Breaking News

Tag Archives: rajyasabha election

पुरेसे संख्याबळ मविआकडे पण, बाजी मारली भाजपाने; शिवसेनेच्या ‘संजय’चा पराभव निकाल पहाटेला जाहिर, मविआ आणि भाजपाला तीन तीन जागी विजय

राज्यसभा निवडणूकीतील मतदान करण्याच्या पध्दतीवरून भाजपा आणि महाविकास आघाडीने एकमेकांवर आक्षेप घेत त्याप्रश्नी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली. त्यानुसार शिवसेनेचे सुहास कांदे यांचे बाद ठरवित बाकीच्या आक्षेपांमध्ये तथ्य नसल्याचे मत सांगत आयोगाने निकाल दिला. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही त्यांच्या संख्याबळाने दगा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या चवथ्या …

Read More »

राज्यसभा निवडणूक निकालः आयोगाचा निर्णय काही येईना, सर्वांचा जीव टांगणीला भाजपाच्या आक्षेपावर निर्णय घेण्यास ५ तास उलटून गेले तरी अंतिम निर्णय नाही

राज्यसभा निवडणूकीसाठी मतदान होवून ५ तास झाले तरी अद्याप मतमोजणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्यातील राज्यसभेच्या उमेदवारांच्या भवितव्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर या निवडणूकीतील उमेदवारांबरोबरच राज्यातील जनतेला कोण विजयी होणार याबाबतची उस्तुकता लागून राहिली आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कधी परवानगी मिळेल त्यानंतरच मतमोजणी होवून …

Read More »

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याविरोधात मुस्लिम समुदायाकडून निदर्शने दिल्लीत जामा मस्जिदसह सोलापूर, औरंगाबादेत निदर्शने केली

भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा हीने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्याचे पडसाद देशासह महाराष्ट्रातील काही भागात उमटले. दिल्ली, सोलापूर, औरंगाबादेत निषेधाचे मोर्चे निघाले. तसेच नुपूर शर्मा हीच्या अटकेची मागणी करण्यात आली. दिल्लीतील जामा मशिदीबाहेर शुक्रवारी नमाज पठणानंतर मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले आणि त्यांनी आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी …

Read More »

भाजपा उमेदवारांच्या विजयासाठी आले आजारी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक दोघेही अॅम्ब्युलन्समधून आले एक जण व्हिल चेअर तर दुसऱ्याला स्ट्रेचरवरून आणले

राज्यसभा निवडणूकीसाठी आज मतदान होत असताना आज दोन परस्पर विरोधी चित्र पाह्यला मिळाले. त्यातील एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यसभा निवडणूकीसाठी मतदान करता यावे याकरिता न्यायालयात याचिका दाखल केली. तर दुसऱ्याबाजूला भाजपाच्या दोन आमदारांनी स्वतःची शाररीक स्थिती आणि आरोग्य चांगले …

Read More »

राज्यसभा निवडणूकीवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मोठे वक्तव्य आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल

महाविकास आघाडी अडचणीत वगैरे काही नाही. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे. त्यामुळे आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. आज शरद पवार यांच्याशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. अपक्षांशी विविधस्तरावर चर्चा …

Read More »

ओवेसींच्या प्रस्तावावर नाना पटोले यांचे प्रत्युत्तर, तेच लोक निमंत्रण देतील राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पटोलेंचा खोचक टोला

राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने एमआयएमचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी महाविकास आघाडीने मागितली तर मदत देऊ अशी तयारी दाखविली. त्यामुळे आता ओवेसी यांच्या या प्रस्तावावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक टोला लगावत म्हणाले की, एमआयएम पक्षाची ज्यांच्यासोबत युती असेल तो पक्ष तो पक्ष एमआयएमशी बोलेल असे स्पष्ट केले. राज्यसभा …

Read More »

ओवेसी म्हणाले, महाविकास आघाडीने मागितली तर मदत करू… भाजपाला हरविण्यासाठी मागितल्यास मदत करण्याची तयारी

राज्यसभा निवडणूकीत सहाव्या जागेवरील आपलाच उमेदवार निवडूण येण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपाकडून अपक्ष आणि छोट्या पक्षांची मते मिळविण्यासाठी युध्द पातळीवर सर्व पध्दतीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र राज्यात छोट्या पक्षांच्या यादीत असलेल्या एमआयएम पक्षाचे दोन आमदार विधानसभेत आहेत. परंतु या पक्षांच्या दोन आमदारांच्या पाठिंबा महाविकास आघाडीला देण्याची तयारी दर्शविली असून मदत …

Read More »

भाजपा म्हणते, शिवसेनेच्या संजय चा पराभव अटळ ब्लूप्रिंट तयार असल्याचा आमदार अॅड आशिष शेलार यांचा सूचक इशारा

महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्यात येणाऱ्या ६ जागांसाठी निवडणूक जाहिर झाली आहे. या निवडणूकीत काहीही करून महाविकास आघाडीने आपला चवथा तर भाजपाने तिसरा उमेदवाराची जागा जिंकायचीच असा निश्चय केल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीर भाजपाचे केंद्रीय निवडणूक निरिक्षक अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली आज भाजपाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर बोलताना भाजपाचे आमदार अॅड आशिष …

Read More »

संजय राऊतांचे सूचक वक्तव्य, वेळ संपली नाही तर खऱ्या अर्थाने सुरू झाली आमचा सहावा उमेदवार ही निवडून येणार

राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या ६ जागांकरीता होणाऱ्या निवडणूकीवरून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. एक शेवटची शिष्टाई म्हणून महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ, सुनिल केदार आणि शिवसेना नेते अनिल देसाई हे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याकरीता त्यांच्या सागर या शासकिय निवासस्थानी गेले. मात्र भाजपा आणि महाविकास आघआडीच्या नेत्यांमध्ये सहाव्या …

Read More »

राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे पारडे जड, पंतप्रधान १४ जूनला देहूमध्ये मोदी सरकारच्या कामाची जनतेला माहिती देण्यासाठी भाजपाची मोहीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ३० मे रोजी आठ वर्षे पूर्ण झाली असून मोदी सरकारचा हा कार्यकाळ म्हणजे देशासाठी सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पर्व आहे. मोदी सरकारच्या कामाची माहिती जनेतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात व्यापक जनसंपर्क कार्यक्रम सुरू केला आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी …

Read More »