Breaking News

स्थलांतर थांबवा, राज्यपाल कोश्यारी यांचे आदेश राज्यपालांनी केली सर्व विभागीय आयुक्तांशी चर्चा

मुंबई: प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत असताना दुसऱ्याबाजूला हातावर पोट असणाऱ्या कामगारांकडून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आपापल्या मुळ गावी जाण्यास सुरुवात केली. मात्र लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने या कामगारांनी मिळेल त्या वाहनाने, पायी चालत आपले गाव गाठण्यास सुरुवात केली. परंतु अशा पायी जाणाऱ्यांच्या अपघाताच्या दोन घटना तर अनेकांची चालून अवस्था बिकट झाल्याच्या काही घटना उघडकीस आल्याने अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील विभागीय आयुक्तांशी बोलून हे स्थलांतर थांबविण्याचे निर्देश दिले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज दूरध्वनीवरून राज्यातील सर्व सहा विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. तसेच प्रत्येक विभागातील करोना व्हायरस संक्रमण व स्थलांतराबाबतत माहिती घेतली. करोना संक्रमण थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच राज्यातून इतरत्र स्थलांतर करीत असलेल्या लोकांना ते जेथे असतील तेथे थांबविण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे, अशी सूचना त्यांनी यावेळी आयुक्तांना केली.

सर्व मोठ्या शहरांमध्ये तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये सार्वजनिक उद्घोषणा करून स्थलांतर करीत असलेल्या लोकांना थांबण्याचा आग्रह करावा व त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी शासन तसेच अशासकीय संस्था करीतअसलेल्या प्रयत्नांबाबत त्यांना माहिती द्यावी. ज्या जिल्ह्यांमध्ये इतर राज्यांमधून किंवा इतर जिल्ह्यांमधून लोक प्रवेश करीत आहेत, त्यांना देखील थांबवून घेऊन त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी दिले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *