Breaking News

अजित पवार म्हणाले, …विरोधात प्रचारसभा घेणाऱ्यांनी उलटी प्लेट लावली मनसे प्रमुख राज ठाकरेंवर केली टीका

मागील दोन वर्षे करोना महामारीचे संकट सोसल्यानंतर त्यातून बाहेर पडत परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. असं असताना काहीजण अचानकपणे भोंग्याचे राजकारण करून राज्यातील सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा प्रयत्न असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या विरोधात राज्यभर प्रचारसभा घेणाऱ्यांनी आता उलटी प्लेट लावली असल्याची टीका त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केला.
आज कोणत्याही निवडणुका नाहीत. सर्व सण, उत्सव शांततेने आणि उत्साहाने साजरे होत असताना मधूनच भोंग्याचे राजकारण करून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे. त्यांच्या राजकारणाला जनतेने बळी पडू नये आणि तो प्रयत्न हाणून पाडावा असे आवाहनही त्यांनी केले.
शेतकरी व कार्यकर्त्यांच्या साक्षीने झालेल्या या मेळाव्यास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आदी उपस्थित होते. अजित पवार सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नगरपंचायतीचा वर्धापनदिन आणि शेतकरी मेळाव्याला आले असताना बोलत होते.
जातीयतेढ निर्माण करणाऱ्यांच्या पाठीशी एकेकाळी १४ आमदार होते, परंतु आता हे सर्व दुरावल्याचा टोला लगावत मशिदीवरील भोंगे हटवल्यास उद्या शिर्डीतील साईबाबा मंदिरात दररोज पहाटे पाच वाजता भोंग्यावर होणारी काकड आरतीही बंद ठेवावी लागेल, असा इशारा दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी सहा ते रात्री १० वाजेपर्यंत आणि वर्षातून १५ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत भोंगे वाजविण्याची परवानगी आहे. मशिदीवरील भोंगे हटविल्यास उद्या शिर्डीतील साईबाबा मंदिरात दररोज पहाटे पाच वाजता भोंग्यावर होणारी काकडारतीही बंद ठेवावी लागेल. अनेक मंदिरे, मठांमध्ये भोंगे लावून रात्री उशिरापर्यंत कीर्तन, प्रवचन, हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम होतात. गावात एकमेकांच्या संमतीने, कोणालाही त्रास होऊ न देता भोंग्यांचा वापर करून होणारे असे कीर्तन, प्रवचन सप्ताहासह वाघ्यामुरळीचे कार्यक्रमही बंद करावे लागतील. त्याचा विचार करता हे चाललेले भोंग्याचे राजकारण फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारे ठरेल असा इशाराही त्यांनी दिला.
कोरोना महामारीमुळे दोन वर्षे संकटात गेली. अनेक जीवाभावाची माणसे गेली, घरे उजाडली, उद्योग व्यवसाय धोक्यात आले. रोजगार बुडाला, अशा संकटातून बाहेर पडत परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची पावले पडत असतानाच अचानकपणे भोंग्याचे राजकारण केलं जातेय. यातून सामाजिक व धार्मिक सलोखा, एकोपा बिघडविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. या माध्यमातून जातीयतेढ निर्माण करणाऱ्यांच्या पाठीशी एकेकाळी १४ आमदार होते. नाशिक महापालिका ताब्यात होती. परंतु हे सारे दुरावले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *