Breaking News

एकनाथ खडसे म्हणाले, राजकियदृष्ट्या संपविण्यासाठीच भूखंड प्रकरण

भोसरी भूखंड प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबाबत पुणे न्यायालयाने संशय व्यक्त करत एकनाथ खडसे यांना अटक करण्यापासून मज्जाव केला. तसेच नव्याने फेर चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज मुक्ताई नगर येथे पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीष महाजन यांचे नाव न घेता आरोपही केला.

यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी सत्ताधारी पक्षातील काही मंत्र्यांकडून भोसरी भूखंड प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप केला.

भोसरी भूखंड प्रकरणात यापूर्वीच काहीही तथ्य नसल्याचा अहवाल एसीबीने पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सादर केला, असं असूनही राज्यातील सत्ताधारी पक्षाने हस्तक्षेप करून पुन्हा चौकशीचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लावला आहे, असल्याचे ते म्हणाले.

या प्रकरणावर भाष्य करताना एकनाथ खडसे म्हणाले की, भोसरी भूखंड प्रकरणात यापूर्वीही ‘अँटी करप्शन ब्युरो’नं चौकशी केली. या चौकशीनंतर एसीबीनेच संबंधित प्रकरणात काहीही तथ्य नसल्याचा अहवाल पुण्याच्या सत्र न्यायालयात सादर केला. पुण्याच्या न्यायालयात मागील अठरा महिन्यापासून हा अहवाल प्रलंबित आहे. असं असताना आता राज्य सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप केला असून फेरचौकशीची मागणी केली. राजकीय हेतुने सरकार पुन्हा चौकशीची मागणी करत असल्याचेही ते म्हणाले.

यावर न्यायालयानेही आश्चर्य व्यक्त केलं आहे. न्यायालयाने म्हटलं की, हे अनोखं प्रकरण वाटत आहे. कारण तुम्हीच चौकशीअंती या प्रकरणात काहीही तथ्य नसल्याचा अहवाल सादर केला. आता पुन्हा नव्याने चौकशी करू इच्छित आहात. या टिप्पणीनंतर न्यायालयाने सरकारी पक्षाचा मागणी मान्य करत, ३१ जानेवारीपर्यंत याबाबतचा अहवाल पुन्हा सादर करण्यास सांगितलं आहे. तोपर्यंत या प्रकरणात कुणालाही अटक करता कामा नये. कारण हा राजकीय षडयंत्राचा भाग वाटतो असंही न्यायालयाने सूचित केल्याचे त्यांनी सांगितले.

काहीही करा आणि खोट्या गुन्ह्यामध्ये नाथाभाऊला अटक करा, असं सत्ताधारी पक्षातील काही मंत्र्यांना वाटत आहे. कारण मला अटक झाल्यानंतर त्यांचं मैदान साफ होणार आहे. त्याच अनुषंगाने कारवाई करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यापूर्वीच ईडीची चौकशी पूर्ण झाली आहे. पण आता सीबीआयची चौकशी मागे लावली आहे. एसीबीनेही पुन्हा चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून मला छळायचं, मला राजकीयदृष्ट्या नाउमेद करायचं, मला एकदा अटक झाली की त्यांना निवडणुका जिंकणं सोपं होईल असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे न्यायालयाने एसीबीच्या संपूर्ण तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही महिन्यापूर्वी एसबीनेच भोसरी भूखंड प्रकरणात कोणतेही तथ्य नसल्याचा निर्वाळा देत क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला. त्यानंतर पुन्हा यासंदर्भात एसीबीने न्यायालयात याचिका दाखल करत याप्रकरणात फेरचौकशी करण्याची परवानगी मागितली. त्यावर न्यायालयाने आपल्या राजकिय बॉसला खुष करण्यासाठीच हे प्रकरण सुरु असल्याचा संशय व्यक्त खडसे यांना अटक न करण्याचे आदेश एसीबीला दिले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *