंगोली ३५ ३
परभणी ५३ ४
जालना ७९ ५
औरंगाबाद १२८ ९
नाशिक १४८ १५
पालघर ५३ ६
ठाणे २१४ १८
मुंबई उपनगर २४४ २६
मुंबई शहर ८९ १०
रायगड ८७ ७
पुणे १६२ २१
सोलापूर १५४ १२
रत्नागिरी ३२ ५
सिंधूदुर्ग २३ ३
कोल्हापूर १०६ १०
सांगली ६८ ८
आदी मिळून रिंगणात ३ हजार २८ उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय आतापर्यंत ४४२ गुन्हे दाखल करण्यात आले असून १०२ गुन्हे आयपीसी सेक्शनखाली दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आणखी तीन जिल्ह्याची माहिती गोळा करण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
Tags bjp congress eci maharashtra vidhansabha election-2019 ncp shivsena
Check Also
अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांचा युक्तीवाद, घोटाळ्यातील पुरावे मिळाले नाहीत
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्यातून उद्भवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी …