Breaking News

Tag Archives: cm eknath shinde

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय, “या” वाहनांना टोलमाफी आषाढी वारीच्या अनुषंगाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून प्रशासनाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात

पंढरपूर येथे आषाढी वारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातून व अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे  निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.       आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूर येथील वारकऱ्यांच्या सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार बालाजी कल्याणकर, अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक तर सोलापूर येथून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, विठ्ठल रुख्मणी मंदिर समितीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी व अन्य विभाग प्रमुख उपस्थित आहेत. वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी आषाढी वारीसाठी संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूर येथे दर्शनासाठी येत असतात. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी येणाऱ्या या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला.  या टोल माफी सुविधेचा वारकऱ्यांना लाभ होण्यासाठी वारकऱ्यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले. त्याप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते महामंडळ व  राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत तत्काळ निर्देश देण्याबाबतही त्यांनी सांगितले. वारी मार्गावर पंढरपूर येथे स्वच्छता बाळगावी        आषाढी वारीच्या निमित्ताने यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी होत आहेत.  पंढरपूरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण वारी मार्गावर व पंढरपूर शहरात चांगली स्वच्छता ठेवावी. कुठेही कचरा साचणार नाही याची दक्षता घ्यावी. काठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवा. ते वेळोवेळी रिकामी होतील अशी व्यवस्था करा. वारी मार्गावर फिरते शौचालय तसेच पंढरपूर शहरात शौचालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तीन सत्रात २४ तास ड्यूटी लावून शौचालये स्वच्छ ठेवावीत. त्यांना आवश्यक अशी स्वच्छतेचे उपकरणे, सामुग्री उपलब्ध करून द्यावी, दैनंदिन साफसफाई यासाठी आजुबाजूला असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा, असेही निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. पाऊस व आरोग्य सुविधा मोठा पाऊस झाला तर पाणी साचू नये यासाठी व्यवस्था करा, त्यासाठी पंपाचा वापर करा. आरोग्य सुविधा औषधे, फवारणी तसेच तापाची, साथीच्या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा यांची आतापासूनच व्यवस्था करा. चिखल, पाऊस, पाणी यामुळे गैरसोय होऊ नये अशी व्यवस्था करा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक अशा गोष्टी मास्क, सॅनिटायझर्सची आदी बाबींची व्यवस्था करावी. पिण्याच्या पाण्याची सुविधा पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था करा. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मदतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी समन्वय राखावा. तसेच आवश्यक तेथे वैद्यकीय क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या. यात्रेचा परिसर खड्डे मुक्त करा खड्डे विरहीत परिसर व्हावा यासाठी तातडीने युद्ध पातळीवर नियोजन करा. अस्वच्छ, दुर्गंधी जागा स्वच्छ करा.दिंडी मार्गावरील अतिक्रमणे हटवा. हे मार्ग चिखल मुक्त राहील यासाठी उपाययोजना करा. वाहतूक मार्गांचे, व्यवस्थेचे चोखपणे नियोजन करा. संपूर्ण नियोजनात वारकरी हा केंद्रबिंदू मानून काम करा. त्यांच्यासाठी सर्व त्या सोयी सुविधा द्या. पोलीसांनी चांगला बंदोबस्त ठेवावा.‌ कोणत्याही परिस्थितीत वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकडे लक्ष द्या. रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी गरज पडल्यास खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा.    वाहतूक व्यवस्था व वीज पुरवठा           सर्व मानाच्या पालखी मार्गावर व पंढरपूर शहरात पोलीस विभागाने योग्य वाहतूक व्यवस्था ठेवावी पालखी मार्गाच्या उलट दिशेने कोणत्याही परिस्थितीत वाहतूक व्यवस्था ठेवू नये. वारकऱ्यांसाठी बसेसची संख्या वाढवा      आषाढी वारी च्या अनुषंगाने राज्य परिवहन विभागाने ४७०० बसेसची व्यवस्था केली आहे, परंतु या वर्षी वारीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी होणार असल्याने आवश्‍यकतेनुसार संबंधित यंत्रणांनी बसेसच्या संख्येत वाढ करावी व भाविकांना प्रवासाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. समन्वय अधिकारी नेमणूक  अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची पंढरपूर वारी यात्रेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले. चंद्रभागेत स्नान व व्यवस्था  चंद्रभागेत स्नानासाठीची व्यवस्था चोख व्हावी. याठिकाणी चांगली स्वच्छता, त्यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावी. महिला भाविकांसाठी निवारा व्यवस्थेत वाढ करा. वाढीव निधीची मागणी  जिल्हा प्रशासनाने आषाढी वारी च्या अनुषंगाने वारी मार्गावर पंढरपूर शहरात चांगल्या सोय- सुविधा निर्माण केलेल्या दिसून येत आहेत. तरीही वारकऱ्यांसाठी अधिकच्या सुविधा उपलब्ध करावयाच्या असतील तर त्यासाठी नगरविकास विभागाकडून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. Share on: WhatsApp

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश; रेल्वे बंद झाली तर बसेस रस्त्यावर आणा महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षातून घेतला परिस्थितीचा आढावा

मुंबई शहर व उपनगरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. मुंबई शहर उपनगरात गेले २४ तासात सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रेल्वेची २५ अशी ठिकाणे आहेत जिथे पावसामुळे रेल्वे बंद झाल्यानंतर नागरिकांची अडचण होवू नये यासाठी …

Read More »

ठाण्याच्या १५ वर्षाखालील प्रणयने आशियाई कुस्तीत मिळविले रौप्य पदक महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक तुरा

मागील काही दिवसात शिवसेनेचे बंडखोर नेते तथा ठाणे जिल्ह्याचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी आपल्याच वरिष्ठ नेत्यांना सत्ता संघर्षाच्या लढाईत चितपट करत आपल्या हाती सत्ता राखली. तर दुसऱ्या बाजूला ठाण्याचाच मल्ल असलेल्या प्रणय चौधरी यांने बहारीन येथील आशियाई कुस्ती स्पर्धेत आपल्या अलौकिक कामगिरीने अनेकांचे डोळे दिपवत रौप्य पदक जिंकत महाराष्ट्राच्या मानात …

Read More »

राष्ट्रवादीचा सवाल, तुम्ही सत्कारात व्यस्त; नैसर्गिक आपत्तीत लोकांनी करायचं काय ? प्रवक्ते महेश तपासे यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंना सवाल

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासदर्शक ठराव काल विधानसभेत जिंकला. त्यानंतर नागपूरात देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत करत त्यांचा मोठा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यातच मागील …

Read More »

मुंबईसह ‘या’ भागात १०० मिलीपेक्षा जास्त पाऊस, मुख्यमंत्री शिंदेंचे लक्ष एनडीआरएफ तसेच इतर यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश

राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या ९ …

Read More »

एकनाथ शिंदे यांनी ‘तो’ किस्सा सांगताच फडणवीसांनी लावला कपाळाला हात भेट कधी व्हायची याचा केला गौप्यस्फोट

विधानसभा अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-भाजपा गटाने विश्वादर्शक ठराव जिंकला. त्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदनपर ठरावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी सांगितल्याप्रमाणे या बंडामागील अनेक कारणे आणि राजकिय प्रवासातील अनेक किस्से सांगत सभागृहात एकच हस्यकल्लोळ उडवून दिला. मी आणि फडणवीस कधी भेटायचो हे आमच्याही लोकांना माहिती नव्हते. सगळे झोपल्यावर मी …

Read More »

भास्कर जाधव यांचा आरोप; शिवसेनेला आपसात लढवून संपवणं, हा भाजपाचा डाव शिवसेना वाचविण्यासाठी दोन पावले माघारी घ्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अभिनंदनपर प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपाच्या विरोधात तुफान फटकेबाजी करत म्हणाले, शिवसेनेला आपसात लढवून संपवणं, हा भाजपाचा डाव असल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे साहेब शिवसेना …

Read More »

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे सगळे आले ते ईडीमुळेच… विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन ठरावावरील चर्चे दरम्यान केला गौप्यस्फोट

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाचा ठराव मांडताना म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांकडे अंगुली निर्देश करत हे सगळे आलेत ते ईडीमुळे आलेत असे सांगत थोडा पॉज घेतला. त्यामुळे सभागृहात बंडखोर आमदारांसह सर्वच आमदारांमध्ये …

Read More »

विश्वासदर्शक ठराव शिंदे-फडणवीस सरकारने जिंकला: मविआला १०० ही अशक्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले अदृष्य “हाता”च्या मदतीचे आभार

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मांडलेला विश्वास दर्शक ठराव १६४ मतांनी आज जिंकत आपलेच सरकार आणि आपलीच शिवसेना असल्याचे एकप्रकारे सिध्द करून दाखवून दिले. तर १७० जणांचा पाठिंबा राहिलेल्या महाविकास आघाडीला १०० रीही गाठता आली नाही.  विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर भाजपा नेते सुधीर …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारने पहिली लढाई जिंकली: नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर राजन साळवी यांना १०७ मते मिळाली

शिवसेनेत बंडखोरी करून नवे सरकार स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आज संसदीय लढ्यातील पहिली लढाई जिंकली. नव्या राज्य सरकारला बहुमत सिध्द करण्यासाठी राज्यपालांच्या आदेशान्वये विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले. या अधिवेशनात विधानसभेच्या रिक्त अध्यक्षपदासाठी आज निवडणूक शिरगणतीनुसार घेण्यात आली. या निवडणूकीत …

Read More »