मणिपूर येथील हिंसाचारावरून शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मणिपूरच्या महिला राज्यपाल आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्यावर निशाणा साधला. तसेच यावेळी महिलांवर होत असलेल्या अत्याचारावरून देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनाही ठोस निर्णय घेण्याचे आवाहन करत जेव्हा परदेशात जाता तेव्हा इंडियन मुजाहिदचे प्रतिनिधीत्व करता की हिंदूस्थानचे प्रतिनिधीत्व करता असा …
Read More »पाचतासाच्या ईडी चौकशीनंतर रविंद्र वायकर यांचा किरीट सोमय्यावर हल्लाबोल चौकशीला बोलावले तर परत येईन
भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी केलेल्या कथित गैरव्यवहाराच्या तक्रारीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा गेल्या पाच तासांपासून आमदार रविंद्र वायकर यांची चौकशी करीत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या क्रीडांगण आणि उद्यानाच्या जागेवरही अनधिकृत ताबा घेऊन ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या यांनी तक्रारीत केला होता. याप्रकरणी पाच तास चौकशी झाल्यानंतर …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला २४ तास होण्यापूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्यांवर कारवाईला सुरूवात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल तर माजी मंत्री रविंद्र वायकर यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ
काल विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाकाळात मृत पावलेल्या लोकांना सोडणार नाही असा गर्भित इशारा ठाकरे गटाला दिला. त्यास २४ तास उलटत नाही तोच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पुढे येत असून त्यांच्यावर मृतांसाठी लागणाऱ्या बँगेच्या …
Read More »शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी अशा तिघांनी ठरवलं…. अजित पवार यांच्या बंडानंतर पहिल्यादाच महाविकास आघाडीचे नेते एकत्रित
राज्यात शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीचे नेते एकत्रित आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे धुळे येथील मात्र वाय.बी.चव्हाण प्रतिष्ठान येथे आज रविवारी ३० जुलै रोजी इतिहासाचार्य वि.का.राजवाडे संशोधन …
Read More »उद्धव ठाकरे खोचक टीका, भाजपा आणि मिंदे गटाला सध्या एकच प्रश्न पडलाय…. २००७ साली अशीच परिस्थिती होती पण आपण केलेल्या मेहनतीवर पुन्हा विजय मिळविला
मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापार्श्वभूमीवर सायन येथील काही कार्यकर्त्यांनी मातोश्री येथे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जात आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले. त्यावेळी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपा आणि मिंदे गटाने रोज माझ्याकडील निष्क्रीय शिवसैनिकाला प्रत्येक आठवड्याला फोडून …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला, चिखल तुडवत गेलो…आम्ही वर्क फ्रॉम होम करत नाही…. इर्शाळवाडी भेटीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर केली टीका
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे अलीकडेच दरड कोसळून ८४ जणांचा मृत्यू झाला होता. याठिकाणी बचावकार्य सुरु असताना अनेक राजकीय नेत्यांनी इर्शाळवाडीला भेट देत तेथील नागरिकांची भेट घेतली. यामध्ये उद्धव ठाकरे यांचाही समावेश होता. उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे विस्थापित झालेल्या आणि नातेवाईक गमावलेल्या कुटुंबियांची भेट घेत मी …
Read More »संजय राऊत म्हणाले, बरं झालं अण्णा काहीतरी बोलले… थेट मणिपूरलाच हात घातला बरं झालं
मणिपूरमधील हिंसाचाराची धग देशभर जाणवते आहे. अशातच मणिपूरमधील एका व्हीडिओवर सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केलं. यावर अद्याप कारवाई का केली गेली नाही, असा जाब सर्वोच्च न्यायालयाने विचारला. त्यानंतर हा व्हीडिओ वाऱ्यासारखा पसरला. यावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही यावर भाष्य केलंय. मात्र इतके दिवस …
Read More »भेटीनंतर उद्धव ठाकरे यांची खंत, ….त्यांच्यासमोर जाताना लाज वाटत होती पक्षाचं सरकार म्हणून नव्हे तर जनतेचं सरकार म्हणून पाहतोय
खालापूरमधील इरर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या इर्शाळवाडी येथे बुधवारी दरड कोसळली. या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून १०५ जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आहे. अशातच आज २२ जुलै रोजी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधत धीर दिला. पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असं …
Read More »अजित पर्व आणि मणिपूर हिंचाचारावर संजय राऊत म्हणाले, कोणीही ट्विट करण्याची गरज नाही…. एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज वाढदिवस आहेत. या वाढदिवसानिमित्त नागपूरमधील भाजपा कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. हे बॅनर्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. कारण यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेच्या शपथविधीचा २०१९ सालचा फोटो असून त्यावर लिहिलेली वाक्ये लोकांचं लक्ष वेधून …
Read More »आदित्य ठाकरे यांचा मंत्री लोढा यांना इशारा, २४ तासात रिकामे करा अन्यथा… पालकमंत्र्यांचा पालिकेशी संबध काय?
राज्यात सत्तापालट होऊन जवळपास एक वर्ष झाला. तसेच मुंबई महापालिकेची मुदत संपून त्यासही कालावधी लोटला. त्यामुळे मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या जीवावर सुरु आहे. त्यात मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना मुंबई महापालिकेच्या दालनात कार्यालय थाटल्याची माहिती पुढे आली. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तथा नेते …
Read More »