Breaking News

राजकारण

प्रविण दरेकर यांचा पलटवार, शरद पवारांचे ते मूर्तीबाबतचे विधान ढोंगीपणाचे

अयोध्येतील राम मंदीरावरून आधीच राजकिय आणि सामाजिकस्तरावर विविध मते मतांतरे आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अयोध्येतील रामाच्या मुर्तीसोबत सीतेची मुर्ती का नाही असा सवाल उपस्थित करत सबंध महिलांच्या मनात कुतूहुल निर्माण झाल्याचे मत पुणे जिल्यातील एका प्रचारसभेत बोलताना व्यक्त केले. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …

Read More »

लोकसभा निवडणूकः पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारपर्यंत १९ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सकाळी १२.०० वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :- रामटेक १६.१४ टक्के नागपूर १७.५३ टक्के भंडारा- गोंदिया १९.७२ टक्के गडचिरोली- …

Read More »

पहिल्या टप्प्यातील निवडणूक मतदानाला सुरुवात, मणिपूरात हिंसाचार, तर बंगालमध्ये

२०२४ लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी १७ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ मतदारसंघांमध्ये १९ एप्रिल रोजी मतदान सुरू झाले. निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या प्रमुख चेहऱ्यांमध्ये नितीन गडकरी, किरेन रिजिजू, सर्बनदा सोनोवाल, जितेंद्र सिंग आणि भूपेंद्र यादव या आठ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेसचे गौरव गोगोई, द्रमुकच्या कनिमोझी आणि तामिळनाडू भाजपाचे …

Read More »

उत्कर्षा रूपवते शिर्डीतून ‘वंचित’कडून रिंगणात

वंचित बहुजन आघाडीची लोकसभा उमेदवारांची सहावी यादी जाहीर झाली आहे. यात शिर्डी मतदार संघातून उत्कर्षा रूपवते यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर साताऱ्यातून माजी सैनिक असलेल्या प्रशांत कदम यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव, राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे …

Read More »

ईडीचा न्यायालयात दावा, अरविंद केजरीवाल आंबा, आलू पूरी आणि मिठाई खातात

सक्त वसुली अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने गुरुवारी न्यायालयाला सांगितले की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मधुमेहाचे रुग्ण आहेत, ते वैद्यकीय जामीनासाठी कारण बनवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी वाढवण्यासाठी दररोज आंबा, आलू पुरी आणि मिठाईचे सेवन करत होते. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या केजरीवाल यांच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू असताना …

Read More »

निवडणूक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात दावा, ती माहिती खोटी

नुकतेच केरळमधील लोकसभा निवडणूकीच्या अनुशंगाने ईव्हीएम मशिन्सचा मॉक पोल घेण्यात आला. त्यात निवडणूक आयोगाच्या ईव्हिएम मशिन्समध्ये मॉक पोल घेण्यात आला, त्यावेळी भाजपाला एक मत जास्तीचे पडल्याचे वृत्त बाहेर आले. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निवडणूक आयोगाला नोटीस पाठविण्यात आली. त्या याचिकेवर उत्तर देताना निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात …

Read More »

नाना पटोले यांचे टीकास्त्र, नरेंद्र मोदी फेल झालेले इंजिन…

नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सर्व पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपात घेणारे मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी सर्व समाज घटकांच्या समस्या, वेदना, दुःख जाणून घेतले व त्यांना प्रचंड जनसमर्थनही लाभले आहे. …

Read More »

लोकसभा निवडणुकीसाठी ४५० मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचारी करणार

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्य शासनाच्या सेवेत असलेले युवा कर्मचारी केंद्राचे संपूर्ण नियंत्रण करणार आहेत. युवा कर्मचारी नियुक्त एकूण ४५० मतदान केंद्रे राज्यभरात असणार आहेत. या युवा कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया जबाबदारीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्य शासनाच्या सेवेत विविध विभागांमध्ये युवा कर्मचारी आहेत. अशा सर्व युवा कर्मचाऱ्यांना …

Read More »

‘महायुती’ च्या पत्रकार परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांचा शरद पवारांवर आरोप

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न सातत्याने केले. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने शिवसेनेबरोबरची युती कायम ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र उद्धव ठाकरे हे पवारांच्या जाळ्यात फसल्यामुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपावर ते खोटे-नाटे आरोप करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी,… एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा

लोकसभा निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे व त्याबाबतची रितसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. आता पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर बॅनर लावून बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाची जाहीरातबाजी …

Read More »