मुंबईः प्रतिनिधी
लोकसभेत वेगळे लढले असताना आम्ही अमुक जागा देतो सांगून टिव्ही, वर्तमानपत्रात चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करीत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाही असे जाहीर केले. यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता नवाब मलिक यांनी आरोप केला.
प्रकाश आंबेडकर हे लोकसभा निवडणूकीच्यावेळी वेगळे लढले होते. त्यांना आघाडी नकोच आहे. आणि आताही त्यांना वेगळंच लढायचं आहे.
वंचितमुळे मत विभाजन होवून त्याचा फायदा शिवसेना – भाजपला होत असल्याचे राज्यातील जनतेला कळून चुकलं आहे. जनतेने लोकसभेत जी चुक केली ती चुक पुन्हा विधानसभेत ते करणार नाहीत असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी विधानसभेत एकजुटीने लढतील आणि जे मित्रपक्ष सोबत होते ते सर्व घेवून विधानसभा ताकदीने लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Tags bahujan vanchit aghadhi congress nawab malik ncp prakash ambedkar
Check Also
प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा
परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …