मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून अधिकाऱ्यांना तात्काळ आपल्या नवी पदाचा पदभार स्विकारण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.
1. जी श्रीकांत, जिल्हाधिकारी, लातुर यांची बदली व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बियाणे महामंडळ, अकोला येथे करण्यात आली आहे.
2. पृथ्वीराज बी पी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी यांची बदली जिल्हाधिकारी लातूर येथे करण्यात आली आहे.
3. एस टी टाकसाळे, अतिरिक्त विभागीय आयुक्त, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी या पदावर करण्यात आली आहे.