Breaking News

Tag Archives: ncp

अजित पवारांची मागणी, कच्च्या-बच्च्यांच्या जिवाशी खेळ, दूध भेसळ करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची… दूध भेसळीच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक

राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. दूध भेसळीचे मोठे सामाज्र पसरले आहे. दूध भेसळीचा प्रश्न गंभीर असून लहानग्या कच्च्या-बच्च्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. दूध भेसळ करुन सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. दरम्यान दुधाच्या व्यवसायाला प्रोत्साहन …

Read More »

त्या प्रकाशित वृत्तावर अजित पवारांच्या प्रश्नावर फडणवीसांचा खुलासा, मला व माझ्या कुटुंबियांना अडकविण्याचा… अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या एफआयआरवर फडणवीसांचा सभागृहात खुलासा

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका इंग्रजी वर्तमान पत्राचा दाखला देत अजित पवार यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गावदेवी मलबार हिल पलीस ठाण्यात दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालातील नेमकी माहिती काय असा थेट सवाल केला. अजित पवार यांच्या प्रश्नार्थक माहितीमुळे …

Read More »

मविआ बैठकीनंतर नाना पटोलेंचा विश्वास, भाजपाला सत्तेतून हकालपट्टीची सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल काँग्रेस, एनसीपी व शिवसेनेच्या संघटीत ताकदीवर पुन्हा मविआच सत्तेवर येणार: बाळासाहेब थोरात

केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सत्तेच्या जोरावर संविधान आणि लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम करत आहे. आज देश मोठ्या अपेक्षेने महाराष्ट्राकडे पहात असून महाराष्ट्राच्या जनतेवर देशाची भिस्त आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राने कायमच देशाला दिली आहे. आता पुन्हा तेच काम होणार आहे. भाजपला सत्तेतून हाकलून देण्याच्या प्रक्रियेची …

Read More »

अजित पवारांचा इशारा, …नाहीतर पोलिसांनाच संरक्षण देण्याची वेळ येईल पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता

राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस चोवीस तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात ३० हून अधिक हल्ले पोलिसांवर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांवर हल्ल्याची प्रवृत्ती बळावू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र …

Read More »

शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांच्या गढीसंवर्धनासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद जुनी कचेरी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणार - पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जुनी कचेरी म्हणजेच मालोजी राजे यांच्या गढीसंवर्धनासाठी पर्यटन विभागातर्फे दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. या ऐतिहासिक स्थळाला पर्यटन स्थळ घोषित करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य दत्तात्रय भरणे …

Read More »

धनंजय मुंडे यांच्या मागणीला यश ; लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार मंडळाला १३५ कोटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा;राज्य सरकारचे धनंजय मुंडेंनी मानले आभार...

माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या महत्वाकांक्षी असलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला राज्य शासनाने १३५ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेच्या उत्तरा दरम्यान केली. आमदार धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय चर्चेत सत्ताधारी पक्षाला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा विसर पडल्याचा आरोप करत, …

Read More »

अजित पवारांचा टोला, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे ठिक आहे, पण संसदीय मंत्री पाटलांना काय अडचण सध्या सभागृहात गलिच्छपणाचे कामकाज सुरू आहे ; निर्लज्जपणाचा कळस झाल्यावर आमचा नाईलाज होतो; अजित पवार सभागृहात संतापले...

सध्या सभागृहात गलिच्छपणाचे कामकाज सुरू आहे…अक्षरशः यांना कुणालाही विधीमंडळाच्या कामकाजात रस नाहीय… यांना बाकीच्याच कामात रस आहे. निर्लज्जपणाचा कळस झाल्यावर आमचा नाईलाज होतो अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात तीव्र संताप व्यक्त केला. तसेच आज सकाळी सभागृहात मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री उपस्थित राहिले नसल्याने विरोधी पक्षनेते …

Read More »

अजित पवार म्हणाले, रखरखत्या उन्हात २० हजार आंदोलक शेतकरी मुंबईच्या वेशीवर… आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन सरकारने प्रश्न सोडविण्याची मागणी

भारतीय किसान सभेच्यावतीने लाँगमार्च सुरु करण्यात आला असून दिंडोरीहून आंदोलक शेतकरी रखरखत्या उन्हातून चालत मुंबईच्या वेशीवर आले आहेत. त्यांच्याबरोबरची मुख्यमंत्र्यांची बैठक आज रद्द करण्यात आली आहे, तरी सरकारने आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन त्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. वनजमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह …

Read More »

मुख्यमंत्री तुमच्या मित्राचा ग्रोथ रेट…असे म्हणत जयंत पाटील यांनी फडणवीसांच्या हसण्यावर काढला चिमटा तुम इतका क्यों मुस्करा रहे हो या ओळी आता तुम्हा बघितल्या की आठवतात

विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चे दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडताना भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मित्र तथा मित्रा या शासकिय समितीचे अध्यक्ष अजय अशर यांच्यावरून टोला लागवताना म्हणाले, अर्थसंकल्पात सांगितल्याप्रमाणे सध्या राज्याचा ग्रोथ रेट ६.८ असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हा ग्रोथ रेट वाढविण्यासाठी तुम्ही तुमचे …

Read More »

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे आश्वासन, पीक विम्याची थकीत ५०३ कोटी रक्कम १५ दिवसांत ५० लाख, ९८ हजार ९९ शेतकऱ्यांना २ कोटी ३५६ लाख भरपाई

पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई देत असून उर्वरित ५०३ कोटी रुपयांची रक्कम पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत दिली. तसेच केवळ एक रुपयांत पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे, हा राज्य सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी विरोधकांच्या …

Read More »