मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीच्या रिंगणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माघार घेतल्याचा निर्णय जाहीर करताच महायुतीतील रासपचे महादेव जानकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षोल्लास व्यक्त करत पवारांची रिंगणातून माघार म्हणजे युतीचा विजय असल्याचे प्रतिपादन केले.
देशात आणि महाराष्ट्रात मोदींना पाठिंबा वाढतो आहे. मोदीजी एकदा म्हटले होते की बदललेल्या हवेचा अंदाज शरद पवार यांना लवकर येतो, त्याचमुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता आता कोणतीही लाट वगैरे दिसत नाही असंही म्हटलं आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मोदींचा वाढता पाठिंबा पवारांना लक्षात आला आहे. त्यामुळेच त्यांनी माघार घेतल्याचे ते म्हणाले.
Tags bjp cm fadnavis mahadev jankar ncp sharad pawar
Check Also
निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश
लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे …