मुंबईः प्रतिनिधी
महात्मा गांधीजींच्या सत्य व अहिंसा या दोन तत्त्वाने मोदी वागत नाही तोपर्यंत तुम्हाला महात्मा गांधीजींच्या नावाने राजकारण करण्याचा अधिकार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दांडी यात्रेच्या स्मरण दिनानिमित्त महात्मा गांधीजींवर ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगला उत्तर देताना नवाब मलिक यांनी महात्मा गांधीजींची सत्य आणि अहिंसा ही दोन तत्वे मोदी पाळतात का ? असा सवालही केला.
महात्मा गांधी यांच्यावर ब्लॉग लिहिताना मोदी यांनी कॉंग्रेसवर टिका केली आहे. आमचा एकच प्रश्न मोदींना आहे की, महात्मा गांधीजींच्या नावाने राजकारण करता परंतु त्यांच्या विचाराचे पालन किती करता आहात असा खोचक सवालही नवाब मलिक यांनी केला.
Tags mahatma gandhi nawab malik ncp pm narendra modi
Check Also
प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा
परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …