Breaking News

राजकारण

२०१९ हे वर्ष भाजपच्या घर वापसीचे : खा. अशोक चव्हाण काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिराची मनोर पासून सुरुवात

मनोर : प्रतिनिधी केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेत प्रचंड असंतोष असून २०१९ हे वर्ष काँग्रेसचे राहणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त करत हेच वर्ष भाजपच्या घर वापसीचे राहणार असल्याची भविष्यवाणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी करत केंद्र आणि राज्यातील परिवर्तनासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. पालघर जिल्ह्यातील …

Read More »

रस्ते विकासासाठी येत्या मार्चपूर्वी भूसंपादन करावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील रस्ते विकासासाठी आवश्यक ते भूसंपादन जलदगतीने करावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मलबार हिल येथील सह्याद्री शासकिय निवासस्थानी आयोजित केंद्र शासनाच्या भारतमाला या राज्यातील रस्ते विकासाच्या योजनेचा आढावा घेताना ते बोलत होते. या बैठकीला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम मंत्री …

Read More »

मागासवर्गीयांच्या ४४९ औद्योगिक संस्था सरकारच्या मदतीच्या प्रतिक्षेत इतर सहकारी संस्थांना थेट तर मागासवर्गीयांच्या संस्थांना बँकेकडून मदतीची अट

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सहकारी क्षेत्रातील उद्योगांना चालविण्यासाठी आणि त्या उद्योगांमधून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकारकडून थेट आर्थिक मदत देण्यात येते. मात्र मागासवर्गीयांच्या ४४९ औद्योगिक सहकारी संस्थांना थेट मदत देण्याची ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयात देवूनही त्यास अद्याप आर्थिक मदत दिली नसल्याने हे उद्योग उभे राहू शकले नाहीत. …

Read More »

राणेंचा आठवले होणार ? मंत्रिपदाच्या मागणीवरून राणेचे मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसमधील थंडा कर के खाव पध्दतीच्या राजकारणाला कंटाळून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्वत:चा स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाची स्थापना केली. मात्र आमदारकी आणि मंत्री पदाचे आश्वासन दिलेल्या भाजपकडून यातील एकही अद्याप पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे आता राणे यांनी मंत्रिमंडळातील समावेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा …

Read More »

विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला प्रतित्तुर भाजपच्या तिरंगा रॅलीचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी सध्या केंद्र आणि राज्यातील सरकारची विकास कामे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे विरोधकांकडून भाजप आणि सरकारला बदनाम करण्याचा कट आखण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विरोधकांकडून संविधान बचाव रॅली काढण्यात येत आहे. मात्र विरोधकांच्या रॅलीला प्रतित्तुर म्हणून प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा रॅली काढण्यात येणार असल्याची घोषणा …

Read More »

विधान परिषदेचे माजी सभापती ना.स.फरांदे यांचे निधन अभ्यासू नेतृत्व गेल्याची राजकिय पक्षांमध्ये भावना

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या विधान परिषदेचे सभापती ना.स फरांदे यांचे आज सकाळी निधन झाले. तीन-चार दिवसांपूर्वी पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील रूग्णालयात उपचार होते. या उपचारा दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. फरांदे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील वाई …

Read More »

संविधान बचाव आंदोलनात सहभागी होणार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी देशाची राज्यघटना बदलण्याचा भाजपचा मनसुबा असल्याची जाहीर कबुली केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी दिल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने सर्वपक्षिय संविधान बचाव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा २६ जानेवारी २०१८ रोजी मुंबईत होणार असून या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती …

Read More »

न्यायमुर्ती लोया यांच्या मृत्यूबाबत आता शंका नाही पुत्र अनुज लोयाच्या खुलासाने लोया मृत्यूप्रकरणास वेगळे वळण

मुंबई : प्रतिनिधी गुजरातमधील सोहाराबुद्दीन चकमकप्रकरणी सुणावनी घेत असलेले सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया अर्थात माझे वडील यांच्या मृत्यूबाबत सुरुवातीला संशय होता. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत आता माझ्यासह आमच्या कुटुंबियांच्या मनात कोणताही संशय नसल्याचा खुलासा न्यायाधीश स्व. लोया यांचा मुलगा अनुज लोया याने आज केला. नरिमन पाँईट येथील मित्तल टॉवरमध्ये …

Read More »

२०१९ पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी चांगले काम सुरु केले आहे. प्रत्येक गावामध्ये सर्व कामे बाजूला ठेवून मेहनत करणारी माणसे पहायला मिळत असून वॉटर कप आणि जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्याला २०१९ अखेर पर्यंत राज्याला दुष्काळ मुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री …

Read More »

नौदलाचा अवमान करणाऱ्या नितीन गडकरींनी माफी मागावी अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केल्याचा कॉंग्रेसचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील एका कार्यक्रमात नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमिन देणार नाही. त्यांना दक्षिण मुंबईत जागा लगाते कशाला असा सवाल करत त्यांनी पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर जावे असे सांगत नौदलाचे काम असल्याचे उद्दाम वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करून भारतीय नौदलाचा अवमान केला आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात …

Read More »