Breaking News

राज्यसभा निवडणुकीसाठीची भाजपाने धुडकावली मविआची “ही” ऑफर चर्चे दरम्यान दिलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली नाही

राज्यसभेची निवडणुकीत शिवसेनेने उभा केलेल्या सहाव्या उमेदवाराचा विजय निर्विघ्नपणे व्हावा या उद्देशाने आणि निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीने भाजपाला ऑफर दिली. त्यावर महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या प्रस्तावावर भाजपाने मविआचा प्रस्ताव धुडकावून लावत भाजपाच्यावतीने नवा प्रस्ताव आघाडीसमोर ठेवला. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रस्ताव भाजपाने धुडकावून लावल्याचे स्पष्ट झाले.

आमचा पक्ष राष्ट्रीय असल्याने आमच्यासाठी राज्यसभा महत्वाची आहे. महाविकास आघाडीनेच तिसरी जागा सोडावी. तसेच आम्ही विधान परिषदेची पाचवी जागा आम्ही लढविणार नाही याचा विचार करू असे भाजपाने मविआला सांगितले. आता जर शिवसेना दोन जागा लढविणार ठाम असेल तर निवडणुक होणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगत मविआचा प्रस्ताव फेटाळून लावला.

मविआच्या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. मविआच्या शिष्टमंडळाने भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली.

राज्यसभा निवडणुकीतून मविआने उमेदवार मागे घेतल्यास विधान परिषदेला एक जागा आणखी देऊ असा प्रस्तावही महाविकास आघाडीने भाजपाला दिला. चर्चेत तिसऱ्या जागेसाठीचा दावा कायम ठेवला आहे. भाजपाकडे सहा सहयोगी अपक्ष आमदारांसह ३० मते अतिरिक्त असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष असून राज्यसभा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचवी जागा लढवणार नसल्याचे भाजपच्यावतीने या बैठकीत सांगण्यात आले. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने ही प्रदेश भाजपाच्या भूमिकेवर समाधान व्यक्त केले असल्याचे त्यांनी सांगितले.

मविआची भाजपाला ऑफर काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीने भाजपाला ऑफर दिली आहे. भाजपाने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यास मदत केल्यास त्याची परतफेड विधान परिषद निवडणुकीत केली जाईल. त्यानुसार, विधान परिषद निवडणुकीत मविआकडून भाजपला आणखी एक जागा देण्याचा प्रस्ताव आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपाचे चार उमेदवार विधान परिषेदत विजयी होऊ शकतात. तर, मविआने भाजपला राज्यसभेच्या बदल्यात आणखी एक जागा देण्याची ऑफर दिली आहे.

संख्याबळानुसार काय स्थिती?
विधानसभेतील आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. सध्या असलेल्या विधानसभा आमदारांच्या संख्याबळानुसार, भाजपाचे दोन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. तर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली अतिरिक्त मते आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या बळावर शिवसेना सहावी जागा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तर, भाजपाला देखील सहावी जागा जिंकण्यासाठी जवळपास १३ मतांची आवश्यकता आहे. त्यासाठी लागणारी मते अपक्षांमधून जमावजमव करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी आणि भाजपाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटींची होणार आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *