Breaking News

नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी
परतीच्या पावसाने राज्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान केले असून सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली.
अहमदनगरच्या शेतकर्‍याने सोयाबीनचे उभं पीक पेटवून दिले. याचा अर्थ सरकारला शेतकर्‍यांच्या अडचणी कळत नसल्यानेच शेतकरी इतक्या टोकाची भूमिका घेत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
तर दुसरीकडे आमचे नेते शरद पवार शेतकर्‍यांच्या शेताच्या बांधावर जात त्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत शेतकर्‍यांची आस्थेने चौकशी करत आहेत. त्यामुळे त्यावर कोणती उपाययोजना करायची यावर पक्षाच्यावतीने निश्चित विचार केला जाणार आहेच. शिवाय याप्रकरणी राज्यपालांची भेट घेण्याचे निश्चित झाल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *