Breaking News

राजकारण

आयएएस अधिकारी व्ही.के गौतम यांची दुसऱ्यांदा बदली १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबईः प्रतिनिधी शेतकरी कर्जमाफी वितरणप्रणालीवरून सहकार विभाग टीकेचा धनी ठरल्याने या विभागाचे सचिव व्ही.के.गौतम यांची बदली वित्त विभागात करण्यात आली. त्यास काही महिन्याचा अवधी लोटत नाही. तोच गौतम यांची पुन्हा दुसऱ्यांदा बदली करत त्यांची नियुक्ती पर्यटन व सांस्कृतिक खात्याच्या प्रधान सचिव पदी राज्य सरकारने केली आहे. गौतम यांच्यासह १२ सनदी …

Read More »

घोषणा करण्याऐवजी हमीभावासाठी तातडीने अध्यादेश काढा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी तूर व हरबऱ्याच्या खरेदीत शेतकऱ्यांची प्रचंड लूट सुरू आहे. तर दुसऱ्याबाजूला केंद्र सरकारकडून हमी भाव देण्याची घोषणा करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता तातडीने हमी भाव देण्याच्या अंमलबजावणीचा अध्यादेश काढावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका प्रसिध्दी …

Read More »

सांस्कृतिक क्षेत्रातल्या शिरकावासाठी भाजपला ’प्रसाद’चा आधार नाट्य परिषद हिसकावून घेण्यासाठी ताव़डेंचे पवारांना आव्हान

मुंबईः प्रतिनिधी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणूकांचे पडघड वाजायला सुरुवात झाली. या निवडणूकीला अद्याप एक महिना शिल्लक असतानाच दुसऱ्याबाजूला या नाट्य परिषदेच्या निवडणूकीच्या निमित्ताने सांस्कृतिक क्षेत्रातील शिरकावासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी नाट्य निर्माता संघाच्या कांबळींना पाठबळ देत भाजपला प्रसाद चा आधार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती पुढे आली …

Read More »

सरपंच पतींनी घातला मंत्रालयात गोंधळ सरपंच पत्नीच्या मागे जाण्यापासून पोलिसांनी रोखले

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेकडून थेट नव्याने निवडूण आलेल्या सरपंचांचे सरपंच दरबार मंत्रालयात आयोजित करण्यात आला. मात्र या दरबारात पत्नी सरपंचांबरोबर आलेल्या पती सरपंचाची गर्दी होवू लागल्याने अखेर पती सरपंचाना बाहेर काढण्याची पाळी मंत्रालयातील पोलिस कर्मचाऱ्यांवर आली. त्यामुळे सरपंच परिषदेसाठी आलेल्या सरपंच पतिराजांनी मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर गोंधळ घातल्याची …

Read More »

अर्थसंकल्पातील घोषणांवर विरोधकांची टीका तर सत्ताधाऱ्यांकडून स्वागत निवडणूका नजरेसमोर ठेवून अर्थसंकल्प जाहीर

मुंबईः प्रतिनिधी देशाचे भविष्यकालीन चित्र मांडण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करत देशातील गरीबांवर विविध घोषणांचा पाऊस पाऊस पाडला. मात्र यंदाचा अर्थसंकल्प हा आगामी लोकसभा आणि पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांच्यादृष्टीने मांडण्यात आल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर सत्ताधारी भाजपकडून अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले आहे. रब्बी पिकांसाठी दीडपट हमीभावाची …

Read More »

महालक्ष्मी मंदिर परिसराच्या ८० कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता अद्ययावत माहिती देणारे स्मार्ट वाहनतळ उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

मुंबई : प्रतिनिधी कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवस्थान मंदिर परिसराच्या सुमारे ८० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने तत्वतः मान्यता दिली. विकास आराखड्याअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या तीनही वाहनतळावर पार्किंगची अद्ययावत माहिती देणारे डिजिटल फलक उभारून स्मार्ट वाहनतळ उभारण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. मुंबईतील …

Read More »

विकासात महाराष्ट्र आशियाचे नेतृत्व करेल संयुक्त राष्ट्रसंघाचे भारतातील प्रमुख युरी अफानासिएफ यांचा आशावाद

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र दारिद्र्य निर्मुलनासह शाश्वत विकासाच्या कामात देशाचेच नाही तर पूर्ण आशियाचे नेतृत्व करेल असा विश्वास व्यक्त करून संयुक्त राष्ट्र संघाचे भारतातील प्रमुख युरी अफानासिएफ यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून नियोजन विभागात दारिद्र्य निर्मुलनासाठी सुरु केलेल्या “ॲक्शन रुम” च्या महत्वाकांक्षी पावलाचे कौतुक केले. ॲक्शन रुमच्या उदघाटनानंतर सह्याद्री …

Read More »

धर्मा पाटील प्रकरणाचा अहवाल ८ दिवसात सादर करा मुख्यमंत्री फडणवीस यांचे मुख्य सचिवांना निर्देश

मुंबईः प्रतिनिधी जळगावमधील शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकरणाची मुक्य सचिवांकडून चौकशी केली जाणार असून येत्या आठ दिवसांत याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी हा विषय उपस्थित केला होता. धर्मा पाटील यांचे प्रकरण घडले तेव्हा मुख्यमंत्री डाव्होसच्या परिषदेच्या घाईत होते. त्यामुळे मंत्रालयात …

Read More »

तुमच्या खुर्च्याही जळतील, त्या फायरप्रुफ नाहीत ! वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी शिवसेनेला सुनावले

मुंबईः प्रतिनिधी धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्त्येच्या मुद्द्यावरून मंगळवारी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला खरा पण त्याचाच आधार घेत शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखाचा वापर करत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना टोला हाणला. धर्मा पाटील यांच्या चितेने सरकारच्या खुर्च्या जळतील तेव्हा तुमच्याही खुर्च्या जळतील. त्या काही फायरप्रुफ नाहीत, …

Read More »

उद्योग विभागाचे प्रस्ताव माझ्याकडे येणार की थेट तुमच्याकडेच उद्योगमंत्री देसाईंसह तीन सेना मंत्र्यांकडून मंत्रिमंडळ बैठकीतच मुख्यमंत्र्यावर प्रश्नांचा भडीमार

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील उद्योगासंदर्भात माझ्याकडे खाते आहे. जे कोणी अदानी, अंबानी यांच्या फाईली असतील तर त्या काय थेट तुमच्याकडेच येणार का असा सवाल उपस्थित करत माझ्या विभागाकडेही या फाईली आल्या पाहिजेत अशा स्पष्ट शब्दात शिवसेनेच्या कोट्यातून उद्योग मंत्री असलेले सुभाष देसाई हे मुख्यमंत्र्याचे खास मंत्री म्हणून ओळखले जातात मात्र आज …

Read More »