Breaking News

राजकारण

अखेर नारायण राणे यांना भाजपाने केली उमेदवारी जाहिर

राज्यातील लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात सर्वच राजकिय पक्षांकडून आस्ते कदम टाकण्यात येत आहे. भाजपाकडून तर त्यांच्या विद्यमान केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेच्या खासदारांनाही लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यासाठीही आस्ते कदम ठेवले जात आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांनाही अशाच पध्दतीने अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहिर करण्यात आली. अगदी त्या पध्दतीने आणि …

Read More »

सुनिल तटकरे आणि सुनेत्रा अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार…

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रायगड लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात रायगड आणि बारामतीचे मतदान होणार असून उद्या या दोन्ही मतदारसंघातील उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, मुस्लिम महिलांच्या ट्रस्टची जमिन हडपण्याचा डाव…

अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी रायगड येथे मुस्लिम समाजातील महिलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या ट्रस्टची जमीन हडपण्यामागे आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कागदपत्रांच्या पुराव्यासह मुंबईतील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केला. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुस्लिम समाजातील महिलांच्या शिक्षणासाठी डॉ. उंद्रे यांनी …

Read More »

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघातील प्रचार थंडावला

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकांचे बिगूल वाजून जवळपास एक महिन्याचा कालावधी लोटला. संपूर्ण देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूका पार पाडण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात आहे. …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतली असून काँग्रेस व इंडिया आघाडीच्या उमेदवारांना जनतेचा आशिर्वाद मिळाला आहे. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला लोकांनी अनेक गावातून हाकलून लावले. १० वर्षातील अत्याचारी कारभाराला जनता कंटाळली आहे. मोदी सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र संताप असून विदर्भातील पाचही …

Read More »

एकनाथ खडसे यांची अवस्था ना घर…, महाजनांच्या त्या वक्तव्यामुळे शिक्कामोर्तब ?

राज्यातील भाजपाचे जूने वरिष्ठ नेते तथा विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे हे एकेकाळचे राज्याच्या राजकारणातील वजनदार नेते. परंतु भाजपात असताना राज्यातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुप्त संघर्ष सुरु झाला अन त्यात त्यांना मंत्रिपदाची खुर्ची सुरवातीला सोडावी लागली. त्यानंतर भाजपाही सोडावा लागला. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी शरद …

Read More »

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, पंतप्रधान भ्रष्टाचाराचे चॅम्पियन

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यास अवधी काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना या सर्वच राजकिय पक्षांकडून राजकीय प्रचार, रॅली आणि रोड शो आयोजन करण्याकडे मोठ्या प्रमाणावर कल असल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षांनी हमी, धर्म, भ्रष्टाचार आणि इतर गोष्टींवरून उमेदवारांवर हल्ला चढवला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी …

Read More »

EVM आणि VVPAT प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी १८ एप्रिलला

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (१६ एप्रिल) व्होटर-व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) रेकॉर्डच्या विरोधात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) ची संपूर्ण पडताळणी करण्याच्या याचिकांवर सुनावणी केली. दोन तासांहून अधिक काळ सुनावणी घेतल्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने पुढील सुनावणी १८ एप्रिल रोजी ठेवली. उल्लेखनीय म्हणजे, लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा …

Read More »

इराणच्या राजदूताचे आश्वासन, जहाजावरील भारतीय क्रु मेंबर्संना लवकरच सोडू

इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही यांनी मंगळवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, इराणच्या सैन्याने ताब्यात घेतलेल्या इस्रायलशी संबंधित कंटेनर जहाजात बसलेले सर्व १७ भारतीय नागरिक सुरक्षित आहेत. जहाजाच्या क्रूला ताब्यात घेतले गेले नाही आणि ते जेव्हा हवे तेव्हा जहाज सोडू शकतात. इराणच्या राजदूताच्या म्हणण्यानुसार पर्शियन आखातातील हवामानाची स्थिती चांगली नाही …

Read More »

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी व आमदार मोहन मते यांनी आदर्श आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन केले आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भगवान श्रीरामाची पोस्टर्स वापरून आचारसंहितेचा भंग केल्याने नितीन गडकरी यांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी प्रदेश …

Read More »